शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
2
"ठाण्यात महापौर भाजपाचा बसेल, आम्ही गाफील नाही; स्वबळावर लढण्याची वेळ आली तर..."
3
मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
4
पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?
5
Diwali Rain Alert: यंदाच्या दिवाळीत गुलाबी थंडी नाही तर पाऊस बरसणार, मुंबईसह महाराष्ट्रात हवामान असं असणार
6
Raigad Crime: पतीच्या हत्येसाठी इन्स्टाग्रामवर अकाऊंट, कृष्णाला बस स्टॅण्डवर भेटायला बोलावलं अन् बॉयफ्रेंड, मैत्रिणीच्या मदतीने काढला काटा
7
इंडिया आघाडीत राज ठाकरेंच्या मनसेला सहभागी करून घेणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले...
8
Mumbai Crime: एक व्हिडीओ कॉल अन् मुंबईतील व्यक्तीचे 58 कोटी लुटले! 'तुम्ही मनी लॉड्रिंग केलंय' म्हणत...
9
Vasubaras 2025: रमा एकादशी आणि वसुबारस (गोवत्स द्वादशी) एकत्र; कशी करावी पूजा? वाचा लाभ!
10
Happy Diwali Stickers: एक नंबर! आपल्या माणसांना द्या खास शुभेच्छा; WhatsApp वर स्वत:च 'असे' बनवा 'दिवाळी स्टिकर्स'
11
'या' शेअरने वर्षात १ लाखाचे केले १ कोटी! गेल्या दिवाळीचा लखपती यंदा कोट्यधीश, टॉप १० मल्टीबॅगर स्टॉक
12
आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांनी राजकारणात यावे, निवडणूक लढवावी; आठवलेंनी पक्षात येण्यासाठी नक्षल्यांना दिली ऑफर
13
“तक्रार करण्यासारखे काही घडले नाही, संजय राऊतांना...”; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितले
14
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
15
VIDEO: मी तुम्हाला बोलवलं नाहीये...; मुंबई विमानतळावर राडाच झाला, जसप्रीत बुमराह का चिडला?
16
Diwali Bonus: BMC कडून दिवाळीची 'बंपर' भेट; महापालिका कर्मचाऱ्यांच्या ३१,००० रुपये बोनस, शिक्षिकांनाही भाऊबीज भेट
17
ओलानं लाँच केला नवा प्रोडक्ट, शेअर्सला लागलं ५% अपर सर्किट; ₹५५ च्या पार पोहोचला भाव
18
दिवाळी २०२५: स्वप्नात महालक्ष्मीचे दर्शन झाले? ‘या’ गोष्टी दिसणे भरभराट-भाग्योदय; शुभ-लाभ!
19
संरक्षण क्षेत्रात १० वर्षात उलाढाल ४६ हजार कोटी वरून दीड लाख कोटींवर; ३ लाख कोटींपर्यंत नेणार - राजनाथ सिंह
20
१३० नक्षलवादी आत्मसमर्पण करणार; अमित शाह यांच्या उपस्थितीत शस्त्रे जमा करणार

जालन्यात चार रूग्णांचा मृत्यू; बाधितांची संख्या ७०० पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 23:01 IST

कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी पुढील दहा दिवस संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या अंमलबजावणीस रविवारी मध्यरात्रीपासून प्रारंभ झाला आहे.

जालना : जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या तीन पुरूषांसह एका महिला रूग्णाचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकाच दिवशी शहरातील चार रूग्णांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे रविवारीच ३४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, जिल्ह्यातील बाधितांची संख्या तब्बल ७१९ झाली आहे. 

जालना शहरातील ढवळेश्वर भागातील ४२ वर्षीय व्यक्तीस २७ जून रोजी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर शहरातीलच गुरूगोविंदसिंग नगर भागातील ५० वर्षीय व्यक्ती, नाथबाबा गल्लीतील ६० वर्षीय व्यक्ती व गांधीनगर परिसरातील रहिवासी असलेल्या एका ६५ वर्षीय महिलेस ३० जून रोजी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या चारही रूग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, उपचार सुरू असताना रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

एकीकडे चार रूग्णांचा बळी गेलेला असताना दुसरीकडे ३४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधितांमध्ये जालना शहरातील २७ जणांचा समावेश आहे. यात बुºहाणनगर भागातील सात, दानाबाजार भागातील पाच, कादराबाद भागातील दोन, जेईएस कॉलेज परिसरातील दोन, जेपीसी बँक कॉलनीतील चार, गांधीनगर भागातील दोन, क्रांतीनगर भागातील एक, भाग्यनगर मधील एक, सुवर्णकार नगर मधील एक, नळगल्लीतील एक, संभाजीनगर भागातील एकाचा यात समावेश आहे. तर भोकरदन शहरातील तुळजाभवानी नगर मधील एक, अंबड तालुक्यातील भालगाव येथील एक, दहिपुरी येथील एक, चुर्मापुरी येथील एक, परतूर तालुक्यातील शेवगव्हाण येथील एक, पडेगाव रामगोपालनगर येथील दोन अशा ३४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता ७१९ वर गेली असून, त्यातील २६ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर यशस्वी उपचारानंतर ४१६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी पुढील दहा दिवस संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या अंमलबजावणीस रविवारी मध्यरात्रीपासून प्रारंभ झाला आहे. संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी शहरातील विविध मार्गावरून रूटमार्च काढण्यात आला. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये अशा सक्त सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. रूटमार्चमध्ये जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, सीईओ निमा अरोरा यांच्यासह अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. सूचनांचे उल्लंघन करणाºयांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. शिवाय चौका- चौकामध्ये फिक्स पॉइंट करून पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला असून, शहरांतर्गत अनेक रस्तेही बंद करण्यात आले आहेत.

१५ जणांना डिस्चार्जजिल्हा रूग्णालयातील यशस्वी उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या १५ जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला. यात वाल्मिक नगर येथील एक, गुडलागल्ली येथील एक, यशवंतनगर येथील एक, मंगळबाजार येथील एक, कोष्टी गल्लीतील एक, पानशेंद्रा येथील एक, नळगल्लीतील दोन, हकिम मोहल्ला येथील एक, क्रांतीनगर येथील एक, रहेमानगंज येथील एक, योगेशनगर येथील एक, सूर्यनानारायण चाळ येथील एक, बागवान मश्जिद येथील एक, भोकरदन येथील एक अशा एकूण १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.मागील दहा दिवसांमधील स्थितीदिनांक       नवीन रूग्ण    मृत्यू    कोरोनामुक्त२६ जून    १८    ००    १४२७ जून    ३७    ००    १६२८ जून    ४२    ००    १९२९ जून    १७    ००    ००३० जून    ३३    ०२    १५०१ जुलै    २७    ०३    ०९०२ जुलै    ३९    ०१    ०८०३ जुलै    ३२    ०३    ११०४ जुलै    ३३    ००     २२०५ जुलै    ३४    ०४     १५एकूण    ३१२    १३    १२९

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस