शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

चार लाख ३३ हजार हेक्टर क्षेत्राला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 00:43 IST

परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल ४ लाख ३३ हजार हेक्टरवरील खरीप पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज सर्वेक्षणात समोर आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल ४ लाख ३३ हजार हेक्टरवरील खरीप पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज सर्वेक्षणात समोर आला आहे. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्हा प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीनला कोंब फुटले असून, मक्यासह कपाशीला मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे काही भागातील पिके पाण्यात आली असून, नदीकाठच्या शेतातील जमीनही वाहून गेली आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील संपूर्ण म्हणजेच ९७२ गावे अतिवृष्टीने बाधित झाली असून, एकूण ६ लक्ष १५ हजार हेक्टरपैकी ४ लक्ष ३३ हजार हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीने बाधित झाले आहे. जिल्ह्यातील जवळपास ५ लाखापेक्षा जास्त शेतकºयांचे यात जवळपास ३२६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे. यात कापूस, मका, सोयाबीन, बाजरी या पिकांचा पीकविमा जिल्ह्यातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात भरला आहे. संबंधित विमा कंपनी व कृषी विभागाने संयुक्त नुकसानीचे मुल्यांकन करण्याबाबत लोणीकर यांनी सूचना दिल्या.लोणीकर यांनी बदनापूर तालुक्यातील भरडखेडा येथील सुभाष खुरमुढे यांच्या शेतातील पिकांची प्रशासकीय अधिकाºयांसमवेत पाहणी केली. यावेळी आ. नारायण कुचे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषद सभापती भानुदास घुगे, जिल्हा कृषी अधिकारी शिंदे, तहसीलदार छाया पवार, बद्रीनाथ पठाडे, वसंतराव जगताप, भगवान बारगजे, प्रताप शिंदे, सरपंच बबनराव बारगजे, जगन्नाथ बारगजे, विनायक दराडे, विष्णू दराडे, कृष्णा दराडे, वाल्मिक दराडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.बैलगाडीतून केली नुकसानीची पाहणी...वडीगोद्री : वडीगोद्री व परिसरातील सोयाबीन, बाजरी, कापूस व तूर आदी पिकांच्या नुकसानीची अंबडचे उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार मनीषा मेने यांच्यासह प्रशासकीय अधिकाºयांनी पाहणी करून पंचनामे केले. साष्टपिंपळगाव येथे बाधित क्षेत्राची पाहणी करण्यासाठी पथक गेले. मात्र, शेत रस्त्यात दोन ते तीन फूट पाणी व चिखल होता. त्यामुळे शशिकांत हदगल, मनीषा मेने यांनी बैलगाडीत बसून प्रत्यक्ष बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली.तसेच पाथरवाला खुर्द येथे जवळपास दीड ते दोन किलोमीटर चिखल तुडवत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतक-यांनी आपल्या व्यथा मांडल्या. दरम्यान, अंबड तालुका कृषी अधिकारी भीमराव वैद्य यांच्यासह पथकाने घुंगर्डे हादगाव, वडीगोद्री, धाकलगाव परिसरातील नुकसानीची पाहणी केली.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीRevenue Departmentमहसूल विभाग