शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात १०८ शेतकऱ्यांनी संपविले जीवन; १९ वर्षात यंदा सर्वाधिक शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 19:57 IST

९० प्रकरणांमध्ये वारसांना मिळाली शासकीय मदत

- विजय मुंडे 

जालना : दुष्काळ, नापिकी, रोगराईमुळे शेतातून उत्पन्न मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडला आहे. कुटुंबासमोरील प्रश्न, आर्थिक चणचण यासह इतर विविध कारणांनी चालू वर्षात आजवर तब्बल १०८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. मदतीसाठी दाखल प्रकरणांपैकी ९० मयत शेतकऱ्यांच्या वारसांना शासकीय मदतीचा लाभ देण्यात आला आहे. विशेष म्हणजे मागील १९ वर्षात यंदा सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

जिल्ह्यातील शेतकरी सतत या ना त्या कारणांनी आस्मानी-सुलतानी संकटाच्या फेऱ्यात अडकत आहे. हाती न येणारे शेतातील उत्पन्न आणि कुटुंबासमोर असलेले अनेक प्रश्न यातून हताश होणारे शेतकरी गळफास लावून, विषारी औषध प्राषण करून आत्महत्या करीत आहेत. २००१ ते २०१९ या कालावधीत आजवर जिल्ह्यातील तब्बल ६०५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील ४९२ शेतकऱ्यांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी एक लाख रूपये प्रमाणे मदत करण्यात आली आहे. तर १०० प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. चालू वर्षातील १३ प्रकरणे प्रलंबित आहेत. 

गत १९ वर्षांची आकडेवारी पाहता २००१ मध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. त्यानंतर २००२ व २००३ या वर्षात शेतकरी आत्महत्या झाली नसल्याची नोंद प्रशासन दप्तरी आहे. त्यानंतर मात्र २००४ पासून सुरू झालेले शेतकरी आत्महत्येचे सत्र आजही सुरू असून, दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्येच्या प्रकरांमध्ये वाढ होत आहे. २००४ मध्ये १६, २००५ मध्ये ५, २००६ मध्ये ३९, २००७ मध्ये २५, २००८ मध्ये २०, २००९ मध्ये २, २०१० मध्ये ४, २०११ मध्ये ६, २०१२ मध्ये ६, २०१३ मध्ये ८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. २०१३ पर्यंत शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होते. मात्र, २००४ मध्ये ३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तर २०१५ मध्ये ८३, २०१६ मध्ये ७६, २०१७ मध्ये ९१, २०१८ मध्ये ८३ तर चालू वर्षात २०१९ मध्ये आजवर तब्बल १०८  शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. हे प्रमाण मागील १९ वर्षात सर्वाधिक आहे. चालू वर्षातील १०८ पैकी ९० प्रकरणांमध्ये मयत शेतकऱ्यांच्या वारसांना शासकीय मदत देण्यात आली आहे. तर पाच प्रकरणे अपात्र ठरली असून, इतर १३ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. दरम्यान, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र, जालना जिल्ह्यात यंदा १०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासन, प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

नैसर्गिक आपत्तीत १२ जणांचा बळीजिल्ह्यात वीज पडल्याने, नदीत पडल्याने वाहून गेल्याने तब्बल १२ जणांचा बळी गेला आहे. यात जालना तालुक्यातील चौघांचा, भोकरदन तालुक्यातील चौघांचा तर जाफराबाद तालुक्यातील चौघांचा मृत्यू झाला आहे. मयतांना प्रत्येकी चार लाख रूपये प्रमाणे मदत करण्यात आली आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावरून विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांची प्रशासनाकडून अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, तरीही शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी शासन, जिल्हा प्रशासनाने गावस्तरावरही विशेष कार्यक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरीagricultureशेतीJalanaजालना