शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

Ganesh Visarjan : जालन्यात गणपती विसर्जन करताना तिघांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 4:35 PM

शहरातील मोती तलावात गणेश विसर्जन करतांना तिघांचा पाण्यात बुडून मूत्यू झाला.

जालना : शहरातील मोती तलावात गणेश विसर्जन करतांना तिघांचा पाण्यात बुडून मूत्यू झाला. ही घटना रविवारी पाचवाजेच्या सुमारास घडली. अमोल संतोष रणमुळे (१७, लक्ष्मीनारायणपुरा), निहाल खुशाल चौधरी, शेखर  मधुकर भदनेकर ( दोघे रा. लक्कडकोट) अशी मृतांची नावे आहेत. 

रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अमोल रणमुळे हा आपल्या मंडळासोबत गणपती विसर्जनासाठी मोती तलाव येथे आला. विसर्जनासाठी तो पाण्यात गेला असता, त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. गणपती विसर्जन झाल्यानंतर मंडळातील सर्व सदस्य परतले. परंतु, त्यांना अमोल दिसला नाही. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी अमोलचा शोध घेत त्याला पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी अमोलला मृत घोषित केले.

या घटनेनंतरच निहाल चौधरी, शेखर भदनेकर हे दोघे विसर्जनासाठी गेले होते. त्यांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने ते ही पाण्यात बुडाले. दोघांनाही नागरिकांनी पाण्याबाहेर काढुन रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. दरम्यान, सोमवारी तिघांच्या नातेवाईकांनी मृतदेह घेण्यास नकार दिला. त्यानंतर माजी आमदार कैलास गोरट्याल यांनी मयतच्या कुंटुबास प्रत्येक दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली. परंतु, याला निहाल चौधरी व शेखर भदनेकर यांच्या नातेवाईकांनी विरोध करत नगरपालिकेसमोर मृतदेह आणून कुंटुबातील एक व्यक्तीस नगरपालिकेत नोकरी व मदत म्हणून प्रत्येक २५ लाख रुपये देण्याची मागणी केली. 

चौकशी करणारघटनेची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना करून याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. - संतोष खांडेकर, मुख्याधिकारी 

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनJalanaजालनाGanpati Festivalगणेशोत्सव