शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

हमीभावासाठी शेतकरी रस्त्यावर; अंबड-जालना महामार्गावर चक्काजाम आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 18:06 IST

कापसाचा भाव वाढेल या अपेक्षेने दिवाळीपासून कापूस घरात ठेवणाऱ्या शेतकऱ्यांची आशा फोल ठरली.

- दादासाहेब जिगेमठपिंपळगाव (ता.अंबड) : शासनाच्या आयात-निर्यात धाेरणामुळे पडलेले शेतमालाचे भाव, अतिवृष्टी अनुदान, खरीप हंगाम संपूनही मिळत नसेलेली विमा योजनेची रक्कम आणि शेती साहित्याच्या वाढलेल्या भरमसाठी किमतीविरोधात प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी जालना-अंबड महामार्गावरील दर्गा फाटा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती.

कापसाचा भाव वाढेल या अपेक्षेने दिवाळीपासून कापूस घरात ठेवणाऱ्या शेतकऱ्यांची आशा फोल ठरली. जिल्हाभरात ८० टक्के शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन घरातच आहे. गेल्या २ वर्षांपासून अनुक्रमे ४५ ते ५० लक्ष कापसाच्या गाठी विदेशात निर्यात झाल्या होत्या. परिणामी गेल्या दोन वर्षांत शेतकऱ्यांच्या कापसाला विक्रमी भाव मिळाला. पण यावर्षी व्यापारी व कॉटन लॉबीच्या दबावाखाली केंद्र सरकारने निर्यात बंदी करून, ऑस्ट्रेलियातून विना आयात शुल्क ५१ हजार टन कापसाच्या गाठी आयात केल्या. तसेच सोयाबीन, मका, हरभरा, कांदा, तुरीसह सर्व शेतमालाचे शेतकरी विरोधी आयात-निर्यात धोरणांमुळे दिवसेंदिवस घसरत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. चक्काजाम आंदोलनामुळे या राष्ट्रीय महामार्गावर दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतुकीची कोंडी सोडवताना अंबड पोलिसांची दमछाक झाली.

या आंदोलनात प्रहारचे तालुकाध्यक्ष राम ठाकूर, अमोल काकडे, महादेव थुटे, गजानन जऱ्हाड, राजेंद्र गायकवाड, शुभम शिंदे, भाग्यश्री शिंदे, राजांबर मते, अमोल काकडे, रामेश्वर चव्हाण, मनोहर तार्डे, पांडुरंग तारडे, दिनेश शेळके, सुभाष पवार, भगवान माने, विष्णू वैद्य, संजय भोजने, अय्यान पठाण, रंजीत जाधव, पांडुरंग कुंडकर, चत्रभुज टापरे, भरत बुगडे, जगन तोगे, संभाजी शिंदे, माणिक भोजने, रमेश जाधव, तान्हाजी भोजने, संदिप भोजने, भगवान पवार, योगेश कांगडे, कृष्णा मुळक, गजानन दौंड, अमोल चव्हाण यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग होता. याप्रसंगी अंबड पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता.

या आहेत शेतकऱ्यांच्या मागण्यासोयाबीन, तूर, मका, हरभरा या शेतमालाची नाफेडमार्फत खरेदी करण्यात यावी. दिवाळीपूर्वी शासनाने जाहीर केलेली अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. कृषीपंपांचा वीज पुरवठा तोडणे बंद करून दिवसा मोफत वीजपुरवठा करण्यात यावा. मागील दोन वर्षांचा पिकविमा मिळावा, खतांच्या वाढलेल्या किमती नियंत्रित कराव्या आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरी