शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

यूट्युबवरून शेतकऱ्याने घेतली प्रेरणा; मराठवाड्यात माळरानावर बहरली सफरचंदाची बाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 14:19 IST

आधुनिक शेतीचा यशस्वी प्रयोग; चार लाख रूपये उत्पन्नाची आशा शेतकऱ्यास आहे

- बाळकृष्ण रासनेहसनाबाद ( जालना) : जिद्द, चिकाटी आणि शेतीला आधुनिकतेची जोड दिली, तर अपेक्षित उत्पन्न घेता येते, याची प्रचिती हसनाबाद येथील प्रगतिशील शेतकरी मनोज बद्रीनारायण लाठी यांच्याकडे पाहिल्यानंतर येते. मनोज लाठी यांनी दोन एकरांत सफरचंदाची बाग फुलविली असून, पहिल्या बहरामध्ये त्यांना दोन लाख रुपयांचे उत्पन्न झाले. यंदाही ही बाग बहरली असून, उत्पन्न दुप्पट होण्याची आशा त्यांना आहे.

भोकरदन तालुक्यातील हसनाबाद व परिसरातील शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरत, शेतात विविध प्रयोग केले आहेत. अशाच प्रयोगशील शेतकऱ्यांपैकी एक मनोज लाठी हे आहेत. लाठी यांनी दोन एकर पडीक जमिनीवर ४०० सफरचंदांच्या कलमा २०१९ मध्ये लावल्या होत्या. योग्य व्यवस्थापनामुळे २०२२ मध्ये त्यांना दोन लाख रुपयांचे उत्पन्न या सफरचंदाच्या शेतीपासून मिळाले. सफरचंदाची लागवड केल्यानंतर त्यांनी ठिबकचा वापर केला. कोणतीही रासायनिक खते न वापरता गांडूळ खत, गोबर गॅस सॅलरी, शेणखत, चुना, जीवामृत इत्यादींचा वापर केला. त्यामुळे रोगराई कमी प्रमाणात आली. त्यावरही फवारणी करून बाग जोपासली आहे. यंदाही त्यांची सफरचंदाची बाग फुलोऱ्याने फुलली असून, फळे जुलैमध्ये विक्रीस येतील. त्यातून त्यांना चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. नवनवीन उपक्रम राबविणारे मनोज लाठी यांच्या शेतात जांभूळ, खजूर, नारळाची झाडे, केसर आंबा, सीताफळ, डाळिंब अशा सर्वच प्रकारची मिश्र फळबाग असून, त्यांचे हे प्रयोग पाहण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी येतात. या कामी तालुका कृषी अधिकारी भुतेकर, मंडळ अधिकारी इंगळे, कृषी साहाय्य गजानन दळवी व इतरांचे सहकार्य लाभल्याचे सुरेश लाठी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

यूट्युबवरून घेतली प्रेरणासफरचंदाची लागवड करण्याची प्रेरणा त्यांना यूट्युबवरून मिळाली. त्यांच्यासह त्यांच्या शेतकरी मित्रांना विश्वासच नव्हता की, सफरचंदाची झाडे आपल्याकडे येऊ शकतात, परंतु त्यांनी अशा कडक, उष्ण वातावरणात मिश्र वातावरणात अण्णा आणि हरिमन या वाणाची सफरचंदाची झाडे लावली व योग्य व्यवस्थापन करून, त्यातून उत्पन्नही मिळविले आहे.

कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळते शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरून, योग्य व्यवस्थापनाद्वारे शेती केली, तर चांगले उत्पन्न मिळते. शेतीसाठी असलेल्या शासकीय योजनांचाही लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत विविध प्रयोग करावे. त्यासाठी कृषी विभागाचेही मार्गदर्शन मिळते.-मनोज लाठी, प्रयोगशील शेतकरी.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीJalanaजालना