शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘प्रयोगशील शाळा’ जि.प.ची प्रतिमा उंचावेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 00:21 IST

सोमवारी एका छोटेखानी कार्यक्रमात लोकमतच्या प्रयोगशील शाळा या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेकडे पाहण्याचा दृष्टीकोन मध्यंतरीच्या काळात चुकीचा झाला होता. परंतु हा गैरसमज काही उपक्रमशील शिक्षक तसेच गावकरी आणि त्या शाळांमधील शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळे उप्रकम राबवून तो दूर करून त्यांच्या गावातील शाळांची गुणवत्ता वाढविली.त्यासाठी वेगवेगळे प्रयोगही केले. अशाच जिल्ह्यातील जवळपास ६१ प्रयोगशील शाळांची दखल लोकमतने हॅलो जालनामध्ये १८ जून ते १५ आॅगस्ट २०१९ मध्ये घेतली. त्या शाळांची माहिती इतरांना प्रेरणादायी ठरावी म्हणून याचे एक पुस्तक प्रसिध्द केले आहे. जे की, प्रत्येक शिक्षकाने आपल्याकडे संग्राह्य ठेवावे, असेच असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे यांनी केले.सोमवारी जिल्हा परिषेद एका छोटेखानी कार्यक्रमात लोकमतच्या प्रयोगशील शाळा या पुस्तकाचे विमोचन अध्यक्ष वानखेडेंच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संपादक सुधीर महाजन, जाहिरात उपव्यवस्थापक सूरज धाये, जिल्हा प्रतिनिधी संजय देशमुख, शाखा व्यवस्थापक दीपक कदम, उपाध्यक्ष महेंद्र पवार, शिक्षण सभापती पूजा सपाटे, जि.प.सदस्य बाप्पासाहेब गोर्डे, माजी उपाध्यक्ष सतीश टोपे, जि.प. सदस्य शालीग्राम म्हस्के, जयमंगल जाधव आदींची उपस्थिती होती.माजी सभापती रघुनाथ तौर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पुढे बोलताना वानखेडे म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही पूर्वी दर्जेदार शिक्षण मिळत होते.मध्यंतरी या-ना त्या कारणाने या शाळांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला होता.परंतु आता शिक्षणाचे महत्व सर्वांना पटले असून, अनेक शिक्षक आपल्यातील गुणवत्ता पणाला लावून शाळांची गुणवत्ता वाढवून विद्यार्थ्यांची चांगली पिढी निर्माण करत असल्याचे दिसून येते. लोकमत वृत्तपत्र समूहाने जालना जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शाळांची दखल घेतल्याबद्दल आभारही मानले.जिल्हाधिकाऱ्यांकडूनही स्वागतजालना जिल्हा परिषदेच्या प्रयोगशील शाळांची माहिती लोकमत ने प्रसिध्द करून शिक्षण क्षेत्राला महत्व दिले आहे. विशेष करून ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळाही कुठेच मागे नाहीत, हेच या लेखमालेतून पुढे आले होते. या लेखमालेचे संकलित पुस्तक प्रसिध्द केल्याने ते जिल्हा परिषद तसेच अन्य अभ्यासू शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या पुस्तकाचे आपण स्वागत करतो, वृत्तपत्रांनी असे सामाजिक उपक्रम राबवून समाजात सकारात्मकता निर्माण होण्यात मोठे योगदान दिले आहे. त्यातच लोकमतने हा उपक्रम राबविणे म्हणजे जिल्हा परिषदेसाठी ही एक सन्मानाचीच बाब होय.- रवींद्र बिनवडे, जिल्हाधिकारी, जालना

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदLokmat Eventलोकमत इव्हेंटSchoolशाळाliteratureसाहित्यEducation Sectorशिक्षण क्षेत्र