शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

विष घेऊनही शेतकऱ्याचा प्रश्न सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 1:24 AM

पाच महिन्यापूर्वी जालना तालुक्यातील अंतरवाला-सिंदखेड येथील दत्तू यशवंतराव कळकुंबे यांनी सातबाराच्या उता-यावर त्यांचे नाव येत नसल्याच्या मुद्यावरून तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्या दालनात विषारी द्रव घेतले होते. त्याला आज पाच महिने झाले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी जी म्हण मराठीत रूढ झाली आहे, त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा जालना जिल्ह्यात आला आहे. पाच महिन्यापूर्वी जालना तालुक्यातील अंतरवाला-सिंदखेड येथील दत्तू यशवंतराव कळकुंबे यांनी सातबाराच्या उता-यावर त्यांचे नाव येत नसल्याच्या मुद्यावरून तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्या दालनात विषारी द्रव घेतले होते. त्याला आज पाच महिने झाले आहेत. कळकुंबे हे बुधवारी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयात याचा पाठपुरावा करण्यासाठी आल्यावर निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी त्यांची बाजू ऐकून घेत पुन्हा एका सर्व यंत्रणांना सतर्क करून पुढील आठवड्यात यावर विशेष बैठक बोलावली आहे.कळकुंबे यांची अंतरवाला-सिंदखेड येथे शेतजमीन होती. गटबांधणी करताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू हा साधारपणे १९७० मध्ये झाला होता.त्यावेळी ते लहान होते. त्यामुळे त्यांचे नाव सातबारावर अल्पज्ञानी म्हणून आले होते. त्यावेळी शासनाने गटबांधणी दरम्यान ज्या काही शेतकऱ्यांच्या जमिनी नावावर करणे शिल्लक आहेत, अशांना ४० दिवसात अपील दाखल करण्याचे निर्देश दिले होते. परंतु कळकुंबे यांच्याकडून कुठलाच आक्षेप आला नाही. त्यामुळे त्यावेळी हे प्रकरण थंड बस्त्यात पडले. सज्ञान झाल्यावर संबंधित दत्तू कळकुंबे यांनी साधारपणे १९८५ पासून आपले नाव वडिलो पार्जित शेत जमिनीच्या सातबाराच्या उताºयावर यावे म्हणून महसूल तसेच भूमी अभिलेख कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता.नंतर अनेकवेळा शासन दरबारी वेगवेगळ्या कार्यालयात या संदर्भात दाद मागितली. विशेष म्हणजे दिवाणी न्यायालयातही दावा दाखल केला होता. तेथेही निकाल हा कळकुंबे यांच्या विरोधात गेला होता. त्यामुळे कळकुंबे यांनी आता या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान द्यावे अशी विनंती बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी कळकुंबे यांना केली. तसेच वेगवेगळ्या यंत्रणांच्या अधिकारी, कर्मचा-यांना बोलावून त्यांना यात काही करता येते काय, या बाबतही चर्चा केली. दरम्यान जलप्रकल्प उभारणीसाठी त्यांच्या गावातील अनेकांच्या शेतजमिनी संपादित करण्यात आल्या. मुलाला धरणग्रस्ताचे प्रमाणपत्र मिळावे म्हणून तरी मला आता मदत हवी अशी आर्त विनंती कळकुंबे यांनी वायाळ यांच्याकडे केली. मात्र, त्यासाठी आवश्यक ती सर्व कागपत्र शोधून त्यासाठी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या प्रकरणाशी संदर्भातील सर्व अधिकारी, कर्मचा-यांना बैठकीस बोलावून त्यात निर्णय घेऊ, असे आश्वासन कळकुंबे यांना वायाळ यांनी दिले.शेतकरी खिन्न : जावे तरी कुठे ?आजही कळकुंबे हे त्यांच्याकडे असलेले सर्व कागदपत्र वायाळ यांना दाखवून काहीही करा, पण मला मदत करा अशी विनंती करताना दिसून आले. एकूणच हा कळकुंबे यांचा गंभीर प्रश्न असतांना आणि संबंधित शेतक-याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विषारी द्रव घेतल्या नंतर आता याला पाच महिन्यांचा कालावधी लोटल्यावरही न्याय मिळत नसल्याने आपण खिन्न झालो असल्याचे त्यांनी कळकुंबे यांनी यावेळी नमूद केले.

टॅग्स :Suicideआत्महत्याFarmerशेतकरीJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना