शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार हमी योजनेतील अडथळ्यांमुळे शेतकरी संकटात; मनरेगाच्या कामांवर निधीची मर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 15:35 IST

सर्वच कामांना २ लाखांपेक्षा अधिक रकमेचे अंदाजपत्रक दाखल करता येईना

- गणेश पंडीतकेदारखेडा (जालना) : राज्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) कामे ठप्प झाली आहेत. विहीर, गोठा बांधकामासह इतर कामांवर प्रशासकीय अडथळ्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान होत आहे. पूर्वी प्रत्येक विहिरीसाठी राज्य सरकार पाच लाख रुपयांपर्यंत अनुदान मंजूर करत होते. या अनुदानाच्या ६० टक्के रक्कम अकुशल लाभार्थ्यांच्या खात्यावर तर, ४० टक्के कुशल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात होती. मात्र, केंद्र सरकारने दोन लाखांपेक्षा जास्त अनुदानावर बंदी घातल्याने मनरेगामधील कामांवर मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे प्रस्ताव दोन महिन्यांपासून पंचायत समिती स्तरावर प्रलंबित आहेत.

सिंचन विहीर योजनेसाठी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर न होणे, जुने पाच लाख रुपये मंजुरीचे काम आणि चालू कुशल बिले थकविण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचा त्रास वाढला आहे. वृक्ष लागवड, बांबू लागवड, गायगोठा, सिंचन विहीर या सर्व कामांमध्ये दोन लाख रुपयांपेक्षा जास्त अंदाजपत्रक दाखल होण्यास अडथळा येत आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरडून गेलेल्या जमिनीसाठी मंत्रिमंडळांने हेक्टरी तीन लाख रुपयांची मदत मनरेगाच्या माध्यमातून करण्याचे सांगितले, परंतु संगणक प्रणालीतील तांत्रिक मर्यादेमुळे निधी काढणे शक्य होत नाही. या गंभीर तांत्रिक त्रुटीमुळे मराठवाडा, विदर्भातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. केंद्र व राज्य सरकारमधील नियम व तांत्रिक त्रुटीमुळे शेतकऱ्यांच्या मनरेगा कामांवर मोठा परिणाम झाला असून, तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

शेतकरी आर्थिक संकटातराज्यातील गंभीर प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, अन्यथा या समस्येमुळे राज्यात मोठा उद्रेक होऊन जनता सरकारच्या विरोधात जाऊ शकते. शेतकऱ्यांची कामे पूर्ण असूनही कुशल बिले प्रलंबित असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.- नारायण लोखंडे, सामाजिक कार्यकर्ता, भोकरदन.

लवकरच मान्यता मिळेलकेंद्र सरकारने बिलांसाठी २ लाख रुपयांची मर्यादा ठरवली आहे, जी संपूर्ण भारतात लागू आहे. काही राज्यांनी ३ ते ५ लाख रुपयांपर्यंत प्रस्ताव पाठविले आहेत. परंतु, आम्ही ७ लाखांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला असून, त्याला आठ ते दहा दिवसांत मान्यता मिळेल.- डॉ. भरत बास्टेवाड, राज्य आयुक्त मनरेगा, नागपूर.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers in Crisis: MGNREGA hurdles and funding limits cause distress.

Web Summary : MGNREGA fund limits hinder farmers. Pending payments worsen financial strain. Technical issues stall land restoration aid. Urgent action is needed to resolve the crisis.
टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरी