शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

सरकारची आर्थिक घडी विस्कटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 01:11 IST

शासनाच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे समाजातील विविध घटकांच्या जातीय आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी अंबड येथील मत्स्योदरी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : शासनाच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे समाजातील विविध घटकांच्या जातीय आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी अंबड येथील मत्स्योदरी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात केले.मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी खा. स्व. अंकुशराव टोपे यांचा अर्धाकृती पुतळा अनावरण व मत्स्योदरी महाविद्यालयाच्या विज्ञान भवन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात आ. पाटील बोलत होते.पुढे बोलताना प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, मागील दोन दशकांमध्ये शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढले आहे, लोकसंख्येच्या प्रमाणात सुशिक्षितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. साहजिकच शिक्षित तरूण नोकरीच्या शोधात असतात. परंतू, सरकारी ऐवजी खाजगीमध्ये नोकरीच्या संधी उलपब्ध आहेत. त्यामुळे तेथे मिळेल ती नोकरी करण्याकडे बेरोजगारांचा कल असतो. दरम्यान, सरकारी नोकरी मिळावी यासाठी देखील सुशिक्षित बेरोज गारांकडून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तयारी केली जाते. परंतू, आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यावर त्यांचा हिरमोड होतो. सध्या, आरक्षणाच्या मागणीवरून महाराष्ट्रासह देशात वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या जातींकडून आरक्षणाची मागणी केली जात आहे. परंतु ही मागणी पूर्ण करतांना आर्थिक घडी विस्कटलेली असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जगभरातील कोणत्याही क्षेत्रात ज्ञानी व्यक्तीसाठी संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी तुमच्याकडे ती पात्रता असणे आवश्यक असल्याचे आ. जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेश टोपे यांनीही सविस्तर विचार मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, माजी आ. चंद्रकांत दानवे, उत्तम पवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश टोपे, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोज मरकड, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख यांच्यासह रा. काँ. कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलSocialसामाजिक