शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शिक्षण विभागाने रोखले २५५८ बालकांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 00:13 IST

यावर्षी शिक्षण विभागाने जिल्ह्यातील २५५८ बालकांचे स्थलांतर रोखले आहे तर ७४० विद्यार्थ्यांना शिक्षण हमीपत्रक देऊन प्रवेश दिला आहे

दीपक ढोले।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी तीन वर्षांपासून राज्यात ‘विना वसतिगृह स्थलांतर थांबवणे’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमानुसार दरवर्षी शिक्षण विभागाच्यावतीने उसतोड कामगारांचे प्रबोधन करून स्थलांतर थांबविण्यात येते. यावर्षी शिक्षण विभागाने जिल्ह्यातील २५५८ बालकांचे स्थलांतर रोखले आहे तर ७४० विद्यार्थ्यांना शिक्षण हमीपत्रक देऊन प्रवेश दिला आहे.कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला की मोठ्या प्रमाण जिल्ह्यातून ऊसतोड कामगार आपल्या कुटुंबासह स्थलांतर करतात. यामुळे अनेक मुला-मुलींचे अर्ध्यातच शिक्षण राहते. परिणामी, मुलांचे शैक्षणिक नुकसान होते. ते शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शिक्षण विभागातर्फे विना वसतिगृह स्थलांतर थांबवणे हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमाअंतर्गत स्थलांतरित होणाऱ्या पालकांचे प्रबोधन करून मुलांचे स्थलांतर रोखले जाते. मागील तीन वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे व मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्ह्यातही २०१९-२० यावर्षात हा उपक्रम राबविण्यात आला.यात जवळपास २५५८ विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्यात आले तर जे विद्यार्थी बाहेरगावी गेले, त्यांना शिक्षण हमीपत्रक देऊन दुस-या शाळेत प्रवेश देण्यात आला. हे विद्यार्थी ज्या शाळेत शिक्षण घेतात तेथील शिक्षकांकडून हे हमीपत्रक भरून घेऊन ज्या शाळेत प्रवेश घ्यायचा आहे, त्या शाळेत सादर करतात. जिल्ह्यातील ७४० विद्यार्थ्यांना शिक्षण हमीपत्रक देऊन प्रवेश देण्यात आला. यात जालना तालुक्यातील ८, बदनापूर ७५, अंबड ४१२, घनसावंगी ५५, परतूर १२०, मंठा ९, भोकरदन ४५ तर जाफराबाद तालुक्यातील १६ विद्यार्थ्यांना हमीपत्रक देण्यात आले. यासाठी सीईओ निमा अरोरा, शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ, उपशिक्षणाधिकारी खरात यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतल्यानेच हे शक्य झाले आहे.अंबड तालुका : सर्वाधिक स्थलांतरअंबड तालुक्यातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते. अंबड तालुक्यातील जवळ ४१२ विद्यार्थी यावर्षी स्थलांतरित झाले. या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण हमीपत्रक देऊन प्रवेश देण्यात आला आहे. अंबडमधील ८६७ विद्यार्थ्यांचे स्थलांतर थांबविण्यात आले तर परतूर तालुक्यातील १२० विद्यार्थ्यांचे स्थलांतर झाले.जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे व मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी वेळोवेळी बैठका घेऊन गटशिक्षण अधिकारी व इतर अधिका-यांना स्थलांतर रोखण्याचे आदेश दिले होते.अधिका-यांनी पालकांचे प्रबोधन करून जवळपास २५५८ विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखले. पालकांना शिक्षणाचे महत्त्व सांगून बालकांना घेऊन न जाण्याचे आवाहन केले होते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रMigrationस्थलांतरणStudentविद्यार्थीSchoolशाळा