शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

पाहुण्यांच्या हाताने दुष्काळमुक्तीचा प्रपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 00:32 IST

एका तासाच्या पाहणीत जर त्यांना दुष्काळ कळत असेल तर मग त्यांनी हवाई पाहणी केली असती तरी बराचवेळ वाचला असता अन् मदतही लवकर मिळाली असती

संजय देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठवाड्याची ओळख ही संत-महंतांची भूमी म्हणून ओळखली जाते. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे या भागात दुष्काळ हा जणूकाही पाचविलाच पूजलेला आहे. मराठवाड्याचे भूमीपुत्र आणि माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळे पैठण येथे जायकवाडीचे धरण झाले.यामुळे तरी किमान काही शहरांचा विकास झाला आहे. त्यानंतरचा दुसरा मोठा प्रकल्प म्हणजे निम्न दुधना म्हणता येईल. जायकवाडीतून उजवा आणि डाव्या कालाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल आहे. गोदावरी काठावरील संपन्न शेतीमुळे तरी या भागात नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या ऊसाची लागवड होऊन साखर कारखानदारी बहरली. असे असले तरी मराठवाड्याच्या बहुतांश भागात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका हा नवीन नाही. त्यामुळे यंदा आपण केवळ जालना जिल्ह्याचाच विचार केल्यास केवळ ६१ टक्के पाऊस पडला आहे.खरीप हंगामात पेरणी केल्यावर आणि हवामान खात्याच्या शंभर टक्के पर्जन्यमानाच्या अंदाजाने सर्वजण सुखावले होते. जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने जोरदार हजेरीही लावली. परंतु नंतर त्याने पाठ फिरवली त्यामुळे बळीराजा पिळून निघाला. रबी हंगामात तर पावसाने पेरणी योग्य शिडकावाही केला नाही. त्यामुळे रबीचा विषय संपला आहे. कपाशीची लागवड जिल्ह्यात ३ लाख हेक्टरवर तर १ लाख ३५ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. मात्र, ५० टक्केपेक्षा कमी उत्पादन झाल्याने शेतकºयांचे डोळे पांढेरे झाले आहेत. लावलेला खर्चही निघालेला नाही. त्यामुळे आता सर्वस्व अवलंबून हे माय-बाप म्हणविणा-या सरकारवर आहे. पिकविमा, तसेच दुष्काळी अनुदानाच्या माध्यमातून मदतीची आशा आहे. जिल्ह्यातील ९७० गावातील आणेवारी ही ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. या दुष्काळात राज्यातील शेतकºयांना मदत मिळावी म्हणून राज्य सरकारकडून सात हजार कोटींचा प्रस्ताव सादर केल्याचे सांगितले. जात आहे. त्यामुळे हे पॅकेज मिळाल्यास किमान दुष्काळ तरी अच्छे दिनचे स्वप्न हे सरकार पूर्ण करेल काय या चिंतेत सर्वजण आहेत. जालना जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी नुकतेच केंद्रातील वरिष्ठ अधिका-यांचे पथक मंगळवारी येऊन गेले. त्यांनी बदनापूर तालुक्यातील जवसगाव आणि जालना तालुक्यातील बेथलम येथे पाहणी केली. मात्र एका तासाच्या पाहणीत जर त्यांना दुष्काळ कळत असेल तर मग त्यांनी हवाई पाहणी केली असती तरी बराचवेळ वाचला असता अन् मदतही लवकर मिळाली असती. हे पथक आल्यावर त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांचे प्रश्न हिंदीतून असल्याने बळीराजाची तारांबळ उडाली. अनेकांनी या पथकाकडे चारा-पाण्याची व्यवस्था ही तातडीने करण्याची मागणी केली. तर काही शेतकºयांनी शेततळ्यासाठी लागणारी प्लास्टिकची पन्नी देण्याचे सांगितले. परंतु दुर्दैव हे की, या पथकातील सदस्यांनी हम कुछ देणे नही..सिर्फ देखने आये है..असे सांगून शेतकºयांच्या आशेवर पाणी सोडले. या शिष्टमंडळात जे अधिकारी होते निश्चितच त्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञ होते.परंतु दुष्काळाची पाहणी करण्यासाठी ज्यांना शेतीतले कळते अशांना या पाहणी पथकात सहभागी करून घेतले असते तर यामुळे बळीराजाला आणखी विश्वास वाटला असता. नसता हा दौराही एक उपचार म्हणून रहिला तर मात्र, बळीराजाची ताकद काय असते ते आगामी काळातील राजकीय मैदानातून दिसून येणार आहे. केवळ शेतकºयांची मने जिंकून सरकार काही तरी करत आहे, असे भासविण्यापेक्षा काही तरी ठोस येत्या एक-दोन महिन्यात मिळाल्यास या पाहणी दौ-याचे फलित म्हणावे लागेल.

टॅग्स :droughtदुष्काळCentral Governmentकेंद्र सरकार