शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

...अखेर परभणीकडे जाणारे पाणी थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:56 AM

निम्न दुधना प्रकल्पातून मागील नऊ दिवसापासून परभणीकडे सुरू असलेला पाण्याचा विसर्ग बुधवारी थांबवण्यात आला असून, आता धरणात केवळ २०.५ टक्के जिवंत पाणीसाठा राहीला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : निम्न दुधना प्रकल्पातून मागील नऊ दिवसापासून परभणीकडे सुरू असलेला पाण्याचा विसर्ग बुधवारी थांबवण्यात आला असून, आता धरणात केवळ २०.५ टक्के जिवंत पाणीसाठा राहीला आहे.परभणी व पूर्णा शहराची तहान भागवण्यासाठी या निम्न दुधना प्रकल्पातून खाली पात्रात पाणी सोडण्यात आले होते. फेबु्रवारी महिन्यातच परभणी व पूर्णा या शहरावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले होते.शहराच्या पाणी टंचाई निवारणार्थ या प्रकल्पातून तिसऱ्यांदा पाणी सोडण्यात आले आहे. ८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता चार दरवाजातून सुरू करण्यात आलेला विसर्ग बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास थांबविण्यात आला. यामुळे आता या धरणात २०.५ टक्के जिवंत साठा आहे तर एकूण ४५ टक्के पाणीसाठा आहे.या धरणावर परतूर सेलूसह अनेक खेड्यांची तहान अवलंबून आहे. त्यामुळे या धरणातील पाण्याचा अवैध उपसा व अपव्यय टाळणे गरजेचे आहे.निम्न दुधना प्रकल्प हा ख-या अर्थाने जालना जिल्ह्यात असला तरी त्याचा प्रत्यक्ष लाक्ष हा प्रारंभीपासूनच परभणी, नांदेड जिल्ह्यातील काही भागाला होत आहे. जालना जिल्ह्याला या प्रकल्पातील केवळ बॅकवॉटरवर समाधान मानावे लागत आहे. आतापर्यंत या प्रकल्पावर जवळपास १ हजार कोटीपेक्षा अधिक खर्च झालेला आहे. यामुळे जालना जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष भरून निघाल्यासारखे दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र हा प्रकल्प परभणी जिल्ह्यासाठी त्यावेळी तयार करण्यात आला होता की काय अशी शंका व्यक्त आहे. जेवढे पाणी सध्या शिल्लक आहे ते आता परतूर तालुक्यासाठी राखून ठेवण्याची मागणीही शेतक-यांनी केली आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी