शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतरही आन्वा येथे पाणीटंचाई कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:37 IST

पाणी पुरवठ्याचे एकही टँकर सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआन्वा : भोकरदन तालुक्यातील आन्वा येथे नायब तहसीलदार तसेच पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांनी पाहणी केली होती. मात्र असे असताना आता आठवडा उलटला आहे. तरी देखील पाणी पुरवठ्याचे एकही टँकर सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.आन्वा हे भोकरदन तालुक्यातील एक मोठे गाव आहे. या गावाची लोकसंख्या १२ हजार एवढी आहे. या गावात गेल्या दहा ते १२ वर्षापासून पाणीपुरवठ्याची ओरड कायम असल्याचे ग्रामस्थांनी सािंगतले. आता किमान या गावात लक्ष देऊन कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे. असे असताना याकडे ना प्रशासन ना लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने परिस्थिती निर्माण झाली आहे. आठवडभरापूर्वी नायब तहसीलदार काशीनाथ तांगडे आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांनी आन्वा येथे भेट देऊन जलस्त्रोतांची पाहणी केली होती. विहिरींनी तळ गाठला असून, आजूबाजूला पाण्याचा कुठलाच खात्रीशीर पर्याय नसल्याने चार टँकर सुरू केल्याशिवाय गावाची तहान भागणार नाही अशी मागणी यावेळी आन्वाचे सरपंच मदन कुलवाल यांनी केली आहे.या संदर्भात ग्रामविकास अधिकारी महेंद्र साबळे यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात आल्याची माहिती सरपंच कुलवाल आणि उपसरपंच अमरजीत देशमुख यांनी दिली. एकूणच एवढी गंभीर स्थिती असताना प्रशासन कुठल्या आधारावर टँकर सुरू करण्यास मान्यता देत नाही, हा संशोधनाचा विषय ठरला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ