शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

शेतकऱ्यांची लूट होणार नाही -लोणीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:45 AM

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : दुष्काळाने होरपळणtया शेतकरी नव्या उमेदीने पुन्हा एकदा आगामी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळाने होरपळणtया शेतकरी नव्या उमेदीने पुन्हा एकदा आगामी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे त्यांची फसवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच बाजारातील बोगस बियाणे, बनावट खतांची विक्री होणार नाही याची दक्षता घेण्यासह शेतकऱ्यांची लूट होणार नाही यासाठी वाटेल ते करा, मी तुमच्या पाठीशी आहे, असे आश्वासन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी शनिवारी झालेल्या खरीप हंगाम आढावा बैठकीत दिले.जालना जिल्हा खरीप हंगामाच्या पूर्वतयारीचा आढावा लोणीकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. यावेळी आ. नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, कृषी अधीक्षक बाळासाहेब शिंदे, विजय माईनकर यांच्यासह जि.प.च्या मुख्याधिकारी निमा अरोरा, कृषी विस्तार अधिकारी झनझन पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी यंदा जालना जिल्ह्यात जवळपास सहा लाख हेक्टरवर पेरणी होणार आहे. त्यासाठी बीटी बियाणांची जवळपास ११ लाख पाकिटे उपलब्ध असून, त्यांच्या विक्रीला प्रारंभ करण्यात आला आहे. सोयाबीन, मूग, मका इ. ची लागवड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर होत असून, तुरीलाही शेतकरी प्राधान्य देतो, असे शिंदे यांनी सांगितले. जिल्ह्यात सध्या खते, बियाणांचा मुबलक साठा असल्याचेही यावेळी कृषी विभागाने सांगितले. शेतकºयांची लूट थांबवण्यासाठी ९ भरारी पथकांची स्थापना करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. खतांची लिंकिंग होणार नाही, याची दक्षता घेण्याचे सांगून, पीककर्ज तातडीने वाटप करण्यासाठी नियोजन करावे असेही त्यांनी स्पष्ट केले.बाजारपेठ शेतक-यांसाठी सज्जयंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे बाजारपेठेत बियाणे, खत विक्रेते सज्ज झाले आहेत. यंदा कुठल्याही बियाणांची टंचाई जाणवणार नाही, असे कृषी खात्याकडून आढावा बैठकीत सांगण्यात आले. दुष्काळी वातावरण असल्याने ही बैठक नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाची होती. शेतक-यांनी बियाणे, खते खरेदी करताना पावती आवश्य घ्यावी, अशा सूचना सर्व विक्रेते तसेच शेतक-यांना दिल्या आहेत. या संदर्भात कृषी सहाय्यकांनाही गावागावात ही सूचना पोहोचविण्याचे काम दिले आहे. बीटी बियाणे, सोयाबीन आणि तूर, मूग इ. बियाणांची मुबलकता महाबीजकडून करण्यात आली आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रBabanrao Looneykarबबनराव लोणीकरMonsoon Specialमानसून स्पेशल