शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
2
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
3
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
4
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
5
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
6
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
7
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
8
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
9
दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
10
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
11
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
12
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   
13
IND vs AUS : प्रितीच्या मोहऱ्यांची टीम इंडियाकडून हवा! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेत कुटल्या ४१३ धावा
14
“मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी राहुल गांधींसोबत एकत्र यायला अडचण नाही”: प्रकाश आंबेडकर
15
नोकरीच्या संधी कमी होणार? देशातील उत्पादन वाढ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; 'या' कारणांचा थेट फटका
16
1 लाख 34 हजार रुपयांचा iphone 17 Pro Max बनवण्यासाठी किती खर्च येतो? आकडे ऐकून चक्रावून जाल...
17
दसरा मेळाव्यासाठी ६३ कोटींचा खर्च, शेतकऱ्यांना द्या; भाजपच्या मागणीवर ठाकरे म्हणाले, "उद्या बिल पाठवतो"
18
Dussehra 2025: दसऱ्याच्या मुहूर्तावर ११ लवंगांचा 'हा' विधी, दहन करेल तुमच्या आर्थिक अडचणी!
19
दिवाळीनंतर लगेच निवडणुकीचा धुराळा! राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर
20
“शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

जलयुक्त शिवार योजनेच्या पुरस्काराचा शासनाला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 01:12 IST

जलयुक्त शिवार अभियानांच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या संस्था, गावे व व्यक्तींना शासनाने गाजावाजा करून पुरस्कार जाहीर केले. मात्र, सहा महिने उलटूनही या पुरस्कारांचे वितरण न झाल्याने अभियानात सहभागी गावांचा उत्साह कमी होत आहे.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जलयुक्त शिवार अभियानांच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या संस्था, गावे व व्यक्तींना शासनाने गाजावाजा करून पुरस्कार जाहीर केले. मात्र, सहा महिने उलटूनही या पुरस्कारांचे वितरण न झाल्याने अभियानात सहभागी गावांचा उत्साह कमी होत आहे.जलयुक्त शिवार अभियाना या महत्त्वाकांक्षी योजनेत लोकसहभाग वाढावा, गावागावांमध्ये स्पर्धात्मक वातावरण तयार व्हावे या उद्देशाने राज्यशासनाने महात्मा ज्योतिबा फुले, राजामता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जलमित्र पुरस्कार देण्याचे जाहीर केले. राज्यभरातून या पुरस्कारांसाठी राज्य, विभाग व जिल्हा पातळीवर प्रस्ताव मागविण्यात आले. अभियानाच्या पहिल्या वर्षात (वर्ष २०१५-१६) मध्ये जिल्ह्यातील २१२ गावांमध्ये जलसंधारणाची कामे झाली. या कामांमुळे पाणीपातळीमध्ये वाढ झाली. अनेक गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला, सिंचन क्षेत्रही वाढले. दरम्यान, या अभियानात उत्तम काम करणारी गावे, संस्था व व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी शासनाने पुरस्कारासाठी प्रस्ताव मागितले. अनेक गावांनी जिल्हास्तरीय समितीकडे आपले प्रस्ताव सादर केले. समितीने प्राप्त प्रस्तावांचे मूल्यांकन करून शासनाला अहवाल सादर केला. यामध्ये मंठा तालुक्यातील किनखेडा (ता.मंठा) गावाने केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत शासनाने एक लाख रुपयांचा प्रथम तर जालना तालुक्याला पाच लाखांचा प्रथम पुरस्कार जाहीर केला. त्याचबरोबर जालना तालुक्यातील सामनगाव, अंबड तालुक्यातील दुनगाव, बदनापुरातील म्हात्रेवाडी आणि घनसावंगीमधील गुरुपिंप्री या गावांना अनुक्रमे द्वितीय, तृतीय, चतुर्थ व पाचव्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाले. अभियानात योगदान देणाºया सामाजिक संस्था व व्यक्तींनाही पुरस्कार जाहीर करण्यात आले. जालना येथे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यासाठी २२ नोव्हेंबर २०१७ निश्चित करण्यात आली. मात्र, २२ नोव्हेंबर २०१७ रोजी जलसंधारण मंत्री अपरिहार्य कारणामुळे आलेच नाहीत. त्यामुळे लवकरच या पुरस्कारांचे वितरण केले जाईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र, सहा महिने उलटूनही पुरस्काराचे वितरण झालेच नाही. त्यामुळे पुरस्कारप्राप्त गावांमध्ये नाराजीची भावना असून, अभियानाच्या दुसºया, तिसºया टप्प्यात सहभागी गावांचा उत्साह मावळत आहे. महापुरुषांच्या नावाने जाहीर केलेल्या पुरस्कारांचे वितरणच करायचे नाही याबद्दल किनखेडा ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाWaterपाणी