शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

हमीभावासाठी शेतकरी रस्त्यावर; अंबड-जालना महामार्गावर चक्काजाम आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 18:06 IST

कापसाचा भाव वाढेल या अपेक्षेने दिवाळीपासून कापूस घरात ठेवणाऱ्या शेतकऱ्यांची आशा फोल ठरली.

- दादासाहेब जिगेमठपिंपळगाव (ता.अंबड) : शासनाच्या आयात-निर्यात धाेरणामुळे पडलेले शेतमालाचे भाव, अतिवृष्टी अनुदान, खरीप हंगाम संपूनही मिळत नसेलेली विमा योजनेची रक्कम आणि शेती साहित्याच्या वाढलेल्या भरमसाठी किमतीविरोधात प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी जालना-अंबड महामार्गावरील दर्गा फाटा येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती.

कापसाचा भाव वाढेल या अपेक्षेने दिवाळीपासून कापूस घरात ठेवणाऱ्या शेतकऱ्यांची आशा फोल ठरली. जिल्हाभरात ८० टक्के शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन घरातच आहे. गेल्या २ वर्षांपासून अनुक्रमे ४५ ते ५० लक्ष कापसाच्या गाठी विदेशात निर्यात झाल्या होत्या. परिणामी गेल्या दोन वर्षांत शेतकऱ्यांच्या कापसाला विक्रमी भाव मिळाला. पण यावर्षी व्यापारी व कॉटन लॉबीच्या दबावाखाली केंद्र सरकारने निर्यात बंदी करून, ऑस्ट्रेलियातून विना आयात शुल्क ५१ हजार टन कापसाच्या गाठी आयात केल्या. तसेच सोयाबीन, मका, हरभरा, कांदा, तुरीसह सर्व शेतमालाचे शेतकरी विरोधी आयात-निर्यात धोरणांमुळे दिवसेंदिवस घसरत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. चक्काजाम आंदोलनामुळे या राष्ट्रीय महामार्गावर दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतुकीची कोंडी सोडवताना अंबड पोलिसांची दमछाक झाली.

या आंदोलनात प्रहारचे तालुकाध्यक्ष राम ठाकूर, अमोल काकडे, महादेव थुटे, गजानन जऱ्हाड, राजेंद्र गायकवाड, शुभम शिंदे, भाग्यश्री शिंदे, राजांबर मते, अमोल काकडे, रामेश्वर चव्हाण, मनोहर तार्डे, पांडुरंग तारडे, दिनेश शेळके, सुभाष पवार, भगवान माने, विष्णू वैद्य, संजय भोजने, अय्यान पठाण, रंजीत जाधव, पांडुरंग कुंडकर, चत्रभुज टापरे, भरत बुगडे, जगन तोगे, संभाजी शिंदे, माणिक भोजने, रमेश जाधव, तान्हाजी भोजने, संदिप भोजने, भगवान पवार, योगेश कांगडे, कृष्णा मुळक, गजानन दौंड, अमोल चव्हाण यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग होता. याप्रसंगी अंबड पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता.

या आहेत शेतकऱ्यांच्या मागण्यासोयाबीन, तूर, मका, हरभरा या शेतमालाची नाफेडमार्फत खरेदी करण्यात यावी. दिवाळीपूर्वी शासनाने जाहीर केलेली अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. कृषीपंपांचा वीज पुरवठा तोडणे बंद करून दिवसा मोफत वीजपुरवठा करण्यात यावा. मागील दोन वर्षांचा पिकविमा मिळावा, खतांच्या वाढलेल्या किमती नियंत्रित कराव्या आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरी