शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

चार लाख ३३ हजार हेक्टर क्षेत्राला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 00:43 IST

परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल ४ लाख ३३ हजार हेक्टरवरील खरीप पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज सर्वेक्षणात समोर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल ४ लाख ३३ हजार हेक्टरवरील खरीप पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज सर्वेक्षणात समोर आला आहे. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्हा प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनला कोंब फुटले असून, मक्यासह कपाशीला मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे काही भागातील पिके पाण्यात आली असून, नदीकाठच्या शेतातील जमीनही वाहून गेली आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील संपूर्ण म्हणजेच ९७२ गावे अतिवृष्टीने बाधित झाली असून, एकूण ६ लक्ष १५ हजार हेक्टरपैकी ४ लक्ष ३३ हजार हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीने बाधित झाले आहे. जिल्ह्यातील जवळपास ५ लाखापेक्षा जास्त शेतकºयांचे यात जवळपास ३२६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे. यात कापूस, मका, सोयाबीन, बाजरी या पिकांचा पीकविमा जिल्ह्यातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात भरला आहे. संबंधित विमा कंपनी व कृषी विभागाने संयुक्त नुकसानीचे मुल्यांकन करण्याबाबत लोणीकर यांनी सूचना दिल्या.लोणीकर यांनी बदनापूर तालुक्यातील भरडखेडा येथील सुभाष खुरमुढे यांच्या शेतातील पिकांची प्रशासकीय अधिकाºयांसमवेत पाहणी केली. यावेळी आ. नारायण कुचे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषद सभापती भानुदास घुगे, जिल्हा कृषी अधिकारी शिंदे, तहसीलदार छाया पवार, बद्रीनाथ पठाडे, वसंतराव जगताप, भगवान बारगजे, प्रताप शिंदे, सरपंच बबनराव बारगजे, जगन्नाथ बारगजे, विनायक दराडे, विष्णू दराडे, कृष्णा दराडे, वाल्मिक दराडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.बैलगाडीतून केली नुकसानीची पाहणी...वडीगोद्री : वडीगोद्री व परिसरातील सोयाबीन, बाजरी, कापूस व तूर आदी पिकांच्या नुकसानीची अंबडचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार मनीषा मेने यांच्यासह प्रशासकीय अधिकाºयांनी पाहणी करून पंचनामे केले. साष्टपिंपळगाव येथे बाधित क्षेत्राची पाहणी करण्यासाठी पथक गेले. मात्र, शेत रस्त्यात दोन ते तीन फूट पाणी व चिखल होता. त्यामुळे शशिकांत हदगल, मनीषा मेने यांनी बैलगाडीत बसून प्रत्यक्ष बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली.तसेच पाथरवाला खुर्द येथे जवळपास दीड ते दोन किलोमीटर चिखल तुडवत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतक-यांनी आपल्या व्यथा मांडल्या. दरम्यान, अंबड तालुका कृषी अधिकारी भीमराव वैद्य यांच्यासह पथकाने घुंगर्डे हादगाव, वडीगोद्री, धाकलगाव परिसरातील नुकसानीची पाहणी केली.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीRevenue Departmentमहसूल विभाग