शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

शंभर-दीडशे लोकांसाठी ६ कोटी समाजाचे नुकसान करणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 19:31 IST

३० तारखेला बैठक घेणार आहे. यात दलित, मुस्लिम, मराठा काय निर्णय निघतो, हे बघणे महत्त्वाचे आहे.

वडीगोद्री ( जालना) : शंभर-दीडशे लोकांसाठी माझ्या सहा कोटी समाजाचे नुकसान करणार नाही. आपण शंभर लोक एकत्र आलो, म्हणजे सगळे होते तसे जमत नाही. कुठलाही निर्णय घेऊन माझ्या समाजाचे मी नुकसान करणार नाही, असे सूचक वक्तव्य मनोज जरांगे यांनी केले आहे. सोमवारी मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे माध्यमांशी संवाद साधला.

मराठा, मुस्लिम, दलित एकत्र यायला पाहिजे, यामुळे राज्यात शंभर टक्के परिवर्तन होऊ शकते, त्यासाठी समीकरण जुळणे अत्यंत आवश्यक आहे. समीकरण जुळवणे सुरू आहे. एका जातीवर निवडणूक लढवल्या जात नसल्याचे मनोज जरांगे म्हणाले.

सध्या कोणालाच पाठिंबा नाही३० तारखेला बैठक घेणार आहे. यात दलित, मुस्लिम, मराठा काय निर्णय निघतो, हे बघणे महत्त्वाचे आहे. निर्णय ३० ऑक्टोबर किंवा १ नोव्हेंबरला होईल, असे जरांगे म्हणाले. राज्यात आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. जालना जिल्ह्याचा निर्णय झाला होता, एकपण फॉर्म भरायचा नाही, आता सांगितले आहे सर्वांनी फॉर्म भरावे, असे मनोज जरांगे म्हणाले.

आमचे हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांचेमनोज जरांगे यांनी मुस्लिम धर्मगुरूंची नुकतीच भेट घेतली होती. यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. याविषयी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, नवाब शरीफच्या मुलीच्या लग्नाला मोदीसाहेब नुकती खायला गेले होते का?, तुम्ही दर्गात जाता तुम्हाला जमते, आम्ही गेले की जमत नाही. मराठा, मुस्लिम, दलित या तीन समाजांच्या नादी लागायचे नाही. आमचे हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे, असे म्हणत मनोज जरांगे यांनी पंतप्रधान मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील