शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

बोंडअळीचा धसका; डिसेंबरपर्यंत उत्पादन देणाऱ्या कपाशीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:50 AM

गेल्यावर्षी बोंड अळीच्या हल्ल्याने कपाशीचे उत्पादन घटले होते. तशी स्थिती यंदा होऊ नये म्हणून केवळ डिसेंबर पर्यंतच कपाशीचे उत्पादन देणा-या बियाणांचीच लागवड करावी, अशा सचूना कृषी विभागाने शेतक-यांना दिल्या आहेत.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्यावर्षी बोंड अळीच्या हल्ल्याने कपाशीचे उत्पादन घटले होते. तशी स्थिती यंदा होऊ नये म्हणून केवळ डिसेंबर पर्यंतच कपाशीचे उत्पादन देणा-या बियाणांचीच लागवड करावी, अशा सचूना कृषी विभागाने शेतक-यांना दिल्या आहेत. त्यामुळे बोंड अळीचा हल्ला रोखण्यासाठीचे हे उपाय असल्याचे सांगण्यात आले.यंदा मान्सूनचे आगमन अंदमान-निकोबारच्या समुद्रात झाल्याने तो यंदा वेळेवर बरसेल, अशी आशा आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभाग, बियाणे व्यापारी व शेतकºयांनी जय्यत तयारी केली आहे. यंदा कपाशीचे क्षेत्र घटणार अशी चिन्हे असली तरी, कृषी विभागाने आठ लाख बिटीची पाकीटे मागवली असून, जवळपास पावणेतीन लाख पाकीट विक्रीसाठी संबंधित दुकानांवर वितरीत केली आहेत. बियाणांप्रमाणे खतांचा साठाही मूबलक प्रमाणात असल्याची माहिती जि.प.चे कृषी विस्तार अधिकारी हरिचंद्र झनझन यांनी दिली आहे.यंदा हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पाऊस वेळेवर पडण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतक-यांनी शेतीची पेरणीपूर्व मशागत पूर्ण केली आहे. आता मृग नक्षत्र लागल्यावर एक, दोन चांगले पाऊस झाल्यानंतर शेतकरी खरिपाच्या पेरणीला सज्ज होणार आहे.यंदा जून अखरेपर्यंत खरीपाची किमान ५० टक्के पेरणी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात पाच लाख ९७ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यात कपाशीचे दोन लाख ७५० हेक्टर एवढे क्षेत्र आहे.कपाशी पाठोपाठ सोयाबीन लागवडीला जिल्ह्यात प्राधान्य दिले जाते. सायोबीनचे क्षेत्र हे एक लाख ३३ हजार हेक्टर असून, त्यासाठी २५ लाख ३५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यात महाबीजकडून ८ हजार क्विंटल बियाणे देणे आहे. अन्य पिकांच्या क्षेत्रातही वाढ होण्याची शक्यत आहे.बियाणांसह खतांचा मुबलक साठाजिल्ह्यात यंदा कपाशी, सोयाबीनसह अन्य वाणांची बियाणे उपलब्ध करून देण्यात आली असून, बियाणांसह खतांचाही मुबलकसाठा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यंदा एक लाख ८३ हजार मेट्रीक टन खताची मागणी केली होती. पैकी एक लाख ६६ मेट्रीक टन खत जालन्यात दाखल झाले आहे. आतापर्यंत ५८ हजार मेट्रीक टन खत बाजारात उपलब्ध करण्यात आले आहे.

 

टॅग्स :cottonकापूसAgriculture Sectorशेती क्षेत्र