शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

सरकारची आर्थिक घडी विस्कटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 01:11 IST

शासनाच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे समाजातील विविध घटकांच्या जातीय आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी अंबड येथील मत्स्योदरी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : शासनाच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे समाजातील विविध घटकांच्या जातीय आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी अंबड येथील मत्स्योदरी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात केले.मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी खा. स्व. अंकुशराव टोपे यांचा अर्धाकृती पुतळा अनावरण व मत्स्योदरी महाविद्यालयाच्या विज्ञान भवन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात आ. पाटील बोलत होते.पुढे बोलताना प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, मागील दोन दशकांमध्ये शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढले आहे, लोकसंख्येच्या प्रमाणात सुशिक्षितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. साहजिकच शिक्षित तरूण नोकरीच्या शोधात असतात. परंतू, सरकारी ऐवजी खाजगीमध्ये नोकरीच्या संधी उलपब्ध आहेत. त्यामुळे तेथे मिळेल ती नोकरी करण्याकडे बेरोजगारांचा कल असतो. दरम्यान, सरकारी नोकरी मिळावी यासाठी देखील सुशिक्षित बेरोज गारांकडून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तयारी केली जाते. परंतू, आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यावर त्यांचा हिरमोड होतो. सध्या, आरक्षणाच्या मागणीवरून महाराष्ट्रासह देशात वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या जातींकडून आरक्षणाची मागणी केली जात आहे. परंतु ही मागणी पूर्ण करतांना आर्थिक घडी विस्कटलेली असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जगभरातील कोणत्याही क्षेत्रात ज्ञानी व्यक्तीसाठी संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी तुमच्याकडे ती पात्रता असणे आवश्यक असल्याचे आ. जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेश टोपे यांनीही सविस्तर विचार मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, माजी आ. चंद्रकांत दानवे, उत्तम पवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश टोपे, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोज मरकड, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख यांच्यासह रा. काँ. कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलSocialसामाजिक