शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

लोकांना योजनांच्या नादी लावण्यापेक्षा आयुष्यभर पुरणाऱ्या सुविधा द्या, जरांगेंचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 18:52 IST

लाडकी बहीण, आनंदाचा शिधा या शासनाच्या विविध योजनांवरून सरकारवर मनोज जरांगे यांनी साधला निशाणा

- पवन पवारवडीगोद्री: येत्या ३० सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, पिकविमा, नुकसान भरपाई दिली नाही तर मतदान करून परिवर्तन करा सर्वांचे प्रश्न सुटतील असे आवाहन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी केले. तसेच नवीन स्कीम काढण्याचं काय नाटक करतात, लोकांना नादी लावण्यापेक्षा चांगल्या सुविधा द्या, त्या आयुष्यभर पुरतील अशी टीका जरांगे यांनी राज्य सरकारवर केली. अंतरवाली सराटी येथे जरांगे यांनी आज प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला.

जरांगे पुढे म्हणाले, मराठ्यांनी दलित, मुस्लिमांनी , गोरगरीब,ओबीसी आणि शेतकऱ्यांनी मनात आणलं तर शेतकरी कर्जमुक्तीच आंदोलनच मताच्या रूपात बदलेल. त्यानंतर परिवर्तन अटळ आहे. यातूनच गरिबांचे प्रश्न संपणार असा दावा जरांगे यांनी केला. तसेच प्रत्येक वेळी सांगायचं कर्जमाफी देतो, अनुदान देतो, मालाला भाव देतो मात्र, द्यायचे तर काहीच नाही, अशी टीका देखील जरांगे यांनी केली. 

शासनाच्या योजनांवरून सरकारवर निशाणादिवाळीनिमित्त शासन देत असलेल्या आनंदाच्या शिधा योजनेवर बोलत जरांगे यांनी शासनाच्या विविध योजनांवर निशाणा साधला. अर्धा गॅस संपला तरी शिधा मधील तेल वितळत नाही. गोरगरिबांची कामे करा, साड्या, आनंदाचा शिधा देता कशाला? असा सवाल जरांगे यांनी केला. लाडकी बहीण योजना देवेंद्र फडणवीस यांनीच आणली असेल. ही सगळी शाळा त्यांचीच असून योग्य वेळी त्यांनी स्कीम आणली. लाडक्या बहिणीला दिलेले पैसे आमचेच आहेत, तुम्ही काय तुमचं शेत, घर विकलं नाही, देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचे घर विकून योजनेला पैसे दिले असं ऐकलं नाही. मालाला भाव द्या, शेतकरी आत्महत्या करणार नाहीत. लाडकी बहिण चांगली, पण लाडका भाचा आरक्षण मिळत नाही म्हणून मारत आहे, मेहुण्याच्या मालाला भाव नाही, अशी खरमरीत टीका जरांगे यांनी सरकारवर केली. तसेच निवडणुकीत कोणाच्या पैशाला हात लावू नका. तुमच्या लेकरांचे आणि शेतकऱ्यांचे वाटोळ होईल. ते पैसे आयुष्यभर पुरणार नाहीत, असे आवाहन देखील जरांगे यांनी मतदारांना केले. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना