शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

यूट्युबवरून शेतकऱ्याने घेतली प्रेरणा; मराठवाड्यात माळरानावर बहरली सफरचंदाची बाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 14:19 IST

आधुनिक शेतीचा यशस्वी प्रयोग; चार लाख रूपये उत्पन्नाची आशा शेतकऱ्यास आहे

- बाळकृष्ण रासनेहसनाबाद ( जालना) : जिद्द, चिकाटी आणि शेतीला आधुनिकतेची जोड दिली, तर अपेक्षित उत्पन्न घेता येते, याची प्रचिती हसनाबाद येथील प्रगतिशील शेतकरी मनोज बद्रीनारायण लाठी यांच्याकडे पाहिल्यानंतर येते. मनोज लाठी यांनी दोन एकरांत सफरचंदाची बाग फुलविली असून, पहिल्या बहरामध्ये त्यांना दोन लाख रुपयांचे उत्पन्न झाले. यंदाही ही बाग बहरली असून, उत्पन्न दुप्पट होण्याची आशा त्यांना आहे.

भोकरदन तालुक्यातील हसनाबाद व परिसरातील शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरत, शेतात विविध प्रयोग केले आहेत. अशाच प्रयोगशील शेतकऱ्यांपैकी एक मनोज लाठी हे आहेत. लाठी यांनी दोन एकर पडीक जमिनीवर ४०० सफरचंदांच्या कलमा २०१९ मध्ये लावल्या होत्या. योग्य व्यवस्थापनामुळे २०२२ मध्ये त्यांना दोन लाख रुपयांचे उत्पन्न या सफरचंदाच्या शेतीपासून मिळाले. सफरचंदाची लागवड केल्यानंतर त्यांनी ठिबकचा वापर केला. कोणतीही रासायनिक खते न वापरता गांडूळ खत, गोबर गॅस सॅलरी, शेणखत, चुना, जीवामृत इत्यादींचा वापर केला. त्यामुळे रोगराई कमी प्रमाणात आली. त्यावरही फवारणी करून बाग जोपासली आहे. यंदाही त्यांची सफरचंदाची बाग फुलोऱ्याने फुलली असून, फळे जुलैमध्ये विक्रीस येतील. त्यातून त्यांना चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. नवनवीन उपक्रम राबविणारे मनोज लाठी यांच्या शेतात जांभूळ, खजूर, नारळाची झाडे, केसर आंबा, सीताफळ, डाळिंब अशा सर्वच प्रकारची मिश्र फळबाग असून, त्यांचे हे प्रयोग पाहण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी येतात. या कामी तालुका कृषी अधिकारी भुतेकर, मंडळ अधिकारी इंगळे, कृषी साहाय्य गजानन दळवी व इतरांचे सहकार्य लाभल्याचे सुरेश लाठी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

यूट्युबवरून घेतली प्रेरणासफरचंदाची लागवड करण्याची प्रेरणा त्यांना यूट्युबवरून मिळाली. त्यांच्यासह त्यांच्या शेतकरी मित्रांना विश्वासच नव्हता की, सफरचंदाची झाडे आपल्याकडे येऊ शकतात, परंतु त्यांनी अशा कडक, उष्ण वातावरणात मिश्र वातावरणात अण्णा आणि हरिमन या वाणाची सफरचंदाची झाडे लावली व योग्य व्यवस्थापन करून, त्यातून उत्पन्नही मिळविले आहे.

कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळते शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरून, योग्य व्यवस्थापनाद्वारे शेती केली, तर चांगले उत्पन्न मिळते. शेतीसाठी असलेल्या शासकीय योजनांचाही लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत विविध प्रयोग करावे. त्यासाठी कृषी विभागाचेही मार्गदर्शन मिळते.-मनोज लाठी, प्रयोगशील शेतकरी.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीJalanaजालना