शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

जनुकीय तंत्रज्ञान वापरण्याचे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य हवे : मायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:57 IST

डॉ. मायी म्हणाले की, २०५० पर्यंत भारताची लोकसंख्या १७० कोटीपर्यंत होऊ शकते. या वाढत्या लोकसंख्येला पोसण्यासाठी जनुकीय पिकांशिवाय पर्याय ...

डॉ. मायी म्हणाले की, २०५० पर्यंत भारताची लोकसंख्या १७० कोटीपर्यंत होऊ शकते. या वाढत्या लोकसंख्येला पोसण्यासाठी जनुकीय पिकांशिवाय पर्याय नाही. सध्या जगामध्ये सर्व प्रकारची फळे, भाजीपाला व अन्नधान्य पिकांमध्ये जनुकीय तंत्रज्ञानाचा अवलंब करून वाढत्या लोकसंख्येच्या गरजेनुसार उत्पादन घेतले जात आहे. भारतामध्ये कापूस पिकांपर्यंतच मर्यादित राहिला असून, वांगी, भेंडी, बटाटा, तांदूळ, मका, मोहरी, केळी यांसारख्या पिकांमध्ये जनुकीय तंत्रज्ञानास विरोध होत असल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण भरघोस उत्पन्न घ्यावयाचे असल्यास जनुकीय तंत्रज्ञानास शासनाने परवानगी द्यायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले. कृषिरत्न विजय अण्णा बोराडे म्हणाले की, शेतकऱ्याला जागतिक स्पर्धेत टिकायचे असल्यास शाश्वत उत्पादनासाठी शास्त्रोक्त पातळीवर जनुकीय तंत्रज्ञानाचा अवलंब करणे कमप्राप्त आहे. विज्ञान दिनाचे औचित्य साधून डॉ. मायी यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे त्यांनी कौतुक केले.

स्मार्टचे अतिरिक्त प्रकल्प संचालक दशरथ तांभाळे म्हणाले की, शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी आणि गटांसाठी बाळासाहेब ठाकरे स्मार्ट प्रकल्प ही एक संधी आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. हा प्रकल्प विशेषकरून लहान आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी असून, एकत्रितपणे शेतमाल विक्रीची व्यवस्था करून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास या प्रकल्पात वाव आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्तविक कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख एस. व्ही. सोनुने यांनी केले. कीटकशास्त्र अजय मिटकरी यांनी सूत्रसंचालन केले. मृदशास्त्रज्ञ राहुल चौधरी यांनी आभार मानले.