शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

यूट्युबवरून शेतकऱ्याने घेतली प्रेरणा; मराठवाड्यात माळरानावर बहरली सफरचंदाची बाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 14:19 IST

आधुनिक शेतीचा यशस्वी प्रयोग; चार लाख रूपये उत्पन्नाची आशा शेतकऱ्यास आहे

- बाळकृष्ण रासनेहसनाबाद ( जालना) : जिद्द, चिकाटी आणि शेतीला आधुनिकतेची जोड दिली, तर अपेक्षित उत्पन्न घेता येते, याची प्रचिती हसनाबाद येथील प्रगतिशील शेतकरी मनोज बद्रीनारायण लाठी यांच्याकडे पाहिल्यानंतर येते. मनोज लाठी यांनी दोन एकरांत सफरचंदाची बाग फुलविली असून, पहिल्या बहरामध्ये त्यांना दोन लाख रुपयांचे उत्पन्न झाले. यंदाही ही बाग बहरली असून, उत्पन्न दुप्पट होण्याची आशा त्यांना आहे.

भोकरदन तालुक्यातील हसनाबाद व परिसरातील शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरत, शेतात विविध प्रयोग केले आहेत. अशाच प्रयोगशील शेतकऱ्यांपैकी एक मनोज लाठी हे आहेत. लाठी यांनी दोन एकर पडीक जमिनीवर ४०० सफरचंदांच्या कलमा २०१९ मध्ये लावल्या होत्या. योग्य व्यवस्थापनामुळे २०२२ मध्ये त्यांना दोन लाख रुपयांचे उत्पन्न या सफरचंदाच्या शेतीपासून मिळाले. सफरचंदाची लागवड केल्यानंतर त्यांनी ठिबकचा वापर केला. कोणतीही रासायनिक खते न वापरता गांडूळ खत, गोबर गॅस सॅलरी, शेणखत, चुना, जीवामृत इत्यादींचा वापर केला. त्यामुळे रोगराई कमी प्रमाणात आली. त्यावरही फवारणी करून बाग जोपासली आहे. यंदाही त्यांची सफरचंदाची बाग फुलोऱ्याने फुलली असून, फळे जुलैमध्ये विक्रीस येतील. त्यातून त्यांना चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. नवनवीन उपक्रम राबविणारे मनोज लाठी यांच्या शेतात जांभूळ, खजूर, नारळाची झाडे, केसर आंबा, सीताफळ, डाळिंब अशा सर्वच प्रकारची मिश्र फळबाग असून, त्यांचे हे प्रयोग पाहण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी येतात. या कामी तालुका कृषी अधिकारी भुतेकर, मंडळ अधिकारी इंगळे, कृषी साहाय्य गजानन दळवी व इतरांचे सहकार्य लाभल्याचे सुरेश लाठी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

यूट्युबवरून घेतली प्रेरणासफरचंदाची लागवड करण्याची प्रेरणा त्यांना यूट्युबवरून मिळाली. त्यांच्यासह त्यांच्या शेतकरी मित्रांना विश्वासच नव्हता की, सफरचंदाची झाडे आपल्याकडे येऊ शकतात, परंतु त्यांनी अशा कडक, उष्ण वातावरणात मिश्र वातावरणात अण्णा आणि हरिमन या वाणाची सफरचंदाची झाडे लावली व योग्य व्यवस्थापन करून, त्यातून उत्पन्नही मिळविले आहे.

कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळते शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरून, योग्य व्यवस्थापनाद्वारे शेती केली, तर चांगले उत्पन्न मिळते. शेतीसाठी असलेल्या शासकीय योजनांचाही लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत विविध प्रयोग करावे. त्यासाठी कृषी विभागाचेही मार्गदर्शन मिळते.-मनोज लाठी, प्रयोगशील शेतकरी.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीJalanaजालना