शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

कमी खर्चात गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण मिळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 16:26 IST

बदलत्या वैश्विक परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रत्येकाला कमी खर्चात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळायला हवे. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी सोमवारी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बदलत्या वैश्विक परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रत्येकाला कमी खर्चात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळायला हवे. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी सोमवारी येथे केले.पद्मभूषण डॉ. बद्रीनारायण बारवाले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराजा अग्रसेन फाऊंडेशनच्या वतीने अग्रसेन भवनमध्ये उच्च शिक्षणावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. व्यासपीठावर राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, माजी मंत्री आ. राजेश टोपे, नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, माजी आयुक्त कृष्णा भोगे, महिकोचे राजेंद्र बारवाले आदींची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. काकोडकर म्हणाले, की उच्च शिक्षणाची सद्यस्थिती गंभीर आहेच. मात्र, सगळे काही सरकारनेच करावे आणि आपण केवळ बघ्याची भूमिका घ्यावी, हे योग्य नाही. यामुळे प्रगती होणार नाही. लोकसहभागातून पुढे होऊन सर्वांनी मिळून काम केल्यास या सर्व क्षेत्रात चांगली स्थित्यंतरे दिसून येतील. शिक्षण क्षेत्रातील बदल करताना प्रस्थापितांच्या विरोधाला सामोरे जावे लागेल. बदलत्या वेगवान तंत्रज्ञानाचे आव्हान आहे. लोकशाहीतील मतप्रवाह लक्षात घेऊन आपणास काम करावे लागेल. रिअ‍ॅक्टिव्ह होण्यापेक्षा प्रोअ‍ॅक्टिव्ह झाले पाहिजे. २६ कोटी शालेय विद्यार्थ्यांना ८५ लाख शिक्षक तर साडेतीन कोटी उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांना १५ लाख शिक्षक असा देशातील शिक्षणाचा पसारा असल्याचे त्यांनी सांगितले. उच्च शिक्षणाचा आजचा दर्जा घसरल्याने ४० टक्के विद्यार्थी रोजगारासाठी पात्र तर ६० टक्के अपात्र ठरत आहेत. तरुणांमध्ये नैराश्याचे वातावरण असून, पंजाबमधील समस्या तर महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या हे त्याचेच परिणाम असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. आजच्या शाळा आणि कॉलेजची रचना कालबाह्य ठरण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना हवा असेल तो अभ्यासक्रम आणि विषय निवडण्याची सुविधा निर्माण व्हायला हवी. भाषेचा अडथळा न येतो, हवे ते घटक उपलब्ध करून देण्याचे आव्हान आहे. देशात कोचिंग क्लासेसचे ४१ लाख कोटींचे अर्थकारण असून, ते शैक्षणिक बजेटइतके असल्याचे ते म्हणाले. निवृत्त प्राचार्य डॉ. रामलाल अग्रवाल प्रास्ताविक केले. परिसंवादास महिकोच्या कार्यकारी संचालिका डॉ. उषा झेर, उद्योजक सुनील रायठठ्ठा, प्राचार्य जवाहर काबरा, प्राचार्य डॉ. राजेंद्र गायकवाड, प्राचार्य कविता प्राशर, प्रा. बी. वाय. कुलकर्णी, कृषीभूषण विजयअण्णा बोराडे, प्रा. सुरेश लाहोटी, सुरेश अग्रवाल, कवयित्री रेखा बैजल, नारायण बोराडे, दिलीप अर्जुने, शिवाजी मदन, नानासाहेब देशमुख यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर, वकील, विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.माजी आयुक्त भोगे : उच्च शिक्षणाचा दर्जा कमालीचा घसरलासमाज व्यवस्था बिघडल्यामुळे उच्च शिक्षणाचा दर्जा घसरल्याचे स्पष्ट मत माजी विभागीय आयुक्त कृष्णा भोगे यांनी व्यक्त केले. आजच्या शैक्षणिक परिस्थितीबाबत त्यांनी गांभिर्यपूर्वक विचार मांडून, अपेक्षित बदल सूचविले.कंत्राटी पद्धतीने काम करणारे प्राध्यापक दोनशे रुपये रोजंदारीवर शिकवण्याचे काम करतात. दारिद्र्य रेषेखाली खरे लाभार्थी तेच आहेत. उच्च शिक्षणावर सरकारचे लक्ष नसल्याचे भागे यांनी परखडपणे नमूद केले.

टॅग्स :educationशैक्षणिकArjun Khotkarअर्जुन खोतकरEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी