शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कपाशीच्या बियाणांचा तुटवडयाने शेतकरी त्रस्त; जिथे उपलब्ध तिथे अधिक भावात विक्री

By महेश गायकवाड  | Updated: June 5, 2023 16:56 IST

खरीप हंगामात मुबलक प्रमाणात बी-बियाणे, खते उपलब्ध करून देण्यात आल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.

भोकरदन : खरीप हंगामातील पेरणीसाठी बी-बियाणांची खरेदी करण्यासाठी भोकरदन शहरातील कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे; परंतु कृषी सेवा केंद्रांना बियाणे उत्पादक कंपन्याच्या डीलर्सनी मागणी केलेल्या बियाणांचा पूर्ण क्षमतेनेे पुरवठा न केल्याने विशिष्ट कंपन्यांच्या बियाणांचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी दुकानदार उपलब्ध बियाणांची चढ्या दराने विक्री करत असून, ८५३ रुपयांची बॅग दीड ते तीन हजारांपर्यंत विक्री करत आहेत.

खरीप हंगामात मुबलक प्रमाणात बी-बियाणे, खते उपलब्ध करून देण्यात आल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. मात्र, प्रत्यक्षात सर्वच बियाणे उत्पादक कंपन्यांनी व्यापाऱ्यांना बुकिंग केलेल्या बियाणांपैकी केवळ २० टक्के बियाणांचा पुरवठा केला आहे. त्यामुळे पहिल्या दोन दिवसांतच संपूर्ण बियाणांची विक्री झाल्याने शेतकऱ्यांना हव्या असलेल्या बियाणांचा तुटवडा निर्माण झाला आहे. शासनाने कपाशीच्या बॅगच्या किमत ८५३ रुपये ठरवली आहे; परंतु काही निवडक खासगी कंपन्यांच्या वाणाला शेतकरी पसंती देत असल्याने या कंपन्यांच्या बॅगचे भाव दुकानदारांनी वाढवले आहेत. एका बॅगमागे दीड ते दोन हजार रुपये अधिकचे घेतले जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. खरीप हंगामाच्या पहिल्याच आठवड्यात बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. कृषी मार्केटमध्ये कबड्डी, संकेत, पंगा, ब्रम्हा, नवनीत, राशी या वाणांची अधिक मागणी होत आहे.

बियाणे उपलब्ध नाही कपाशीचे बियाणे घेण्यासाठी दुकानावर गेलो असताना हव्या असलेल्या बियाणासोबत इतर कंपन्यांचे पाकीट घेणे बंधनकारक केले जात आहे. ते न घेतल्यास दुप्पट किंमत मोजावी लागत आहे. हवे असलेले बियाणे मिळत नाही.- कैलास सुसर, शेतकरी, भोकरदन

भाव अधिक आहेत सगळ्याच दुकानात कपाशीच्या बियाणाचे दुप्पट भाव सांगत आहेत, तर काही ठिकाणी बियाणे शिल्लक नसल्याचे सांगण्यात येत आहेत. कपाशीचे संकेत हे वाण तर मिळेनासे झाले आहे. मिळालेच तर एक बँगसाठी तीर हजार रुपये मोजावे लागत आहे.- जुमान चाऊस, शेतकरी धावडा

तत्काळ तक्रार करा व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात उपलब्ध असलेल्या बियाण्याचा फलक बाहेर लावणे आवश्यक आहे. जर फलक लावला नाही तर कठोर कारवाई करण्यात येईल. शिवाय शेतकऱ्यांनी जागृत होणे अपेक्षित आहे. व्यापारी शासनाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने बियाणे पाकीट विक्री करीत असेल तर तात्काळ कृषी विभागाच्या हेल्पलाइनवर तक्रार करावी.- रामेश्वर भुते, तालुका कृषी अधिकारी, भोकरदन

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFarmerशेतकरीagricultureशेती