शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पाचवीला पुजलेली ऊसतोडीच जिवावर बेतली; पती जागीच ठार, पत्नी गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 13:59 IST

जालन्याकडे येणाऱ्या पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिली, यात दोघांचा जागीच मृत्यू झाला

- राहुल वरशिळजालना : घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे आई-वडिलांपासून परगावी जाऊन ऊसतोडीचे काम करणाऱ्या ऊसतोड कामगाराच्या दुचाकीला (क्र. एमच २१ सीई ०९८३) शुक्रवारी लोंढेवाडीजवळ पिकअप (क्र. एमएच-२८, एबी-२६३९) गाडीने धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला, तर एकाची पत्नी जखमी झाली. संजय साळवे (वय ४२), विष्णू वरशिळ (वय ४८, दोघेही रा. देळेगव्हाण, ता. जाफराबाद) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. संजयची पत्नी छाया (वय ३६) गंभीर जखमी आहे. त्यामुळे आई-वडिलांपासून पाचवीलाच पुजलेल्या ऊसतोडीनेच जीव घेतल्याची चर्चा गावात सुरू होती.

आता आई रुख्मिणीबाई व वडील जगन साळवे गावातच मोलमजुरी करतात. त्यांची दोन्ही मुले ऊसतोडीला जातात. यंदा घनसावंगी तालुक्यात गेलेला धाकटा मुलगा संजय दोन दिवसांपूर्वी कामानिमित्त पत्नीसह घरी आला होता. काम आटोपून शुक्रवारी पत्नीसह अन्य एकाला दुचाकीवर घेऊन जात होता. यादरम्यान, लोंढेवाडीजवळ जालन्याकडे येणाऱ्या पिकअपने त्यांना जोराची धडक दिली. यात संजयच्या डोक्यावरून चाक गेले, तर विष्णूच्या डोक्याला मार लागल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. संजयची पत्नी छाया जखमी असून, तिच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत उपचार सुरू आहेत. संजयच्या पश्चात आई-वडील, चार बहिणी, भाऊ, पत्नी, मुलगा, भावजई, पुतण्या असा परिवार आहे.

मेहुणीला पैसे देण्यासाठी आले होते गावीपत्नी छायाच्या बहिणीची मुलगी प्रसूती झाल्यामुळे मेहुणीने संजयकडे पैशाची मागणी केली होती. परंतु, पैसे नसल्याने संजय पत्नीसह दोन दिवसांपूर्वी देळेगव्हाण येथे आला होता. छाया हिने खासगी बँकेकडून कर्ज घेण्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर संजयने हातउसनवारी म्हणून दहा हजार रुपये घेऊन शुक्रवारी पुन्हा ऊसतोडीकडे निघाले होते. दरम्यान, हा अपघात झाला अन् होत्याचं नव्हतं झालं.

साेबत गेलेे; पण घरीच आले नाहीमी तुम्हाला सोडविण्यासाठी येतो, असे म्हणून विष्णू वरशिळ (पंथ) हे त्यांच्या सोबत गेले होते. मात्र, रस्त्यातच काळाने घाला घातल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गावात पंथ या नावाने ते परिचत होते. त्यांच्या पश्चात वडील, पाच भाऊ, दोन बहिणी, भावजई, पुतण्या, काका असा परिवार आहे.

पत्नीवर कोसळला दु:खाचा डोंगरगेल्या दीड वर्षापूर्वी मोठ्या मुलाचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला. त्या दु:खातून छाया कसेबसे सावतरत नाही, तोच पुन्हा पतीचा मृत्यू झाला. त्यामुळे तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

टॅग्स :AccidentअपघातJalanaजालनाDeathमृत्यू