शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

पावसाची पाठ अन् पाण्याची टंचाई, जालना जिल्ह्यात प्रशासनाकडून १०९ टँकरला मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 19:55 IST

मोठ्या पावसाची प्रतीक्षा, जालना जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागात पाणीटंचाई कायम

जालना : ऑगस्ट महिन्याच्या मध्यावधीपर्यंतही जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने नदी-नाले कोरडेठाक असून, प्रकल्पांमध्येही पाण्याचा ठणठणाट आहे. परिणामी ग्रामीण भागातील पाणीटंचाई कायम असून, होणारी मागणी पाहता प्रशासनाकडून १०९ टँकरला ऑगस्ट अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

निम्मा पावसाळा संपला तरी जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. एकीकडे नदी, ओढे, नाले आणि प्रकल्पांतही पाण्याचा ठणठणाट आहे. परंतु, प्रशासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यात तब्बल ७१.४१ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. एकीकडे रिमझिम पावसावर खरिपातील पिके तगली आहेत. परंतु, दुसरीकडे ग्रामीण, शहरी भागातील पाणीटंचाईच्या झळा आजही कायम आहेत. मुदत संपल्याने प्रशासनाकडून टँकरही बंद करण्यात आले होते. परंतु, प्रकल्पांतच पाणी नाही तर पाणीपुरवठा योजना सुरू होणार कशा, असा प्रश्न आहे. त्यामुळे टँकर पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी गावा-गावांतून होत होती. ही बाब विचारात घेता जिल्हा प्रशासनाकडून टँकर सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून, ऑगस्ट अखेरपर्यंत तरी संबंधित गावांतील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

भोकरदनमध्ये टँकरचा आधारभोकरदन शहरातील पाणीटंचाई आजही भीषण आहे. शहरासाठी २५ टँकर पूर्ववत सुरू करण्यात आले आहेत. शिवाय तालुक्यातील १८ गावे आणि एका वाडीसाठी २३ टँकर सुरू करण्यात आले आहेत. अंबड तालुक्यातील १३ गावांसाठी १७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

एक लाख लोकांची तहान टँकरवरभर पावसाळ्यातही जालना जिल्ह्यात पाणीटंचाई कायम आहे. भोकरदन शहरासह ३२ गावे आणि एका वाडीवरील एक लाख एक हजार २८४ नागरिकांना टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यासाठी सद्य:स्थितीत ६५ टँकर सुरू आहेत. त्याशिवाय बदनापूर तालुक्यात २३ आणि जालना तालुक्यात २१ टँकर सुरू करण्यासही हिरवा कंदील मिळाला आहे.

जिल्ह्यात अशी आहे पावसाची नोंदतालुका- टक्केवारीजालना- ७१.३६बदनापूर- ६७.३६भोकरदन- ७५.१५जाफराबाद- ७२.०२परतूर- ७७.५२मंठा- ७३.१२अंबड- ६२.९५घनसावंगी- ६५.१९एकूण- ७१.४०

टॅग्स :JalanaजालनाWaterपाणीRainपाऊस