शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

स्टील उद्योगाचे पितामह पित्ती कालवश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:41 IST

जालन्यात स्टील उद्योगाची मुहूर्तमेढ महेंद्र रि रोलिंग मिल या नावाने रोवणाऱ्या शांतीलाल पित्ती यांना स्टीलचे पितामह म्हणून ओळखले जात होते. त्यांचे गुरूवारी हृदयविकाराने निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालन्यात स्टील उद्योगाची मुहूर्तमेढ महेंद्र रि रोलिंग मिल या नावाने रोवणाऱ्या शांतीलाल पित्ती यांना स्टीलचे पितामह म्हणून ओळखले जात होते. त्यांचे गुरूवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांनी अत्यंत विपरीत परिस्थितीत त्यांनी अवघ्या दोन लाख रूपयांच्या गुंतवणुकीवर सुरू केलेला एसआरजे स्टील उद्योग समूहाने गेल्या ४८ वर्षात एक हजार कोटी रूपयांच्या उलाढालीपर्यंत मजल मारली आहे.शांतीलाल पित्ती यांचे वडील गोवर्धनदास पित्ती हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून जालन्यात वास्तव्यास होते. पूर्वी पित्ती परिवाराचा जालना ट्रान्सपोर्ट या नावाने वाहतूकीचा व्यवसाय होता. त्यावेळी त्यांचेकडे १६ ट्रक होते. शांतीलाल पित्ती यांचे शिक्षण बी. कॉम. पर्यंत झाले होते. १९७१ मध्ये रोटी, कपडा और मकान या त्रिसुत्रीला स्टील उद्योगात त्यांनी लक्ष घातले. तेव्हापासून आजपर्यंत या उद्योगास ते आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांनी वेगवेगळे तंत्रज्ञान आणून उद्योगाचा विकास केला. १९८४ मध्ये एसआरजे या नावाने उद्योग उभारला. यामध्ये पूर्वी कार्बन, मॅगनीज, फॉस्फरसचा वापर करून स्टीलची निर्मीती केली जात होती. परंतु, नंतर मोठा मुलगा सुरेंद्र याचे मेट्रलजी इंजिनिअरींग पूर्ण करून त्यांनी तसेच अन्य दोन भाऊ रवींद्र आणि जितेंद्र यांनी या व्यवसायाची जवाबदारी सांभाळली. त्यांनी या स्टील कारखान्यात आणखी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणून पूर्वी कोळशावर चालणारी थर्मेस कोलकत्ता येथून ८५ लाख रूपये खर्च करून आणली. तेव्हापासून एसआरजे स्टीलच्या उत्पादन आणि दर्जात लक्षणीय वाढ झाली. मध्यंतरी कामगारांनी मोठा संप केल्यानंतर आमचा उद्योग अडचणीतही सापडला होता. परंतु, सर्वांच्या मदतीने यात तोडगा काढून स्टील उद्योग चालूच ठेवला. १९९२ मध्ये पुन्हा फर्नेस मध्ये बदल करून फ्रान्स येथून ५० मे. टन उत्पादन करणारी ही भट्टी एसआरजे स्टीलमध्ये कार्यान्वित करण्यात आली. १९९५ मध्ये याच तीन भावांनी श्री ओम रोलिंग मिलची स्थापना केली. दररोज ५० मे. टन उत्पादनातून आमच्या उद्योगाची वार्षिक उलाढाल ४०० कोटी रूपयांवर पोहोचली होती. ती आज एक हजार कोटी रूपयांच्या घरात पोहचली त्यासाठी शांतीलाल पित्ती यांची दूरदृष्टी महत्वाची होती. एकूणच जालना जिल्ह्यातील उद्यमशिलतेला चालना देण्यासाठी या परिवाराचा आणि विशेष करून शांतीलाल पित्ती यांचा यात सिहांचा वाटा होता.स्टील उत्पादनात ज्या प्रमाणे पित्ती परिवाराने जालन्यात श्री गणेशा केला होता. त्याच धर्तीवर मराठवाड्यात प्रथम बिस्कीटचे उत्पादन करणारा दिव्या एसआरजे ही कंपनी जालना-रामनगर मार्गावर २५ कोटी रूपयांची गुंतवणूक करून उभारली आहे. या बिस्कीट कंपनीमध्ये अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नामांकीत ब्रॅण्डचे उत्पादन केले जाते.

टॅग्स :MIDCएमआयडीसीDeathमृत्यूbusinessव्यवसाय