शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
4
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
5
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
6
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
7
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
8
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
9
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
10
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
11
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
12
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
13
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
14
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
15
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
16
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
17
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
18
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
19
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
20
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

शिक्षण विभागाने रोखले २५५८ बालकांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 00:13 IST

यावर्षी शिक्षण विभागाने जिल्ह्यातील २५५८ बालकांचे स्थलांतर रोखले आहे तर ७४० विद्यार्थ्यांना शिक्षण हमीपत्रक देऊन प्रवेश दिला आहे

दीपक ढोले।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी तीन वर्षांपासून राज्यात ‘विना वसतिगृह स्थलांतर थांबवणे’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमानुसार दरवर्षी शिक्षण विभागाच्यावतीने उसतोड कामगारांचे प्रबोधन करून स्थलांतर थांबविण्यात येते. यावर्षी शिक्षण विभागाने जिल्ह्यातील २५५८ बालकांचे स्थलांतर रोखले आहे तर ७४० विद्यार्थ्यांना शिक्षण हमीपत्रक देऊन प्रवेश दिला आहे.कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला की मोठ्या प्रमाण जिल्ह्यातून ऊसतोड कामगार आपल्या कुटुंबासह स्थलांतर करतात. यामुळे अनेक मुला-मुलींचे अर्ध्यातच शिक्षण राहते. परिणामी, मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. ते शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शिक्षण विभागातर्फे विना वसतिगृह स्थलांतर थांबवणे हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमाअंतर्गत स्थलांतरित होणाऱ्या पालकांचे प्रबोधन करून मुलांचे स्थलांतर रोखले जाते. मागील तीन वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे व मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्ह्यातही २०१९-२० यावर्षात हा उपक्रम राबविण्यात आला.यात जवळपास २५५८ विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्यात आले तर जे विद्यार्थी बाहेरगावी गेले, त्यांना शिक्षण हमीपत्रक देऊन दुस-या शाळेत प्रवेश देण्यात आला. हे विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेतात तेथील शिक्षकांकडून हे हमीपत्रक भरून घेऊन ज्या शाळेत प्रवेश घ्यायचा आहे, त्या शाळेत सादर करतात. जिल्ह्यातील ७४० विद्यार्थ्यांना शिक्षण हमीपत्रक देऊन प्रवेश देण्यात आला. यात जालना तालुक्यातील ८, बदनापूर ७५, अंबड ४१२, घनसावंगी ५५, परतूर १२०, मंठा ९, भोकरदन ४५ तर जाफराबाद तालुक्यातील १६ विद्यार्थ्यांना हमीपत्रक देण्यात आले. यासाठी सीईओ निमा अरोरा, शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ, उपशिक्षणाधिकारी खरात यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतल्यानेच हे शक्य झाले आहे.अंबड तालुका : सर्वाधिक स्थलांतरअंबड तालुक्यातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. अंबड तालुक्यातील जवळ ४१२ विद्यार्थी यावर्षी स्थलांतरित झाले. या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण हमीपत्रक देऊन प्रवेश देण्यात आला आहे. अंबडमधील ८६७ विद्यार्थ्यांचे स्थलांतर थांबविण्यात आले तर परतूर तालुक्यातील १२० विद्यार्थ्यांचे स्थलांतर झाले.जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे व मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी वेळोवेळी बैठका घेऊन गटशिक्षण अधिकारी व इतर अधिका-यांना स्थलांतर रोखण्याचे आदेश दिले होते.अधिका-यांनी पालकांचे प्रबोधन करून जवळपास २५५८ विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखले. पालकांना शिक्षणाचे महत्त्व सांगून बालकांना घेऊन न जाण्याचे आवाहन केले होते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रMigrationस्थलांतरणStudentविद्यार्थीSchoolशाळा