शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
2
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
3
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
4
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
5
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
6
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
7
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
8
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
9
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
10
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
11
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
12
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
13
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
14
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
15
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
16
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
17
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
18
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
19
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
20
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

‘दुधना’च्या कोरड्या पात्राने पाणीटंचाईची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 00:01 IST

दुधना नदीच्या कोरड्या पात्राने भविष्यातील पाणीटंचाईची चिंता वाढली असून, अनेक गावांना येणाऱ्या काळात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : दुधना नदीच्या कोरड्या पात्राने भविष्यातील पाणीटंचाईची चिंता वाढली असून, अनेक गावांना येणाऱ्या काळात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.यंदाचा पावसाळा संपत आला तरी परतूर तालुक्यातील अनेक नदी, नाले, तलाव व धरण कोरडेठाक आहेत. ११ आॅक्टोबरपर्यंत पावसाची सरासरी ५१७. ३५ मिमी. नोंद झाली आहे. मागील वर्षी याच तारखेला पावसाची सरासरी ४९४. २० मिमी. होती. या वर्षी सरासरी अधिक दिसत असली तरी हा पाऊस सर्वत्र सारखा नाही. तसेच पावसाचा जोर नसल्याने नद्या नाल्यांना पूर आलेला नाही. त्यामुळे धरण, तलाव कोरडेठाक आहेत. परतूर तालुक्यासह परिसराला वरदान ठरणारा निम्न दुधना प्रकल्प यावर्षी कोरडा दिसत आहे. दमदार पाऊस न झाल्याने या धरणात यावर्षी एक थेंंबही पाणीसाठा वाढला नाही. या धरणावर परतूर, मंठा, सेलूसह परिसरातील नागरिकांची तहान अवलंबून आहे. दुधना काठची गावही सर्वच गावे या धरणाच्या बॅक वॉटरवर अवलंबून आहेत. धरणात पाणी नसल्याने दुधनेच्या पात्रात सतत डबडबणारे बॅक वॉटरही यावर्षी दिसत नसून, पात्र कोरडेठाक पडले आहे. तसेच विहीर, बोअर यांचीही पाणी पातळी वाढली नाही. एकूणच यावर्षी दुधनेच्या कोरड्या पात्राने भविष्यातील पाणीटंचाईची चिंता वाढली आहे.

टॅग्स :riverनदीwater shortageपाणीकपातdroughtदुष्काळ