शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

दुष्काळात गोशाळेला स्वखर्चाने दिला मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 00:27 IST

काजळा येथील एका गोसेवकाने गौशाळेला दुष्काळात स्वखर्चातून ५० गायींच्या चारा- पाण्याची व्यवस्था करून एक आदर्श निर्माण केला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : तालुक्यात एकीकडे तीव्र दुष्काळामुळे चारा- पाणी टंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली जनावरे बेभाव विकली आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची विक्री करु नये, यासाठी काजळा येथील एका गोसेवकाने गौशाळेला दुष्काळात स्वखर्चातून ५० गायींच्या चारा- पाण्याची व्यवस्था करून एक आदर्श निर्माण केला आहे़गतवर्षी पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणी नसल्याने शेतक-यांनी फळबागा तोडून टाकल्या. त्याचबरोबर चाराटंचाईमुळे अनेक शेतक-यांनी जनावरांची बेभाव विक्री केली.काजळा येथे संत रघुनाथ बाबा महाराज यांनी गोशाळा सुरू केली होती. मात्र, काही वर्षापूर्वी संत रघुनाथ बाबा महाराज यांचे देहावसान झाल्यानंतर या गोशाळेतील गायींकडे आर्थिक मदतीअभावी दुर्लक्ष होऊ लागले़ या गोशाळेतील गायींना चारा- पाण्यासह सोयी- सुविधा पुरविण्याबाबत बदनापूर येथील आर पी इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष भरत भांदरगे यांना याबाबत समजले. त्यांनी काजळा येथील या गोशाळेत जाऊन तेथील गोशाळेची पाहणी केली.यावेळी तेथे अनेक सुविधांची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले़ मूळचे शेतकरी कुटुंबातील असलेल्या भरत भांदरगे यांनी तात्काळ या गोशाळेचा विकास करून गायींसाठी चारा- पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला़ त्यांनी गायींना तात्काळ स्वखर्चातून ६० बाय ३० फुटाचे दोन मोठे शेड, गायींना चारा टाकण्यासाठी गव्हाणी तयार केल्या. तसेच गायींचा चारा व खाद्य बारीक करण्यासाठी कुट्टीमशीन खरेदी करून दिली.पिण्याच्या पाण्यासाठी एक हौद तयार केला़तसेच या भागात दुष्काळामुळे चारा टंचाई निर्माण झाल्यामुळे मुक्ताई नगरहून दहा टन मकाग्रास गायींसाठी उपलब्ध करून दिले़गायींना या भागात हिरवा चारा मिळत नसल्यामुळे १ मे २०१९ पासून नियमित जालना येथून दोन हजार रूपयांचा घास (हिरवा) चारा स्वखर्चाने विकत घेऊन पुरविला जात आहे.

टॅग्स :cowगायSocialसामाजिक