शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
4
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
5
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
6
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
7
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
8
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
9
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
10
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
11
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
12
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
13
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
14
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
15
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
16
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
17
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
18
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
19
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
20
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त

स्टील उद्योगाचे पितामह पित्ती कालवश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:41 IST

जालन्यात स्टील उद्योगाची मुहूर्तमेढ महेंद्र रि रोलिंग मिल या नावाने रोवणाऱ्या शांतीलाल पित्ती यांना स्टीलचे पितामह म्हणून ओळखले जात होते. त्यांचे गुरूवारी हृदयविकाराने निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्यात स्टील उद्योगाची मुहूर्तमेढ महेंद्र रि रोलिंग मिल या नावाने रोवणाऱ्या शांतीलाल पित्ती यांना स्टीलचे पितामह म्हणून ओळखले जात होते. त्यांचे गुरूवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांनी अत्यंत विपरीत परिस्थितीत त्यांनी अवघ्या दोन लाख रूपयांच्या गुंतवणुकीवर सुरू केलेला एसआरजे स्टील उद्योग समूहाने गेल्या ४८ वर्षात एक हजार कोटी रूपयांच्या उलाढालीपर्यंत मजल मारली आहे.शांतीलाल पित्ती यांचे वडील गोवर्धनदास पित्ती हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून जालन्यात वास्तव्यास होते. पूर्वी पित्ती परिवाराचा जालना ट्रान्सपोर्ट या नावाने वाहतूकीचा व्यवसाय होता. त्यावेळी त्यांचेकडे १६ ट्रक होते. शांतीलाल पित्ती यांचे शिक्षण बी. कॉम. पर्यंत झाले होते. १९७१ मध्ये रोटी, कपडा और मकान या त्रिसुत्रीला स्टील उद्योगात त्यांनी लक्ष घातले. तेव्हापासून आजपर्यंत या उद्योगास ते आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांनी वेगवेगळे तंत्रज्ञान आणून उद्योगाचा विकास केला. १९८४ मध्ये एसआरजे या नावाने उद्योग उभारला. यामध्ये पूर्वी कार्बन, मॅगनीज, फॉस्फरसचा वापर करून स्टीलची निर्मीती केली जात होती. परंतु, नंतर मोठा मुलगा सुरेंद्र याचे मेट्रलजी इंजिनिअरींग पूर्ण करून त्यांनी तसेच अन्य दोन भाऊ रवींद्र आणि जितेंद्र यांनी या व्यवसायाची जवाबदारी सांभाळली. त्यांनी या स्टील कारखान्यात आणखी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणून पूर्वी कोळशावर चालणारी थर्मेस कोलकत्ता येथून ८५ लाख रूपये खर्च करून आणली. तेव्हापासून एसआरजे स्टीलच्या उत्पादन आणि दर्जात लक्षणीय वाढ झाली. मध्यंतरी कामगारांनी मोठा संप केल्यानंतर आमचा उद्योग अडचणीतही सापडला होता. परंतु, सर्वांच्या मदतीने यात तोडगा काढून स्टील उद्योग चालूच ठेवला. १९९२ मध्ये पुन्हा फर्नेस मध्ये बदल करून फ्रान्स येथून ५० मे. टन उत्पादन करणारी ही भट्टी एसआरजे स्टीलमध्ये कार्यान्वित करण्यात आली. १९९५ मध्ये याच तीन भावांनी श्री ओम रोलिंग मिलची स्थापना केली. दररोज ५० मे. टन उत्पादनातून आमच्या उद्योगाची वार्षिक उलाढाल ४०० कोटी रूपयांवर पोहोचली होती. ती आज एक हजार कोटी रूपयांच्या घरात पोहचली त्यासाठी शांतीलाल पित्ती यांची दूरदृष्टी महत्वाची होती. एकूणच जालना जिल्ह्यातील उद्यमशिलतेला चालना देण्यासाठी या परिवाराचा आणि विशेष करून शांतीलाल पित्ती यांचा यात सिहांचा वाटा होता.स्टील उत्पादनात ज्या प्रमाणे पित्ती परिवाराने जालन्यात श्री गणेशा केला होता. त्याच धर्तीवर मराठवाड्यात प्रथम बिस्कीटचे उत्पादन करणारा दिव्या एसआरजे ही कंपनी जालना-रामनगर मार्गावर २५ कोटी रूपयांची गुंतवणूक करून उभारली आहे. या बिस्कीट कंपनीमध्ये अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नामांकीत ब्रॅण्डचे उत्पादन केले जाते.

टॅग्स :MIDCएमआयडीसीDeathमृत्यूbusinessव्यवसाय