शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीच्या बियाणांचा तुटवडयाने शेतकरी त्रस्त; जिथे उपलब्ध तिथे अधिक भावात विक्री

By महेश गायकवाड  | Updated: June 5, 2023 16:56 IST

खरीप हंगामात मुबलक प्रमाणात बी-बियाणे, खते उपलब्ध करून देण्यात आल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.

भोकरदन : खरीप हंगामातील पेरणीसाठी बी-बियाणांची खरेदी करण्यासाठी भोकरदन शहरातील कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे; परंतु कृषी सेवा केंद्रांना बियाणे उत्पादक कंपन्याच्या डीलर्सनी मागणी केलेल्या बियाणांचा पूर्ण क्षमतेनेे पुरवठा न केल्याने विशिष्ट कंपन्यांच्या बियाणांचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी दुकानदार उपलब्ध बियाणांची चढ्या दराने विक्री करत असून, ८५३ रुपयांची बॅग दीड ते तीन हजारांपर्यंत विक्री करत आहेत.

खरीप हंगामात मुबलक प्रमाणात बी-बियाणे, खते उपलब्ध करून देण्यात आल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. मात्र, प्रत्यक्षात सर्वच बियाणे उत्पादक कंपन्यांनी व्यापाऱ्यांना बुकिंग केलेल्या बियाणांपैकी केवळ २० टक्के बियाणांचा पुरवठा केला आहे. त्यामुळे पहिल्या दोन दिवसांतच संपूर्ण बियाणांची विक्री झाल्याने शेतकऱ्यांना हव्या असलेल्या बियाणांचा तुटवडा निर्माण झाला आहे. शासनाने कपाशीच्या बॅगच्या किमत ८५३ रुपये ठरवली आहे; परंतु काही निवडक खासगी कंपन्यांच्या वाणाला शेतकरी पसंती देत असल्याने या कंपन्यांच्या बॅगचे भाव दुकानदारांनी वाढवले आहेत. एका बॅगमागे दीड ते दोन हजार रुपये अधिकचे घेतले जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. खरीप हंगामाच्या पहिल्याच आठवड्यात बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. कृषी मार्केटमध्ये कबड्डी, संकेत, पंगा, ब्रम्हा, नवनीत, राशी या वाणांची अधिक मागणी होत आहे.

बियाणे उपलब्ध नाही कपाशीचे बियाणे घेण्यासाठी दुकानावर गेलो असताना हव्या असलेल्या बियाणासोबत इतर कंपन्यांचे पाकीट घेणे बंधनकारक केले जात आहे. ते न घेतल्यास दुप्पट किंमत मोजावी लागत आहे. हवे असलेले बियाणे मिळत नाही.- कैलास सुसर, शेतकरी, भोकरदन

भाव अधिक आहेत सगळ्याच दुकानात कपाशीच्या बियाणाचे दुप्पट भाव सांगत आहेत, तर काही ठिकाणी बियाणे शिल्लक नसल्याचे सांगण्यात येत आहेत. कपाशीचे संकेत हे वाण तर मिळेनासे झाले आहे. मिळालेच तर एक बँगसाठी तीर हजार रुपये मोजावे लागत आहे.- जुमान चाऊस, शेतकरी धावडा

तत्काळ तक्रार करा व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात उपलब्ध असलेल्या बियाण्याचा फलक बाहेर लावणे आवश्यक आहे. जर फलक लावला नाही तर कठोर कारवाई करण्यात येईल. शिवाय शेतकऱ्यांनी जागृत होणे अपेक्षित आहे. व्यापारी शासनाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने बियाणे पाकीट विक्री करीत असेल तर तात्काळ कृषी विभागाच्या हेल्पलाइनवर तक्रार करावी.- रामेश्वर भुते, तालुका कृषी अधिकारी, भोकरदन

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरीagricultureशेती