शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

उन्हाने फुलशेती कोमेजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 00:45 IST

दिवसेंदिवस उन्हाची तिव्रता वाढत असल्याने फुलेही कासावीस झाली असून ‘फुलशेती’ अडचणीत आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : दिवसेंदिवस उन्हाची तिव्रता वाढत असल्याने फुलेही कासावीस झाली असून ‘फुलशेती’ अडचणीत आली आहे.तालुक्यात ‘फुलशेती’ करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. या ठिकाणाहून फुले हैदराबाद, औरंगाबाद, जालनासह अन्य मोठमोठ्या शहरांत जातात. तालुुक्यातील वलखेड, चिंचोली, सालगाव, उस्मानपूर, बाबई, वरफळ, बामणीसह काही गावात फुलांची शेती शेतकरी करतात. यामध्ये गुलाब, निशिगंध, शेवंती, गलांडा, मोगरा, काकडा या फुलांची प्रामुख्याने शेती केली जाते. यातून शेतकऱ्यांना नगदी पैसा मिळण्याबरोबरच शेतीला जोड धंदाही होतो. सध्या सर्वच फुलांना चांगला भाव आहे. दीडपट भाव मिळत असल्याचे शेतकरी सांगतात.या फुलांच्या व्यवसायातून शेतक-यांना पैसाही मिळत आहे. मात्र, यावर्षी पाऊसच कमी झाल्याने जल साठ्यांनी तळ गाठला आहे. बोअर, विहिरी आटत आहेत. कधीच न आटणारे बोअर या वर्षी हबकले आहेत. यामुळे पिके तर सोडाच; पण जनावरे व माणसांना पाणी मिळणे अवघड होण्याची भीती आहे. यामुळे तालुक्यात असलेली फुलशेतीही शेवटच्या घटका मोजत आहे. फूल झाडांची महागाची आणून लावलेली रोपे व लगडलेली फुले करपून माना टाकू लागली आहेत. उन्हाची वाढती तीव्रता व पाण्याची अडचण यामुळे फूलशेती धोक्यात आली आहे. सद्या फुलाला चांगला भाव मिळत असला तरी, उन्हाने ती करपत आहे. त्यामुळे फुलांची प्रत खराब होण्याबरोबच उत्पन्नातही घट होत आहे. उन्हाच्या चटक्याने व शुष्क झालेल्या वातावरणाने फुले सुकली आहेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रdroughtदुष्काळFarmerशेतकरी