शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

विद्युत तारा घासल्याने लागली उसाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:13 IST

शेतावरून गेलेल्या विद्युत तारा एकमेकाला घासून उडालेल्या ठिणग्यामुळे उसाच्या शेताला आग लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : शेतावरून गेलेल्या विद्युत तारा एकमेकाला घासून उडालेल्या ठिणग्यामुळे उसाच्या शेताला आग लागली. या आगीत दीड एकर ऊसाचा जळून कोळसा झाला आहे.टेंभुर्णी येथील शेतकरी अरुण राधाकिसन खरात यांचे गणेशपूर शिवारात शेत आहे. त्यांनी आपल्या शेतातील दिड एकर ऊस तसेच रसवंतीसह जनावरांसाठी चारा म्हणून संभाळून ठेवला होता.दरम्यान, सोमवारी विद्युत तारा घासून झालेल्या घर्षणाने या उसाला आग लागली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने या आगीने क्षणात रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण उसाचा जळून कोळसा झाला. यात खरात यांचे जवळपास दीड लाखाचे नुकसान झाले आहे.परिसरातील शेतकऱ्यांनी त्वरित धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. दरम्यान, ऐन दुष्काळात मोठी आर्थिक झळ बसलेल्या या शेतकऱ्याला त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.या परिसरातील शेतावरून अकोला देव सबस्टेशनला गेलेल्या विजेच्या विद्युत तारा गेलेल्या आहेत. विशेष म्हणजे सहज खालून हात पुरेल अशा या तारा खाली लोंबकळल्या आहेत. यातून नेहमीच स्पार्किंग होत असते. यामुळे परिसरातील शेतक-यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. या तारांच्या दुरूस्तीबाबत वेळोवेळी महावितरणाला सांगितले पण ते दुर्लक्ष करीत आहे. यामुळे जीवित हानी होण्याचा धोका आहे.- शिवहरी खरात, शेतकरी

टॅग्स :fireआगFarmerशेतकरीagricultureशेती