शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

जालन्यात बनावट बियाणांचा कारखाना उदध्वस्त; पोलीस व कृषी विभागाची संयुक्त कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 19:34 IST

बनावट बियाणे पॅकिंग करून त्याची एजंटमार्फत विक्री करण्याचा उद्योग पोलीस व कृषी विभागाने संयुक्त कारवाई करत उदध्वस्त केला.

ठळक मुद्देकारवाईत पोलिसांनी ६४ लाख ४२ हजारांचे कपाशी, भाजीपाला बियाणे व पॅकिंग साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या तिघांना न्यायालयाने नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

जालना : बनावट बियाणे पॅकिंग करून त्याची एजंटमार्फत विक्री करण्याचा उद्योग पोलीस व कृषी विभागाने संयुक्त कारवाई करत उदध्वस्त केला. कारवाईत पोलिसांनी ६४ लाख ४२ हजारांचे कपाशी, भाजीपाला बियाणे व पॅकिंग साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या तिघांना न्यायालयाने नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राज्यातली ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती गुरुवारी पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यात गतवर्षी गुलाबी बोंडअळीमुळे कापसू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे यावर्षी कृषी विभाग सुरुवातीलपासून बनावट बियाणे विक्री होवू नये यासाठी आवश्यक खरबदारी घेत आहे. जालना शहरातील कचेरीरोड भागात बनावट बियाणे विक्री व पॅकिंग होत असल्याची माहिती कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. या आधारे कृषी व पोलीस विभागाच्या पथकाने बुधवारी रात्री उशिरा कचेरीरोड भागातील संशयित कल्पेश शांतिलाल टापर याच्या राहत्या घरी छापा टाकला. या ठिकाणी आरआरबीटी कपाशी बियाण्याचे पाकिटे, खुले बियाणे, तसेच भेंडी, मिरची, टरबूज, भोपळा, वांगे, कांदा या भाजीपाला पिकांचे पॅकिंग व खुल्या गोण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट बियाणे आढळून आले. येथे बियाणांवर रासायनिक प्रक्रिया व रंग देवून नामांकित कंपनीचे लेबल्स वापरून खरे वाटतील, असे बियाणे तयार केले जात होते. तीनशे ते चारशे रुपयांच्या पाकिटावर हजार रुपयांपर्यंत बनावट किंमतही टाकली जात होती. पथकाने सर्व बियाणे, पॅकिंगसाठी वापरण्यात येणारी उपकरणे जप्त केली. चौकशीत टापर याने बाबासाहेब प्रल्हाद वाडेकर (रा. जामवाडी), हरिदास बाजीराव निहाळ (रा.चनेगाव) यांना बनावट बियाणे विक्री केल्याचे सांगितले. पथकाने दोघांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेत घरातील बनावट आरबीटी कपाशी बियाण्याचा साठा जप्त केला. कारवाईत पथकाने एकूण ६४ लाख ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तिघा संशयितांवर  कदीम जालना पोलीस ठाण्यात फसवणूक, महाराष्ट्र बियाणे अधिनियम, अत्यावयाक वस्तू  व सेवा कायदा आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना गुरुवारी सायंकाळी न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना  २७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.कारवाईत यांचा सहभागपोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, जिल्हा कृषी विकास अधिकारी हरिश्चंद्र झनझन, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, जिल्हा गुणनियंत्रक सायप्पा गरांडे, उपनिरीक्षक हनुमंत वारे, कमलाकर अंभोरे, सुरेश गिते, भालचंद्र गिरी, तुकाराम राठोड, सॅम्युअल कांबळे, फुलसिंग घुसिंगे, हिरामण फलटणकर, सदाशिव राठोड, समाधान तेलंग्रे, मदन बहुरे, रंजित वैराळ, सोमनाथ उबाळे, किशोर जाधव, योगेश जगताप, पठाण, कृषी विभागाचे एस.व्ही. कराड, पी.स. कदम, आर. एल. तांगडे, आर.जे. बोडके यांनी ही कारवाई केली.

मोठे रॅकेट असण्याची शक्यता तिघा संशयितांनी हे बियाणे कुणाकडून खरेदी केले, यात कुठल्या कंपनीचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत. यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यात आणखी काही एजंटमार्फत अशा बनावट बियाण्याची विक्री होते का याचाही शोध घेण्यात येत आहे. बनावट बियाणांचे नुमने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले असून, यात पर्यावरणास हानिकारक घटक आढळल्यास संशयितांवर पर्यावरण कायद्यानुसार गुन्हा दाखल होईल, असे जिल्हा कृषी अधिकारी दशरथ तांभाळे यांनी सांगितले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेतीPoliceपोलिस