शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची पाठ अन् पाण्याची टंचाई, जालना जिल्ह्यात प्रशासनाकडून १०९ टँकरला मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 19:55 IST

मोठ्या पावसाची प्रतीक्षा, जालना जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागात पाणीटंचाई कायम

जालना : ऑगस्ट महिन्याच्या मध्यावधीपर्यंतही जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्याने नदी-नाले कोरडेठाक असून, प्रकल्पांमध्येही पाण्याचा ठणठणाट आहे. परिणामी ग्रामीण भागातील पाणीटंचाई कायम असून, होणारी मागणी पाहता प्रशासनाकडून १०९ टँकरला ऑगस्ट अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

निम्मा पावसाळा संपला तरी जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. एकीकडे नदी, ओढे, नाले आणि प्रकल्पांतही पाण्याचा ठणठणाट आहे. परंतु, प्रशासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यात तब्बल ७१.४१ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे. एकीकडे रिमझिम पावसावर खरिपातील पिके तगली आहेत. परंतु, दुसरीकडे ग्रामीण, शहरी भागातील पाणीटंचाईच्या झळा आजही कायम आहेत. मुदत संपल्याने प्रशासनाकडून टँकरही बंद करण्यात आले होते. परंतु, प्रकल्पांतच पाणी नाही तर पाणीपुरवठा योजना सुरू होणार कशा, असा प्रश्न आहे. त्यामुळे टँकर पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी गावा-गावांतून होत होती. ही बाब विचारात घेता जिल्हा प्रशासनाकडून टँकर सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून, ऑगस्ट अखेरपर्यंत तरी संबंधित गावांतील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

भोकरदनमध्ये टँकरचा आधारभोकरदन शहरातील पाणीटंचाई आजही भीषण आहे. शहरासाठी २५ टँकर पूर्ववत सुरू करण्यात आले आहेत. शिवाय तालुक्यातील १८ गावे आणि एका वाडीसाठी २३ टँकर सुरू करण्यात आले आहेत. अंबड तालुक्यातील १३ गावांसाठी १७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

एक लाख लोकांची तहान टँकरवरभर पावसाळ्यातही जालना जिल्ह्यात पाणीटंचाई कायम आहे. भोकरदन शहरासह ३२ गावे आणि एका वाडीवरील एक लाख एक हजार २८४ नागरिकांना टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यासाठी सद्य:स्थितीत ६५ टँकर सुरू आहेत. त्याशिवाय बदनापूर तालुक्यात २३ आणि जालना तालुक्यात २१ टँकर सुरू करण्यासही हिरवा कंदील मिळाला आहे.

जिल्ह्यात अशी आहे पावसाची नोंदतालुका- टक्केवारीजालना- ७१.३६बदनापूर- ६७.३६भोकरदन- ७५.१५जाफराबाद- ७२.०२परतूर- ७७.५२मंठा- ७३.१२अंबड- ६२.९५घनसावंगी- ६५.१९एकूण- ७१.४०

टॅग्स :JalanaजालनाWaterपाणीRainपाऊस