शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

घनसावंगीत भडका; इतरत्र शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:51 IST

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून जिल्ह्यातील घनसावंगी येथे मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास झालेल्या आंदोलनास हिंसक वळण लागले. यावेळी पोलीस ठाण्यासमोरील तीन दुचाकींसह अंबड येथून आलेला अग्निशमन दलाचा बंब पेटवून देण्यात आला. यावेळी हवेत गोळीबार करावा लागल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. या दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून जिल्ह्यातील घनसावंगी येथे मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास झालेल्या आंदोलनास हिंसक वळण लागले. यावेळी पोलीस ठाण्यासमोरील तीन दुचाकींसह अंबड येथून आलेला अग्निशमन दलाचा बंब पेटवून देण्यात आला. यावेळी हवेत गोळीबार करावा लागल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. या दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी झाले. दरम्यान जालना, भोकरदन, अंबड, मंठा, बदनापूर आणि जाफराबाद, परतूर येथे कडकडीत बंद पाळून काही ठिकाणी मोर्चा काढून अघिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या बंदमुळे एसटी वाहतूकीवरही परिणाम झाला असून, अनेक ठिकाणचे व्यवहार ठप्प झाले होते.जालन्यातील तिरडी आंदोलनात आरक्षण देण्यास विलंब लागत असल्याने सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. अंबड चौफुली येथे या प्रतिकात्मक अंत्ययात्रेला अग्निडाग देण्यात आला. समाजातील महिलांनी आरक्षणाच्या मुद्यावरून विचार व्यक्त करत मराठा समाजाची होत असलेली कुंचबना थांबविण्याची कळकळीची विनंती केली. त्यासाठी समाजाने शांततापूर्ण संघर्षाची तयारी ठेवण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. यावेळी सराफा बाजार व अन्य व्यापारी प्रतिष्ठाने मंगळवारी पूर्णत: बंद होती.घनसावंगीत दगडफेक व जाळपोळघनसावंगी : आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदला घनसावंगीसह तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला. मंगळवारी सकाळी येथे सभा सुरू असताना अचानक दगडफेक आणि आराडा-ओरड झाल्याने मोठा गोंधळ उडाला. यावेळी पोलीस ठाणे तसेच तहसीलसह अन्य कार्यालयावर प्रचंड दगडफेक केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी प्रारंभी जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी अश्रूधुराचे नळकांडे फोडले. मात्र, जमाव शांत नसल्याचे दिसताच पोलिसांनी हवेत गोळीबार केला. यावेळी जवळपास अर्धा तास एकच गोंधळ उडाला होता. जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात येत असल्याने पोलिसांनी माघार घेत पोलीस ठाणे गाठले. याची माहिती पोलीसांनी तातडीने पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांना दिल्यावर त्यांनी राज्य राखीव दलाची एक तुकडी, दंगा नियंत्रण पथकाला रवाना केले. पोलिसांची जादा कुमक आल्यावर वातावरण शांत झाले. याचे पडसाद दिवसभर दिसून आले. पोलीसांनी सायंकाळी ६ जणांना अटक केली. सकाळी २० अश्रूधूराच्या नळकांड्या, पाच हँडग्रेनेड तसेच हवेत गोळीबारही करण्यात आला. दरम्यान या दंगलीमागे नेमके कोण आहेत, याचा शोध गुप्तचरांनी घेतला असून, त्यांची नावे लवकरच पुढे येतील असे सांगण्यात आले.जालना : तिरडी मोर्चाला समाज बांधवांचा मोठा प्रतिसादमराठा आरक्षणाच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तिरडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर समाजबांधव सहभागी झाले होते. मोर्चाचे रूपांतर अंबड चौफुली येथे सभेत झाले. यावेळी मूक मोर्चाप्रमाणेच समाजातील महिलांनी प्रथम आपल्या मागण्या भाषानातून धारदारपणे मांडल्या. या मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिका-यांनी यावे असा आग्रह मोर्चातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतल्याने काहीकाळ किरकोळ वाद झाला. निवेदन स्विकारण्यासाठी जालन्याचे उपविभागीय अधिकारी केशव नेटके, तहसीलदार बिपीन पाटील हे उपस्थित होते.पोलीस अधीक्षकांची भेटघनसावंगी येथे झालेल्या दंगलीनंतर सायंकाळी पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या सोबत अंबडचे पोलीस उपविभागीय अधिकारी सी.डी. शेवगण, पोलीस निरीक्षक बंटेवाड व अन्य पोलीस कर्मचा-यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाagitationआंदोलन