शहरं
Join us  
Trending Stories
1
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
2
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
3
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
4
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
5
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
6
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
7
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
8
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
9
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
10
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
11
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
12
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
13
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
14
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
15
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
16
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
17
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
18
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
19
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
20
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...

भावी तलाठी वादाच्या भोवऱ्यात; निकालानंतर एका उमेदवाराची चौकशी, २७ जण ‘रडार’वर

By शिवाजी कदम | Published: January 31, 2024 3:05 PM

१३ फेब्रुवारी २०२४ रोजी पुन्हा होणार कोतवाल परीक्षा

- शिवाजी कदम/राहूल वरशिळजालना : जिल्ह्यात विविध परीक्षांमध्ये कॉपी प्रकरणे उघड होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोतवाल भरतीनंतर आता तलाठी भरतीमध्येदेखील कॉपी प्रकरण घडल्याचा संशय निर्माण झालेला आहे. २४ जानेवारी रोजी जिल्ह्यातील तलाठी भरतीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये २८ उमेदवारांना पडलेल्या गुणांवरून संशय व्यक्त करण्यात येत आहे. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एका उमेदवाराची चौकशी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असून, उर्वरित २७ उमेदवारदेखील ‘रडार’वर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. येत्या १३ फेब्रुवारी रोजी कोतवाल पदासाठी पुन्हा परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

ऑक्टोबर महिन्यात पार पडलेल्या कोतवाल भरती परीक्षेत हायटेक कॉपी प्रकरण उघड झाल्यानंतर तलाठी भरती परीक्षेतदेखील कॉपी प्रकरण झाल्याचा संशय निर्माण झालेला आहे. २४ जानेवारी रोजी जालना जिल्ह्यातील तलाठ्यांच्या ११८ रिक्त जागांसाठी मागील वर्षी जून महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. तलाठी भरती परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत तीन टप्प्यांत ५७ सत्रांमध्ये घेण्यात आल्या होत्या.

परीक्षेतील गुणांवरून संशयतलाठी भरतीचा निकाल लागल्यानंतर प्रशासनाकडून निवड झालेले आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. यातील मागे पुढे सीट नंबर असणाऱ्या उमेदवारांना समान गुण मिळाले असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे प्रत्येक उमेदवाराच्या गुणांची पडताळणी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यातील २८ उमेदवारांना मिळालेले गुण हे संशयास्पद असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यातील १ उमेदवारांची चौकशी प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच यादीतील २७ उमेदवार प्रशासनाच्या ‘रडार’वर आहेत.

पुन्हा होणार कोतवाल परीक्षाकोतवालांच्या ६९ जागांसाठी मागील वर्षी ७ ऑक्टोबरला जालना शहरातील विविध केंद्रांवर परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी ५ हजार ३०६ उमेदवार पात्र होते. यातील ४ हजार ९९६ परीक्षार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. परीक्षेदरम्यान कॉपीप्रकरणी समोर आले होते. यानंतर प्रशासनाकडून प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या उमेदवारांनी मागील भरतीमध्ये अर्ज दाखल केले आहेत. अशा उमेदवारांसाठी येत्या १३ फेब्रुवारी रोजी पुन्हा परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. कॉपीप्रकरणातील आरोपी असणाऱ्यांना वगळून इतर उमेदवारांना परीक्षा देता येईल.

उमेदवारांची चौकशी सुरूतलाठी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर काही उमेदवारांच्या गुणांवरून संशय व्यक्त होत आहे. यादीतील एका उमेदवाराची चौकशी करण्यात आलेली आहे. इतरही काही उमेदवारांची चौकशी करण्यात येईल. येत्या १३ फेब्रुवारी रोजी कोतवाल परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.-श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी, जालना.

आज गुणवत्ता यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणीजालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील तलाठी गट-क संवर्गातील ११८ रिक्त पदांसाठी टीसीएस कंपनीच्या वतीने परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल २४ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला. यात गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तीन दिवस पडताळणी करण्यात येत आहे. यात ३० जानेवारी रोजी निवड यादीतील अराखीव आणि अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. ३१ जानेवारी रोजी विजाअ/भ.ज.क./भ.ज.ड/ विमाप्र/आदुघ/इमाव प्रवर्गातील मुलांची तपासणी करण्यात येणार आहे. तर १ फेब्रुवारी रोजी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असल्याचे, जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

जिल्ह्यात ११८ जागांसाठी झाली भरतीजिल्ह्यात तलाठी गट-क संवर्गातील ११८ रिक्त जागांसाठी जून २०२३ मध्ये जाहिरात काढण्यात आली होती. यात अनुसूचित जातीसाठी १८, अनुसूचित जमाती ७, वि.जा.अ.३,भ.ज.ब.३, भ.ज.क.२, भ.ज.ड.१, वि.मा.प्र.१, इ.मा.व. ३१, ई.डब्ल्यू.एस.१२ आणि अराखीव प्रवर्गासाठी ४० जागा होत्या. त्यासाठी जिल्हाभरातून १७,८८६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यानंतर ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यांत तीन सत्रात टीसीएस कंपनीच्या वतीने परीक्षा घेण्यात आली होती.

जाहिरात निघाल्यापासून भरती वादाच्या भोवऱ्याततलाठी भरती जाहिरात काढल्यापासून वादाच्या भोवऱ्यात आहे. सुरुवातीलाच राज्य शासनाने अराखीव प्रवर्गासाठी १०००, तर मागास प्रवर्गांसाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे परीक्षा शुल्क कमी करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्यासाठी राज्यभरात हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलनही केले होते. त्यानंतर परीक्षेच्या पहिल्याच दिवशी नाशिक येथे पेपर फुटल्याची माहिती समोर आली होती. तेव्हापासून राज्य सरकार ही तलाठी भरती वादातच घेत आहे. परंतु, त्यावर कुठलाही तोडगा काढत नसल्याचे परीक्षार्थींचे म्हणणे आहे.

टॅग्स :Jalanaजालना