शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

सरकारची आर्थिक घडी विस्कटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 01:11 IST

शासनाच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे समाजातील विविध घटकांच्या जातीय आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी अंबड येथील मत्स्योदरी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : शासनाच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे समाजातील विविध घटकांच्या जातीय आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी मंगळवारी अंबड येथील मत्स्योदरी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात केले.मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी खा. स्व. अंकुशराव टोपे यांचा अर्धाकृती पुतळा अनावरण व मत्स्योदरी महाविद्यालयाच्या विज्ञान भवन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात आ. पाटील बोलत होते.पुढे बोलताना प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, मागील दोन दशकांमध्ये शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढले आहे, लोकसंख्येच्या प्रमाणात सुशिक्षितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. साहजिकच शिक्षित तरूण नोकरीच्या शोधात असतात. परंतू, सरकारी ऐवजी खाजगीमध्ये नोकरीच्या संधी उलपब्ध आहेत. त्यामुळे तेथे मिळेल ती नोकरी करण्याकडे बेरोजगारांचा कल असतो. दरम्यान, सरकारी नोकरी मिळावी यासाठी देखील सुशिक्षित बेरोज गारांकडून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तयारी केली जाते. परंतू, आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यावर त्यांचा हिरमोड होतो. सध्या, आरक्षणाच्या मागणीवरून महाराष्ट्रासह देशात वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या जातींकडून आरक्षणाची मागणी केली जात आहे. परंतु ही मागणी पूर्ण करतांना आर्थिक घडी विस्कटलेली असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जगभरातील कोणत्याही क्षेत्रात ज्ञानी व्यक्तीसाठी संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी तुमच्याकडे ती पात्रता असणे आवश्यक असल्याचे आ. जयंत पाटील यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेश टोपे यांनीही सविस्तर विचार मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, माजी आ. चंद्रकांत दानवे, उत्तम पवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश टोपे, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोज मरकड, जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख यांच्यासह रा. काँ. कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलSocialसामाजिक