शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात १०८ शेतकऱ्यांनी संपविले जीवन; १९ वर्षात यंदा सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 19:57 IST

९० प्रकरणांमध्ये वारसांना मिळाली शासकीय मदत

- विजय मुंडे 

जालना : दुष्काळ, नापिकी, रोगराईमुळे शेतातून उत्पन्न मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडला आहे. कुटुंबासमोरील प्रश्न, आर्थिक चणचण यासह इतर विविध कारणांनी चालू वर्षात आजवर तब्बल १०८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. मदतीसाठी दाखल प्रकरणांपैकी ९० मयत शेतकऱ्यांच्या वारसांना शासकीय मदतीचा लाभ देण्यात आला आहे. विशेष म्हणजे मागील १९ वर्षात यंदा सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

जिल्ह्यातील शेतकरी सतत या ना त्या कारणांनी आस्मानी-सुलतानी संकटाच्या फेऱ्यात अडकत आहे. हाती न येणारे शेतातील उत्पन्न आणि कुटुंबासमोर असलेले अनेक प्रश्न यातून हताश होणारे शेतकरी गळफास लावून, विषारी औषध प्राषण करून आत्महत्या करीत आहेत. २००१ ते २०१९ या कालावधीत आजवर जिल्ह्यातील तब्बल ६०५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील ४९२ शेतकऱ्यांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी एक लाख रूपये प्रमाणे मदत करण्यात आली आहे. तर १०० प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. चालू वर्षातील १३ प्रकरणे प्रलंबित आहेत. 

गत १९ वर्षांची आकडेवारी पाहता २००१ मध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर २००२ व २००३ या वर्षात शेतकरी आत्महत्या झाली नसल्याची नोंद प्रशासन दप्तरी आहे. त्यानंतर मात्र २००४ पासून सुरू झालेले शेतकरी आत्महत्येचे सत्र आजही सुरू असून, दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्येच्या प्रकरांमध्ये वाढ होत आहे. २००४ मध्ये १६, २००५ मध्ये ५, २००६ मध्ये ३९, २००७ मध्ये २५, २००८ मध्ये २०, २००९ मध्ये २, २०१० मध्ये ४, २०११ मध्ये ६, २०१२ मध्ये ६, २०१३ मध्ये ८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. २०१३ पर्यंत शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होते. मात्र, २००४ मध्ये ३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर २०१५ मध्ये ८३, २०१६ मध्ये ७६, २०१७ मध्ये ९१, २०१८ मध्ये ८३ तर चालू वर्षात २०१९ मध्ये आजवर तब्बल १०८  शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. हे प्रमाण मागील १९ वर्षात सर्वाधिक आहे. चालू वर्षातील १०८ पैकी ९० प्रकरणांमध्ये मयत शेतकऱ्यांच्या वारसांना शासकीय मदत देण्यात आली आहे. तर पाच प्रकरणे अपात्र ठरली असून, इतर १३ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. दरम्यान, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र, जालना जिल्ह्यात यंदा १०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासन, प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

नैसर्गिक आपत्तीत १२ जणांचा बळीजिल्ह्यात वीज पडल्याने, नदीत पडल्याने वाहून गेल्याने तब्बल १२ जणांचा बळी गेला आहे. यात जालना तालुक्यातील चौघांचा, भोकरदन तालुक्यातील चौघांचा तर जाफराबाद तालुक्यातील चौघांचा मृत्यू झाला आहे. मयतांना प्रत्येकी चार लाख रूपये प्रमाणे मदत करण्यात आली आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावरून विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची प्रशासनाकडून अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, तरीही शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी शासन, जिल्हा प्रशासनाने गावस्तरावरही विशेष कार्यक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरीagricultureशेतीJalanaजालना