शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
6
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
7
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
8
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
9
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
10
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
11
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
12
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
13
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
14
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
17
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
18
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
19
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
20
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...

हमीभाव केंद्रावर शेतकरी फिरकेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:39 IST

नाफेडच्या विविध जाचक अटीमुळे नोंदणीकृत शेतकरी नाफेडच्या केंद्रावर फिरकत नसल्याने केंद्रावर शुकशुकाट दिसून येत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथे नाफेडने आधीच उशिराने हमीभाव केंद्र सुरु केले. या केंद्रावर सोयाबीन, मूग, उडीद इ. धान्य विक्री आणणे अपेक्षित होते. मात्र नाफेडच्या विविध जाचक अटीमुळे नोंदणीकृत शेतकरी नाफेडच्या केंद्रावर फिरकत नसल्याने केंद्रावर शुकशुकाट दिसून येत आहे. शासनाच्या दुटप्पी धोरणामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतक-यांनी संताप व्यक्त केला.जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती आहे. यामुळे सोयाबीन, मूग, उडिदाच्या उत्पन्न घटले. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. निघालेल्या धान्याची शासनाने हमीभावाने खरेदी करण्याची मागणी शेतक-यांनी केली होती. शासनाने शेतक-यांचा रोष बघता तातडीने शासनाने मुगाला ६ हजार ९७५ रुपये, सोयाबीन ३ हजार ९९९, आणि उडीद ५ हजार ६०० रुपये हमीभाव जाहीर केला होता, मात्र हमीभाव केंद्र वेळेत सुरु न केल्याने शेतक-यांना कमी दराने व्यापा-यांच्या घशात धान्य विकावे लागले. यामुळे शेतक-यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. यामुळे दसरा, दिवाळी सण उत्साहात साजरा करता आला नाही. १० आॅक्टोबर पासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हमीभावासाठी नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली. यात सोयाबीनचे ४८९, मूग ५६२, उडीद १७५ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली. मात्र तब्बल महिनाभरानंतर प्रत्यक्षात नाफेडने खरेदी सुरु केली आहे. मात्र १२ टक्के आर्द्रता, काडीकचरा आणि चाळणी करून शेतमालाची खरेदी करण्यात येत असल्याने शेतकºयाची अडचण वाढली आहे. तसेच हेक्टरी १ क्विंटल ६० किलो धान्य खरेदी करण्यात येत असल्याने उर्वरित धान्य कोठे विकावे म्हणून शेतकरी हमीभाव केंद्राकडे फिरकतच नसल्याचे चित्र दिसून आले.तुरीच्या पैशासाठी चकरागतवर्षी अनेक शेतक-यांनी हमीभावाने येथील केंद्रावर तूर विकली आहे. मात्र अद्यापही तुरीचे पैसे न मिळाल्याने शेतकरी हमीभाव केंद्रावर चकरा मारत आहेत. यामुळे शेतकरी हमीभाव केंद्रावर धान्य विकण्यास कानाडोळा करत आहेत.

 

टॅग्स :FarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड