शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

शेतकऱ्यांना मिळणा-या दुष्काळी अनुदानाला आॅनलाईनचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 00:40 IST

चार महिन्याच्या विलंबानंतर शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली. मात्र, बँकेचे सर्व्हर वारंवार बंद पडत असल्याने शेतक-यांना दिवसभर बँकेत ताटकळत बसावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपारध : भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात यंदा कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना दुष्काळात आधार मिळावा म्हणून शासनाने दुष्काळी मदत जाहीर केली. चार महिन्याच्या विलंबानंतर शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली. मात्र, बँकेचे सर्व्हर वारंवार बंद पडत असल्याने शेतक-यांना दिवसभर बँकेत ताटकळत बसावे लागत आहे.चार महिन्याच्या प्रतीक्षेनंतर दुष्काळी अनुदानाची रक्कम शेतक-यांच्या खात्यात वर्ग करण्यात करण्यात आली आहे. यामुळे रक्कम काढण्यासाठी सर्व व्यवसाय सोडून बँकेत गर्दी करत आहेत. बहुतांशी शेतक-यांना दिवसभर बँकेच्या दारात बसून देखील रक्कम मिळत नसल्याने माघारी फिरावे लागत आहे. त्यामुळे शेतक-यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.पारध परिसरात यंदा निसर्गाने हात दाखविल्याने खरिपाचे मोठे नुकसान झाले होते. त्या अनुषंगाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शासनाने तालुक्यात दुष्काळ जाहीर करुन शेतक-यांना दुष्काळात आर्थिक आधार देण्यासाठी दुष्काळी मदत जाहीर केली. याच अनुषंगाने पारध येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत सात गावातील शेतक-यांच्या खात्यात अनुदान जमा करण्यात आले. आता ही रक्कम मिळावी म्हणून शेतकरी बँकेच्या दारात भर उन्हात गर्दी करु लागले आहेत. आॅनलाईन सेवा विस्कळीत होत असल्याने शेतकरी वैतागून गेले आहेत. याकडे बँकेच्या कर्मचारी देखील कानाडोळा करत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे हाताला काम नसल्याने शेतक-यांना मोठी आर्थिक चणचण भासत आहे. परिवाराचा दैनंदिन खर्च कसा भागवावा, या विवंचनेत सध्या शेतकरी आहेत.दैनंदिन खर्च व खरिपाची पेरणी देखील तोंडावर आली असल्याने पेरणीसाठी आपल्याला या शासनाच्या पैशाची मदत होईल, म्हणून शेतकरी रोज बँकेत चकरा मारत आहेत. त्यातच उन्हाचा वाढलेला पारा व बँकेत सुविधाचा अभाव या गोष्टी झेलत शेतकरी वर्ग,विशेषत: वृद्ध महिला शेतकरी हे तासतांस बँकेच्या दारात अनुदानासाठी ताठकळत उभे राहत असल्याचे चित्र जिल्हा मध्यवर्ती बँकेत दिसत आहे.विशेष म्हणजे बँकेने दुष्काळ अनुदान वाटपाचे गावनिहाय नियोजन करुन देखील बँकेत शेतक-यांची गर्दी वाढत आहे. बँकेच्या कर्मचा-यांचा गलथान कारभारामुळेच शेतक-यांची गैरसोय होत आहे. बँकेला आॅनलाईन सेवा पुरविण्यासाठी बीएसएनएलकडून सेवा घेत आहे. मात्र, वारंवार सेवा विस्कळीत होत असल्याने शेतक-यांसह ग्राहकांची गैरसोय होत आहे. याकडे बँकेच्या व्यवस्थापकांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :onlineऑनलाइनgovernment schemeसरकारी योजनाdroughtदुष्काळfundsनिधी