शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
3
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
4
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
5
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
6
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
7
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
8
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
10
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
11
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
12
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
13
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
14
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
15
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
16
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
17
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
18
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
19
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
20
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम

चार लाख ३३ हजार हेक्टर क्षेत्राला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 00:43 IST

परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल ४ लाख ३३ हजार हेक्टरवरील खरीप पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज सर्वेक्षणात समोर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल ४ लाख ३३ हजार हेक्टरवरील खरीप पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज सर्वेक्षणात समोर आला आहे. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्हा प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनला कोंब फुटले असून, मक्यासह कपाशीला मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे काही भागातील पिके पाण्यात आली असून, नदीकाठच्या शेतातील जमीनही वाहून गेली आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील संपूर्ण म्हणजेच ९७२ गावे अतिवृष्टीने बाधित झाली असून, एकूण ६ लक्ष १५ हजार हेक्टरपैकी ४ लक्ष ३३ हजार हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीने बाधित झाले आहे. जिल्ह्यातील जवळपास ५ लाखापेक्षा जास्त शेतकºयांचे यात जवळपास ३२६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे. यात कापूस, मका, सोयाबीन, बाजरी या पिकांचा पीकविमा जिल्ह्यातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात भरला आहे. संबंधित विमा कंपनी व कृषी विभागाने संयुक्त नुकसानीचे मुल्यांकन करण्याबाबत लोणीकर यांनी सूचना दिल्या.लोणीकर यांनी बदनापूर तालुक्यातील भरडखेडा येथील सुभाष खुरमुढे यांच्या शेतातील पिकांची प्रशासकीय अधिकाºयांसमवेत पाहणी केली. यावेळी आ. नारायण कुचे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषद सभापती भानुदास घुगे, जिल्हा कृषी अधिकारी शिंदे, तहसीलदार छाया पवार, बद्रीनाथ पठाडे, वसंतराव जगताप, भगवान बारगजे, प्रताप शिंदे, सरपंच बबनराव बारगजे, जगन्नाथ बारगजे, विनायक दराडे, विष्णू दराडे, कृष्णा दराडे, वाल्मिक दराडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.बैलगाडीतून केली नुकसानीची पाहणी...वडीगोद्री : वडीगोद्री व परिसरातील सोयाबीन, बाजरी, कापूस व तूर आदी पिकांच्या नुकसानीची अंबडचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार मनीषा मेने यांच्यासह प्रशासकीय अधिकाºयांनी पाहणी करून पंचनामे केले. साष्टपिंपळगाव येथे बाधित क्षेत्राची पाहणी करण्यासाठी पथक गेले. मात्र, शेत रस्त्यात दोन ते तीन फूट पाणी व चिखल होता. त्यामुळे शशिकांत हदगल, मनीषा मेने यांनी बैलगाडीत बसून प्रत्यक्ष बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली.तसेच पाथरवाला खुर्द येथे जवळपास दीड ते दोन किलोमीटर चिखल तुडवत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतक-यांनी आपल्या व्यथा मांडल्या. दरम्यान, अंबड तालुका कृषी अधिकारी भीमराव वैद्य यांच्यासह पथकाने घुंगर्डे हादगाव, वडीगोद्री, धाकलगाव परिसरातील नुकसानीची पाहणी केली.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीRevenue Departmentमहसूल विभाग