शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बँकेकडून तगादा, शेतकऱ्याने संपवले जीवन; ८ तास मृतदेह पोलिस ठाण्यात, मॅनेजरवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 15:18 IST

शेतकरी आत्महत्याप्रकरणी करंजळा येथील बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

गोंदी (जि. जालना) : अंबड तालुक्यातील करंजळा येथील येथील शेतकरी कृष्णा विनायक आमटे (४०,रा. करंजळा, ता. अंबड) यांनी आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान उघड झाली होती. एसबीआय बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या कर्जाच्या तगाद्यामुळे कृष्णा आमटे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. नातेवाइकांनी बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी गोंदी पोलिसांकडे केली होती. तब्बल आठ तास मृतदेह गोंदी पोलिस ठाण्यात ठेवण्यात आल्यानंतर यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास एसबीआय बँकेच्या महाकाळा येथील शाखा व्यवस्थापक गोविंद शिंदे तसेच वैभव दहीवाळ यांच्यावर गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णा आमटे हे शनिवारी रात्री जेवण करून झोपले होते. रविवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ते कोणाला काहीही न सांगता त्यांच्या शेतात गेले होते. बराच वेळ झाल्यानंतर ते परत आले नसल्याने त्यांचे नातेवाईक शेतात गेल्यानंतर त्यांना कृष्णा आमटे हे लिंबाच्या झाडाला मफलरच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. नातेवाइकांनी त्यांना जालना येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर येथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. यानंतर सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. मात्र, नातेवाइकांनी अंत्यसंस्कार न करता मृतदेह थेट गोंदी पोलिस ठाण्यात आणून बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याप्रकरणी कृष्णा आमटे यांचे भाऊ विकास विनायक आमटे यांच्या फिर्यादीवरून एसबीआय बँकेचे व्यवस्थापक गोविंद शिंदे व वैभव दहीवाळ यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्जासाठी तगादा लावल्याचा आरोपकृष्णा आमटे यांनी स्टेट बँक इंडियाच्या महाकाळा शाखेतून काही महिन्यांपूर्वी घर बांधण्यासाठी कर्ज घेतले होते. कर्ज असल्याने त्याचे बँकेत जाणे-येणे होते. शनिवारी सकाळी कृष्णा आमटे हे एसबीआयच्या महाकाळा येथील शाखेत गेले होते. यावेळी बँकेचे पैसे नजर चुकीने कृष्णा आमटे यांच्याकडे आले होते. बँक मॅनेजर व एका व्यक्तीने धमकावल्याचा आरोप कृष्णा आमटे यांचे भाऊ विकास आमटे यांनी गोंदी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत केला आहे. कर्ज आताच भरा असा तगादा लावल्यामुळे मानसिक तणावातून कृष्णा आमटे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलेला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालनाfarmer suicideशेतकरी आत्महत्या