शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

पाहुण्यांच्या हाताने दुष्काळमुक्तीचा प्रपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 00:32 IST

एका तासाच्या पाहणीत जर त्यांना दुष्काळ कळत असेल तर मग त्यांनी हवाई पाहणी केली असती तरी बराचवेळ वाचला असता अन् मदतही लवकर मिळाली असती

संजय देशमुख।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठवाड्याची ओळख ही संत-महंतांची भूमी म्हणून ओळखली जाते. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे या भागात दुष्काळ हा जणूकाही पाचविलाच पूजलेला आहे. मराठवाड्याचे भूमीपुत्र आणि माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळे पैठण येथे जायकवाडीचे धरण झाले.यामुळे तरी किमान काही शहरांचा विकास झाला आहे. त्यानंतरचा दुसरा मोठा प्रकल्प म्हणजे निम्न दुधना म्हणता येईल. जायकवाडीतून उजवा आणि डाव्या कालाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल आहे. गोदावरी काठावरील संपन्न शेतीमुळे तरी या भागात नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या ऊसाची लागवड होऊन साखर कारखानदारी बहरली. असे असले तरी मराठवाड्याच्या बहुतांश भागात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका हा नवीन नाही. त्यामुळे यंदा आपण केवळ जालना जिल्ह्याचाच विचार केल्यास केवळ ६१ टक्के पाऊस पडला आहे.खरीप हंगामात पेरणी केल्यावर आणि हवामान खात्याच्या शंभर टक्के पर्जन्यमानाच्या अंदाजाने सर्वजण सुखावले होते. जूनच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने जोरदार हजेरीही लावली. परंतु नंतर त्याने पाठ फिरवली त्यामुळे बळीराजा पिळून निघाला. रबी हंगामात तर पावसाने पेरणी योग्य शिडकावाही केला नाही. त्यामुळे रबीचा विषय संपला आहे. कपाशीची लागवड जिल्ह्यात ३ लाख हेक्टरवर तर १ लाख ३५ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. मात्र, ५० टक्केपेक्षा कमी उत्पादन झाल्याने शेतकºयांचे डोळे पांढेरे झाले आहेत. लावलेला खर्चही निघालेला नाही. त्यामुळे आता सर्वस्व अवलंबून हे माय-बाप म्हणविणा-या सरकारवर आहे. पिकविमा, तसेच दुष्काळी अनुदानाच्या माध्यमातून मदतीची आशा आहे. जिल्ह्यातील ९७० गावातील आणेवारी ही ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. या दुष्काळात राज्यातील शेतकºयांना मदत मिळावी म्हणून राज्य सरकारकडून सात हजार कोटींचा प्रस्ताव सादर केल्याचे सांगितले. जात आहे. त्यामुळे हे पॅकेज मिळाल्यास किमान दुष्काळ तरी अच्छे दिनचे स्वप्न हे सरकार पूर्ण करेल काय या चिंतेत सर्वजण आहेत. जालना जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी नुकतेच केंद्रातील वरिष्ठ अधिका-यांचे पथक मंगळवारी येऊन गेले. त्यांनी बदनापूर तालुक्यातील जवसगाव आणि जालना तालुक्यातील बेथलम येथे पाहणी केली. मात्र एका तासाच्या पाहणीत जर त्यांना दुष्काळ कळत असेल तर मग त्यांनी हवाई पाहणी केली असती तरी बराचवेळ वाचला असता अन् मदतही लवकर मिळाली असती. हे पथक आल्यावर त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांचे प्रश्न हिंदीतून असल्याने बळीराजाची तारांबळ उडाली. अनेकांनी या पथकाकडे चारा-पाण्याची व्यवस्था ही तातडीने करण्याची मागणी केली. तर काही शेतकºयांनी शेततळ्यासाठी लागणारी प्लास्टिकची पन्नी देण्याचे सांगितले. परंतु दुर्दैव हे की, या पथकातील सदस्यांनी हम कुछ देणे नही..सिर्फ देखने आये है..असे सांगून शेतकºयांच्या आशेवर पाणी सोडले. या शिष्टमंडळात जे अधिकारी होते निश्चितच त्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञ होते.परंतु दुष्काळाची पाहणी करण्यासाठी ज्यांना शेतीतले कळते अशांना या पाहणी पथकात सहभागी करून घेतले असते तर यामुळे बळीराजाला आणखी विश्वास वाटला असता. नसता हा दौराही एक उपचार म्हणून रहिला तर मात्र, बळीराजाची ताकद काय असते ते आगामी काळातील राजकीय मैदानातून दिसून येणार आहे. केवळ शेतकºयांची मने जिंकून सरकार काही तरी करत आहे, असे भासविण्यापेक्षा काही तरी ठोस येत्या एक-दोन महिन्यात मिळाल्यास या पाहणी दौ-याचे फलित म्हणावे लागेल.

टॅग्स :droughtदुष्काळCentral Governmentकेंद्र सरकार