शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:05 IST

जालना : विविध कारणांमुळे घाणेवाडी जलाशयातील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे येथे शासनाने सुरू केलेल्या माता रमाई सिंचन मूल्यवर्धन ...

जालना : विविध कारणांमुळे घाणेवाडी जलाशयातील पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे येथे शासनाने सुरू केलेल्या माता रमाई सिंचन मूल्यवर्धन योजनेतून कामे केली जात असून, या प्रकल्पाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली.

बाष्पीभवन नियंत्रण, साठवण पुन:स्थापना आणि इतर लाभांसाठी महाराष्ट्र शासनाने माता रमाई सिंचन मूल्यवर्धन योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. यातील तंत्रज्ञान कामाचा बुधवारी आमदार गोरंट्याल यांच्या हस्ते घाणेवाडी येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा जलाशयाजवळ शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष संगीत गोरंट्याल, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, पुनम स्वामी, न.प.च्या पाणी पुरवठा विभागाचे नगर अभियंता राजेश बगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

घाणेवाडी येथील राष्ट्रसंत गाडगेबाबा जलाशयातील पाण्याचे बाष्पीभवन थांबवण्यासाठी देशातील नव्हे तर जगातील पहिला पायलट प्रकल्प राबवण्यात येत आहे. जलाशयाच्या सुशोभिकरणाचा एक भाग म्हणून या परिसरातील झाडे- झुडपे तोडून घेण्यात आली आहेत. असे असले तरी हा तलाव यापुढे शंभर वर्षे जिवंत राहिला पाहिजे. बाष्पीभवनामुळे तीस ते चाळीस टक्के पाणी वाया जात आहे. हे पाणी वाया न जाता तेही उपयोगात यावे म्हणून सर्वात प्रथम हा पायलट प्रकल्प राबविला जात असल्याचेही गोरंट्याल यांनी सांगितले.

साठवण क्षमता वाढीसाठी प्रयत्न

या प्रकल्पांतर्गत तलावातील पाण्याचे बाष्पीभवन रोखण्याबरोबरच साठवण क्षमता वाढविणे व इतर विकास कामे केली जाणार आहेत. तलावातील पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी संबंधित कंपनी कोणत्याही केमिकलचा वापर न करता नैसर्गिकरीत्या हे काम करणार आहे. या प्रकल्पामुळे पाण्याची बचत होण्याबरोबरच तलावाची साठवण क्षमता वाढण्यासदेखील मदत होणार आहे. यासाठी रवींद्र पाठक, अर्जुन पाठक, रोहित घोडे, मयुरेश्वर भानुशाम, कुणाल लिंभोरे आदी स्थापत्य अभियंते काम पाहत आहेत.

(फोटो)