शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दुष्काळात गोशाळेला स्वखर्चाने दिला मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 00:27 IST

काजळा येथील एका गोसेवकाने गौशाळेला दुष्काळात स्वखर्चातून ५० गायींच्या चारा- पाण्याची व्यवस्था करून एक आदर्श निर्माण केला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : तालुक्यात एकीकडे तीव्र दुष्काळामुळे चारा- पाणी टंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली जनावरे बेभाव विकली आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची विक्री करु नये, यासाठी काजळा येथील एका गोसेवकाने गौशाळेला दुष्काळात स्वखर्चातून ५० गायींच्या चारा- पाण्याची व्यवस्था करून एक आदर्श निर्माण केला आहे़गतवर्षी पावसाने दडी मारल्यामुळे तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पाणी नसल्याने शेतक-यांनी फळबागा तोडून टाकल्या. त्याचबरोबर चाराटंचाईमुळे अनेक शेतक-यांनी जनावरांची बेभाव विक्री केली.काजळा येथे संत रघुनाथ बाबा महाराज यांनी गोशाळा सुरू केली होती. मात्र, काही वर्षापूर्वी संत रघुनाथ बाबा महाराज यांचे देहावसान झाल्यानंतर या गोशाळेतील गायींकडे आर्थिक मदतीअभावी दुर्लक्ष होऊ लागले़ या गोशाळेतील गायींना चारा- पाण्यासह सोयी- सुविधा पुरविण्याबाबत बदनापूर येथील आर पी इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष भरत भांदरगे यांना याबाबत समजले. त्यांनी काजळा येथील या गोशाळेत जाऊन तेथील गोशाळेची पाहणी केली.यावेळी तेथे अनेक सुविधांची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले़ मूळचे शेतकरी कुटुंबातील असलेल्या भरत भांदरगे यांनी तात्काळ या गोशाळेचा विकास करून गायींसाठी चारा- पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला़ त्यांनी गायींना तात्काळ स्वखर्चातून ६० बाय ३० फुटाचे दोन मोठे शेड, गायींना चारा टाकण्यासाठी गव्हाणी तयार केल्या. तसेच गायींचा चारा व खाद्य बारीक करण्यासाठी कुट्टीमशीन खरेदी करून दिली.पिण्याच्या पाण्यासाठी एक हौद तयार केला़तसेच या भागात दुष्काळामुळे चारा टंचाई निर्माण झाल्यामुळे मुक्ताई नगरहून दहा टन मकाग्रास गायींसाठी उपलब्ध करून दिले़गायींना या भागात हिरवा चारा मिळत नसल्यामुळे १ मे २०१९ पासून नियमित जालना येथून दोन हजार रूपयांचा घास (हिरवा) चारा स्वखर्चाने विकत घेऊन पुरविला जात आहे.

टॅग्स :cowगायSocialसामाजिक