शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

शेतकऱ्यांना मिळणा-या दुष्काळी अनुदानाला आॅनलाईनचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 00:40 IST

चार महिन्याच्या विलंबानंतर शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली. मात्र, बँकेचे सर्व्हर वारंवार बंद पडत असल्याने शेतक-यांना दिवसभर बँकेत ताटकळत बसावे लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपारध : भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात यंदा कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना दुष्काळात आधार मिळावा म्हणून शासनाने दुष्काळी मदत जाहीर केली. चार महिन्याच्या विलंबानंतर शेतक-यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली. मात्र, बँकेचे सर्व्हर वारंवार बंद पडत असल्याने शेतक-यांना दिवसभर बँकेत ताटकळत बसावे लागत आहे.चार महिन्याच्या प्रतीक्षेनंतर दुष्काळी अनुदानाची रक्कम शेतक-यांच्या खात्यात वर्ग करण्यात करण्यात आली आहे. यामुळे रक्कम काढण्यासाठी सर्व व्यवसाय सोडून बँकेत गर्दी करत आहेत. बहुतांशी शेतक-यांना दिवसभर बँकेच्या दारात बसून देखील रक्कम मिळत नसल्याने माघारी फिरावे लागत आहे. त्यामुळे शेतक-यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.पारध परिसरात यंदा निसर्गाने हात दाखविल्याने खरिपाचे मोठे नुकसान झाले होते. त्या अनुषंगाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शासनाने तालुक्यात दुष्काळ जाहीर करुन शेतक-यांना दुष्काळात आर्थिक आधार देण्यासाठी दुष्काळी मदत जाहीर केली. याच अनुषंगाने पारध येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत सात गावातील शेतक-यांच्या खात्यात अनुदान जमा करण्यात आले. आता ही रक्कम मिळावी म्हणून शेतकरी बँकेच्या दारात भर उन्हात गर्दी करु लागले आहेत. आॅनलाईन सेवा विस्कळीत होत असल्याने शेतकरी वैतागून गेले आहेत. याकडे बँकेच्या कर्मचारी देखील कानाडोळा करत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे हाताला काम नसल्याने शेतक-यांना मोठी आर्थिक चणचण भासत आहे. परिवाराचा दैनंदिन खर्च कसा भागवावा, या विवंचनेत सध्या शेतकरी आहेत.दैनंदिन खर्च व खरिपाची पेरणी देखील तोंडावर आली असल्याने पेरणीसाठी आपल्याला या शासनाच्या पैशाची मदत होईल, म्हणून शेतकरी रोज बँकेत चकरा मारत आहेत. त्यातच उन्हाचा वाढलेला पारा व बँकेत सुविधाचा अभाव या गोष्टी झेलत शेतकरी वर्ग,विशेषत: वृद्ध महिला शेतकरी हे तासतांस बँकेच्या दारात अनुदानासाठी ताठकळत उभे राहत असल्याचे चित्र जिल्हा मध्यवर्ती बँकेत दिसत आहे.विशेष म्हणजे बँकेने दुष्काळ अनुदान वाटपाचे गावनिहाय नियोजन करुन देखील बँकेत शेतक-यांची गर्दी वाढत आहे. बँकेच्या कर्मचा-यांचा गलथान कारभारामुळेच शेतक-यांची गैरसोय होत आहे. बँकेला आॅनलाईन सेवा पुरविण्यासाठी बीएसएनएलकडून सेवा घेत आहे. मात्र, वारंवार सेवा विस्कळीत होत असल्याने शेतक-यांसह ग्राहकांची गैरसोय होत आहे. याकडे बँकेच्या व्यवस्थापकांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :onlineऑनलाइनgovernment schemeसरकारी योजनाdroughtदुष्काळfundsनिधी