शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

अमर रहे..च्या घोषणांनी परिसर झाला भावनिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 00:18 IST

जम्मू -काश्मीर येथील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन शिवाजी राठोड यांचे पार्थिव शनिवारी जालना शहरातून त्यांच्या गावी नेण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जम्मू -काश्मीर येथील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन शिवाजी राठोड यांचे पार्थिव शनिवारी जालना शहरातून त्यांच्या गावी नेण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासनातर्फे औरंगाबाद मार्गावर त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी नागरिकांनी दिलेल्या अमर रहे, अमर रहे, विर जवान अमर रहे च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला.बुलडाणा जिल्ह्यातील जवान नितीन शिवाजी राठोड हे पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झाले. त्यांचे पार्थिव शनिवारी सकाळी विमानाने औरंगाबादेत आणण्यात आले. त्यानंतर एका वाहनाने त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेताना, त्यांना सलामी देण्यासाठी मोठ्याप्रमाणावर नागरिकांनी औरंगाबाद मार्गावर गर्दी केली. 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्', 'पाकिस्तान मुदार्बाद, 'अमर रहे' , 'अमर रहे' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सलामी दिल्यावर जवानांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले.याप्रसंगी पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. नारायण कुचे, माजी आ. संतोष सांबरे, जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, एलसीबीचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, काँग्रेसचे शहाराध्यक्ष शेख महेमूद, गणेश राऊत यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येन उपस्थिती होती.श्रध्दांजलीसाठी अनेकांची उपस्थितीशहीद जवान नितीन राठोड यांचे पार्थिव जालना शहरात येणार असल्याची बातमी शहरात पसरली. त्यानंतर प्रत्येकाने औरंगाबाद चौफुलीकडे धाव घेत शहीद जवान राठोड यांना श्रध्दांजली दिली.अन प्रत्येकजण झाला भावूकशहीद जवान राठोड यांना श्रध्दांजली अर्पण करतावेळेस उपस्थित नागरिक भावूक झाले होते. यातील काही जणांच्या डोळ््यात तर अश्रू तरळले होते.पार्थिव येताच भारत माता की जयच्या घोषणाशहीद जवान नितीन राठोड यांचे पार्थिव औरंगाबाद चौफुली येथे येताच उपस्थितांनी भारत माता की जयच्या दिल्या. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत नागरिकांनी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला.

टॅग्स :MartyrशहीदTerror Attackदहशतवादी हल्लाSocialसामाजिक