शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
4
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
5
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
6
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
7
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
8
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
9
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
10
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
11
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
12
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
13
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
14
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
15
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
16
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
17
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
18
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
19
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
20
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी

वर्षभरात १०८ शेतकऱ्यांनी संपविले जीवन; १९ वर्षात यंदा सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 19:57 IST

९० प्रकरणांमध्ये वारसांना मिळाली शासकीय मदत

- विजय मुंडे 

जालना : दुष्काळ, नापिकी, रोगराईमुळे शेतातून उत्पन्न मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडला आहे. कुटुंबासमोरील प्रश्न, आर्थिक चणचण यासह इतर विविध कारणांनी चालू वर्षात आजवर तब्बल १०८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. मदतीसाठी दाखल प्रकरणांपैकी ९० मयत शेतकऱ्यांच्या वारसांना शासकीय मदतीचा लाभ देण्यात आला आहे. विशेष म्हणजे मागील १९ वर्षात यंदा सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

जिल्ह्यातील शेतकरी सतत या ना त्या कारणांनी आस्मानी-सुलतानी संकटाच्या फेऱ्यात अडकत आहे. हाती न येणारे शेतातील उत्पन्न आणि कुटुंबासमोर असलेले अनेक प्रश्न यातून हताश होणारे शेतकरी गळफास लावून, विषारी औषध प्राषण करून आत्महत्या करीत आहेत. २००१ ते २०१९ या कालावधीत आजवर जिल्ह्यातील तब्बल ६०५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील ४९२ शेतकऱ्यांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी एक लाख रूपये प्रमाणे मदत करण्यात आली आहे. तर १०० प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. चालू वर्षातील १३ प्रकरणे प्रलंबित आहेत. 

गत १९ वर्षांची आकडेवारी पाहता २००१ मध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर २००२ व २००३ या वर्षात शेतकरी आत्महत्या झाली नसल्याची नोंद प्रशासन दप्तरी आहे. त्यानंतर मात्र २००४ पासून सुरू झालेले शेतकरी आत्महत्येचे सत्र आजही सुरू असून, दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्येच्या प्रकरांमध्ये वाढ होत आहे. २००४ मध्ये १६, २००५ मध्ये ५, २००६ मध्ये ३९, २००७ मध्ये २५, २००८ मध्ये २०, २००९ मध्ये २, २०१० मध्ये ४, २०११ मध्ये ६, २०१२ मध्ये ६, २०१३ मध्ये ८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. २०१३ पर्यंत शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होते. मात्र, २००४ मध्ये ३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर २०१५ मध्ये ८३, २०१६ मध्ये ७६, २०१७ मध्ये ९१, २०१८ मध्ये ८३ तर चालू वर्षात २०१९ मध्ये आजवर तब्बल १०८  शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. हे प्रमाण मागील १९ वर्षात सर्वाधिक आहे. चालू वर्षातील १०८ पैकी ९० प्रकरणांमध्ये मयत शेतकऱ्यांच्या वारसांना शासकीय मदत देण्यात आली आहे. तर पाच प्रकरणे अपात्र ठरली असून, इतर १३ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. दरम्यान, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र, जालना जिल्ह्यात यंदा १०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासन, प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

नैसर्गिक आपत्तीत १२ जणांचा बळीजिल्ह्यात वीज पडल्याने, नदीत पडल्याने वाहून गेल्याने तब्बल १२ जणांचा बळी गेला आहे. यात जालना तालुक्यातील चौघांचा, भोकरदन तालुक्यातील चौघांचा तर जाफराबाद तालुक्यातील चौघांचा मृत्यू झाला आहे. मयतांना प्रत्येकी चार लाख रूपये प्रमाणे मदत करण्यात आली आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावरून विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची प्रशासनाकडून अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, तरीही शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी शासन, जिल्हा प्रशासनाने गावस्तरावरही विशेष कार्यक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरीagricultureशेतीJalanaजालना