शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
3
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
4
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
5
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
6
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
7
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
8
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
9
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
10
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
11
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
12
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
13
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
14
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
15
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
16
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
17
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
18
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
19
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
20
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!

शेतकऱ्यांचा कल कपाशीकडे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 00:26 IST

चांगल्या पावसानंतर बियाणे आणि खत खरेदीसाठी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात आर्द्रा नक्षत्राने ब-यापैकी हजेरी लावल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला असून, शनिवारी पडलेल्या चांगल्या पावसानंतर बियाणे आणि खत खरेदीसाठी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली आहे. जालना जिल्ह्यात आठ लाख १३ हजार पाकिटांपैकी जवळपास चार लाख बीटी बियाणांची विक्री झाली आहे. कपाशीच्या तुलनेत सोयाबीन, मका आणि बाजरीचे बियाणे मात्र, अद्याप तसेच असल्याचे सांगण्यात आले.मृग नक्षत्र कोरडे गेल्यावर शेतकरी हवालदिल झाला होता. परंतु आर्द्रा नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने हिरमुसलेला शेतकरी पुन्हा आनंदी झाला. दुष्काळाची दाहकता विरून शेतकरी पुन्हा नव्या उमेदीने खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. बियाणांची राजधानी म्हणून ओळख असलेल्या जालना बाजारपेठेत गेल्या दोन दिवसात बियाणे खरेदीसाठी गर्दी झाली होती. रविवारीही बियाणांची दुकाने उघडी होती. यंदा कृषी विभागाने बीटी बियाणांची जवळपास आठ लाखांपेक्षा अधिक पाकिटे उपलब्ध करून दिले आहेत. दोन वर्षापूर्वी बोंड अळीच्या फटक्यामुळे शेतकरी कपाशीकडे वळणार नाहीत, अशी अपेक्षा होती, परंतु ती फोल ठरली आहे. जालना जिल्ह्यात जवळपास ५ लाख ८० हजार हेक्टरवर पेरणी होणार असून, बहुतांश शेतक-यांनी आपले शेत पेरणीसाठी तयार ठेवले आहे. आता शेतातील काडीकचरा उचलून शेत स्वच्छ करण्यासाठी शेतकरी राबत आहे. त्यातच आज जरी हा पाऊस पडला असला तरी, तो पेरणीयोग्य नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. त्यामुळे आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.जालना जिल्ह्यात बियाणे तसेच खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा कृषी विभागाने आठ भरारी पथकांची स्थापना केली आहे. त्यात सात तालुक्यांसह एक जिल्हा भरारी पथक स्थापन केले आहे.दरम्यान, शेतक-यांनी कुठलेही बियाणे अथवा खते खरी करतांना संबंधित व्यापा-यांकडून पावती घ्यावी, जेणेकरून बियाणांची उगवण न झाल्यास अथवा खतांमध्ये काही भेसळ आढळून आल्यास कारवाई करता येईल.

टॅग्स :cottonकापूसagricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस