शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

जलयुक्त शिवार योजनेच्या पुरस्काराचा शासनाला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 01:12 IST

जलयुक्त शिवार अभियानांच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या संस्था, गावे व व्यक्तींना शासनाने गाजावाजा करून पुरस्कार जाहीर केले. मात्र, सहा महिने उलटूनही या पुरस्कारांचे वितरण न झाल्याने अभियानात सहभागी गावांचा उत्साह कमी होत आहे.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जलयुक्त शिवार अभियानांच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या संस्था, गावे व व्यक्तींना शासनाने गाजावाजा करून पुरस्कार जाहीर केले. मात्र, सहा महिने उलटूनही या पुरस्कारांचे वितरण न झाल्याने अभियानात सहभागी गावांचा उत्साह कमी होत आहे.जलयुक्त शिवार अभियाना या महत्त्वाकांक्षी योजनेत लोकसहभाग वाढावा, गावागावांमध्ये स्पर्धात्मक वातावरण तयार व्हावे या उद्देशाने राज्यशासनाने महात्मा ज्योतिबा फुले, राजामता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जलमित्र पुरस्कार देण्याचे जाहीर केले. राज्यभरातून या पुरस्कारांसाठी राज्य, विभाग व जिल्हा पातळीवर प्रस्ताव मागविण्यात आले. अभियानाच्या पहिल्या वर्षात (वर्ष २०१५-१६) मध्ये जिल्ह्यातील २१२ गावांमध्ये जलसंधारणाची कामे झाली. या कामांमुळे पाणीपातळीमध्ये वाढ झाली. अनेक गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला, सिंचन क्षेत्रही वाढले. दरम्यान, या अभियानात उत्तम काम करणारी गावे, संस्था व व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी शासनाने पुरस्कारासाठी प्रस्ताव मागितले. अनेक गावांनी जिल्हास्तरीय समितीकडे आपले प्रस्ताव सादर केले. समितीने प्राप्त प्रस्तावांचे मूल्यांकन करून शासनाला अहवाल सादर केला. यामध्ये मंठा तालुक्यातील किनखेडा (ता.मंठा) गावाने केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत शासनाने एक लाख रुपयांचा प्रथम तर जालना तालुक्याला पाच लाखांचा प्रथम पुरस्कार जाहीर केला. त्याचबरोबर जालना तालुक्यातील सामनगाव, अंबड तालुक्यातील दुनगाव, बदनापुरातील म्हात्रेवाडी आणि घनसावंगीमधील गुरुपिंप्री या गावांना अनुक्रमे द्वितीय, तृतीय, चतुर्थ व पाचव्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाले. अभियानात योगदान देणाºया सामाजिक संस्था व व्यक्तींनाही पुरस्कार जाहीर करण्यात आले. जालना येथे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यासाठी २२ नोव्हेंबर २०१७ निश्चित करण्यात आली. मात्र, २२ नोव्हेंबर २०१७ रोजी जलसंधारण मंत्री अपरिहार्य कारणामुळे आलेच नाहीत. त्यामुळे लवकरच या पुरस्कारांचे वितरण केले जाईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र, सहा महिने उलटूनही पुरस्काराचे वितरण झालेच नाही. त्यामुळे पुरस्कारप्राप्त गावांमध्ये नाराजीची भावना असून, अभियानाच्या दुसºया, तिसºया टप्प्यात सहभागी गावांचा उत्साह मावळत आहे. महापुरुषांच्या नावाने जाहीर केलेल्या पुरस्कारांचे वितरणच करायचे नाही याबद्दल किनखेडा ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाWaterपाणी