शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

केदारखेडा मंडळात पावसाची हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:26 IST

भोकरदन तालुक्यातील केदारखेडा मंडळातील दहा गावांमध्ये पावसाने पाठ फिरविली आहे

लोकमत न्यूज नेटवर्ककेदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा मंडळातील दहा गावांमध्ये पावसाने पाठ फिरविली आहे. पावसाअभावी धूळपेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांची पेरणी वाया जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.भोकरदन तालुक्यातील पारध, पिंपळगाव रेणुकाई, धावडा, आन्वा, लेहा, जळगाव सपकाळ आदी परिसरात पावसाने कहर केला आहे. नदीला आलेला पुरामुळे ेशेतक-यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे याच तालुक्यातील केदारखेडा परिसरात तूरळक पाऊस वगळता अद्यापही मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.तालुक्यातच एकीकडे पावसाच्या कहरमुळे पेरणी वाया जाण्याची भीती आहे तर दुसरीकडे अद्यापही पेरणीलाच सुरुवात झाली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंता पसरली आहे. बुधवारपासून परिसरता ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. मात्र, पाऊस पडत नसल्याने अनेकांची चिंता वाढली आहे. आजूबाजूस सर्वत्र जोरदार पाऊस झाला असला तरी परिसरातील दहाहून अधिक गावांना पावसाने हुलकावणी दिली आहे.परिसरात पाऊस झाला नसला तरी पूर्णा नदीला मात्र पाणी आले आहे. वरच्या भागात ब-यापैकी पाऊस झाल्याने पूर्णा नदी वाहू लागल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. सुरुवातील परिसरात मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण तयार होत असल्याने शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाले. मात्र, जोरदार पाऊसच नसल्याने शेतक-यांनी सध्या पेरणी थांबवली आहे. जोरदार पावसाच्या प्रतीक्षा लागली आहे.पावसाच्या रिपरिपमुळे पारध परिसरात दुबार पेरणीचे संकटलोकमत न्यूज नेटवर्कपारध : भोकरदन तालुक्यातील पारधसह परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे अनेक शेतकºयांच्या शेतात पाणी साचले आहे. तर काही शेतक-यांनी केलेली धूळपेरणी वाया गेली आहे. त्यामुळे शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.परिसरात २२ जून पासून कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे परिसरातून वाहणारी रायघोळ नदी आठवड्यातून तब्बल पाच वेळेस दुथडी भरून वाहिली. नदीच्या पुरामुळे नदी काठच्या शेतक-यांची जमीन खरडून गेल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास परिसरातील पारध खुर्द, शेलुद, पद्मावती आदी ठिकाणी जोरदार पाऊस झाला. हा पाऊस तब्बल अडीच तास धो -धो कोसळत होता. त्यामुळे अनेक शेतांमध्ये गुडघाभर पाणी शिरल्याने क्षणात होत्याचे नव्हते झाले. या परिसरात जवळपास साठ टक्के शेतक-यांनी आपल्या शेतात कपाशी, सोयाबीन, मका आणि मिरचीची लागवड केली आहे. बियाणे आणि खरावर शेतक-यांचे हजारो रुपये खर्च झाले आहेत. शनिवारी झालेल्या पावसामुळे अनेकांची पेरणीच वाहून गेली आहे. शेतात पाणी साचल्याने लहान लहान कोंब नष्ट झाले. त्यामुळे इतके दिवस पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणा-या शेतक-यांना पाऊस वै-यासारखा वाटू लागला आहे. वाया गेलेल्या बी- बियाणांचा खर्च कसा करावा याची चिंता शेतक-यांना सतावत आहे. परिसरात झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने पंचनामे करुन नुकसान ग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतक-यांनी केली.

टॅग्स :Rainपाऊसdroughtदुष्काळagricultureशेती