शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

आई-वडील होणे सोपे; पण पालक होणे अवघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:37 IST

बोटावर मोजण्याइतकीच लोक पालक झाले आहेत. त्यांचे मुल चांगल्या मार्गाला लागले असून आईने मुलींना वेळ दिला पाहिजे, असे मत अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती च्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी व्यक्त केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : आपण आई-वडील होत आहोत. पण, पालक होत नाही. पालक होणे फार महत्त्वाचे आहे. बोटावर मोजण्याइतकीच लोक पालक झाले आहेत. त्यांचे मुल चांगल्या मार्गाला लागले असून आईने मुलींना वेळ दिला पाहिजे, असे मत अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती च्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी व्यक्त केले आहे.येथील पंडित गोविंदराव जळगांवकर नाट्यगृहात आयोजीत यशवंत व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावी फाउंडेशन, अकलूज च्या अध्यक्षा सविता व्होरा होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून वैशाली खरात, अनुराधा राख, कृषीभुषण विजयअण्णा बोराडे, जीएसटी उपायुक्त प्रशांत गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या व्याख्यानमालेत ‘कृषिउद्योग आणि महिला सक्षमीकरण’ या विषयावर पवार बोलत होत्या.दरम्यान सुनंदा पवार यांनी महिलांनी आपल्या जवाबदाऱ्या संभाळत असताना तरुण मुला- मुलींकडे कसे लक्ष दिले पाहिजे याचाही सल्ला दिला. त्या म्हणाल्या, आजची स्त्री का जिजाऊ होऊ शकत नाही. मुलांचा मुलींचा होणारा बदल हा फार घातक असून वेळेवरच याला अवर घातला नाही तर आपल्या हातात फक्त पश्चाताप शिवाय काहीच रहाणार नाही. त्यासाठी प्रत्येक स्त्रिला जिजाऊ बनावे लागेल, एक संस्कार क्षम पिढी ही काळाजी गरज आहे.ग्रामीण भागातील नागरिक खुश आहेत का ?सन २०२० साली भारत महासत्ता होणार हे स्वप्न माजी राष्ट्रपती स्व. एपीजे अब्दुल कलाम यांचे होते. याला फक्त १ वर्ष बाकी आहे. मातीचे घर गेले सिमेंटचे घर आले, कच्चे रस्ते गेले. चांगले रस्ते आले. चार चाकी आली. मात्र ग्रामीण भागातील लोकांची मानसिकत्ता बदलली आहे का? सर्व नागरिक खुश आहे का? हे सर्व झाले तरच देश महासत्ता बनेल. हे सर्व करीत असताना प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य, अधिकार ओळखूनच वागले पाहिजे, असेही सुनंदा पवार यांनी सांगितले.

टॅग्स :SocialसामाजिकFamilyपरिवार