शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

‘ईव्हीएम हटाव.. देश बचाव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:52 IST

आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातून घ्याव्यात, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नुकताच देशभरात लोकसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत सर्वच ठिकाणी मतदानाच्या टक्केवारीत मोठा फरक दिसून आल्याचा आरोप करीत आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातून घ्याव्यात, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘ईव्हीएम हटाव.. देश बचाव..’चा नारा देण्यात आला.लोकसभा निवडणुकीत सर्वच ठिकाणी मतदानाच्या टक्केवारीत मोठा फरक दिसून आला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरच्या माध्यमातून घेण्यात यावी, अशी मागणी करून ईव्हीएम विरोधात भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे सोमवारी घंटानाद आंदोलन केले. यावेळी ‘ईव्हीएम हटाव... देश बचाव’ असा नाराही देण्यात आला. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.ईव्हीएम मशिनद्वारे मतदानात होत असलेल्या मताची मोठी अफरा-तफर थांबवावी, तसेच ईव्हीएममुळे लोकशाहीला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने या होणाºया प्रकाराची शहानिशा करण्याची मागणी करण्यात आली. महाराष्ट्रात झालेल्या सर्व ४८ लोकसभा निवडणूक क्षेत्रामध्ये परत निवडणुका घेऊन आगामी सर्व निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातून घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक डोके, डॉ. शरदचंद्र वानखेडे, डॉ. प्रवीण कनकुटे, दीपक बोराडे, माजेदभाई, विजय लहाने, राजीव दळे, बाळासाहेब रत्नपारखे, मैनाबाई खंडागळे, मीना वाहुळे, विनोद दांडगे, अ‍ॅड. कैलास रत्नपारखे, संतोष आढाव, राहुल भालेराव, राजेंद्र खरात, विष्णू खरात, दीपक घोरपडे, ज्ञानेश्वर जाधव, सर्जेराव मगरे, सुरेश उघडे, विलास नरवडे, गौतम वाघमारे, शेख हनीफ, लक्ष्मण राठोड, सुभाष आधुडे, सिद्धार्थ कनकुटे, सूरज सोनवणे आदींची उपस्थिती होती.बदनापूर येथेही तहसीलदारांना निवेदनबदनापूरमध्येही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार छाया पवार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात ईव्हीएम ऐवजी पुन्हा जुन्याच पद्धतीने मतदान घेण्याची मागणी केली.यावेळी संतोष शेळके, रविराज वाहुळे, प्रकाश मगरे, राहुल तुपे, हरीश बोर्डे, प्रकाश खरात, अरुण हिवराळे, दगडू पवार, शैलेंद्र मिसाळ, सुरेंद्र तुपे, गणेश बोर्डे, अक्षय रगडे, भारत रगडे, पंकज सोनवणे आदी उपस्थित होते.भोकरदनमध्येही ‘वंचित’कडून विरोधभोकरदन येथील भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMorchaमोर्चाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीagitationआंदोलन