शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
4
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
6
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
7
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
8
हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
9
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
10
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
11
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
12
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
13
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
14
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
15
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
16
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
17
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
18
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
19
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
20
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी फुलशेती धोक्यात..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:47 IST

फळबाग, फुलशेतीला वेळेत पाणी देण्यास अडचणी येत असल्याने फुलशेती धोक्यात आली आहे. फुलांनी माना टाकण्यास सुरूवात केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : तालुक्यात उन्हाची तिव्रता वाढली असून, भूजल पातळीत झपाट्याने खालावत आहे. विहिरींनीही तळ गाठल्याने फुले शेती आणि फळबाग असणाऱ्या शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. फळबाग, फुलशेतीला वेळेत पाणी देण्यास अडचणी येत असल्याने फुलशेती धोक्यात आली आहे. फुलांनी माना टाकण्यास सुरूवात केल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.तालुक्यात वलखेड, शेवगा, सालगाव, बाबई, परतूर शिवाराचा काही भाग, चिंचोली आदी गावात विविध प्रकारच्या फुलांची शेती केली जाते. फुलशेती म्हणजे नगदी पैसा मिळवून देणारा व्यवसाय असल्याने अनेक शेतकरी फुलाच्या लागवडीकडे वळले आहेत. तालुक्यातील शेवंती, मोगरा, गुलाब, केवडा आदी फुलांना मराठवाड्यासह बाहेरील हैदराबाद राज्यात सुध्दा मागणी असते. अनेक वर्षांपासून या तालुक्यात फुलांची शेती करतात.यावर्षी कुठल्याच शेतमालास भाव नाही. त्यातच विहिरींची पाणीपातळी कमी झाल्याने फुलशेतीला पुरेसे पाणी देण्यास अडचणी येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्या लग्नसराई असल्याने फुलशेतीतून हाती पैसा येईल, अशी आशा शेतक-यांना होती. मात्र, पाण्याअभावी कळ्या सुकू लागल्याने शेतक-यांच्या आशेवरच पाणी फिरले आहे.खर्च करूनही हाती फारशी मिळत येणार नसल्याचे जाणवू लागल्याने शेतक-यांमध्ये नाराजी आहे. आता लागवडीचा खर्चही निघतो की नाही, याची चिंता शेतक-यांना सतावत आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळFarmerशेतकरी