शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

एका तासात दोन गावातील दुष्काळाची पाहणी करून केंद्रीय पथक भुर्रऽऽ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 13:22 IST

आॅन द स्पॉट :

- संजय देशमुख

जालना : जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा २४ टक्के कमी पाऊस झाला. त्यामुळे खरिपात पेरणी झाली. मात्र, नंतर पावसाच्या सततच्या खंडामुळे सारेच साफ झाले. परतीचा पाऊसही न झाल्याने रबीची पेरणी केवळ १८ टक्के झाली. जिल्ह्यातील या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी बुधवारी जिल्ह्यात आलेल्या केंद्रीय पथकाचा दौरा तासाभरात गुंडाळला. 

या पथकाने बुधवारी जिल्ह्यातील जवसगाव आणि बेथलम या गावांची पाहणी केली. पथक येणार म्हणून जवसगाव आणि बेथलम येथे सकाळी १० वाजेपासूनच शेतकरी तसेच महसूल, कृषी आणि अन्य विभागाचे अधिकारी हजर होते. ११ वाजता येणारे केंद्रीय पथक दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी जवसगावात पोहोचले. 

जवसगावअधिकाऱ्यांनी जवसगाव येथे प्रथम जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे आणि आ. नारायण कुचे यांच्याशी काही वेळ चर्चा करून आपला मोर्चा थेट सुखदेव अंभोरे यांच्या कपाशीच्या शेतात वळविला. सुवर्णा अंभोरे, शीलाबाई हिवाळे यांच्यासह जवसगावचे सरपंच दत्तात्रय वैद्य, उपसरंच भारतचंद गंगाखेडे, बालाजी गारखेडे, ग्रामसेवक व्ही.के. सोनवणे यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी जवसगावाचे एकूण पेरणीलायक क्षेत्र ७७८ हेक्टर असल्याचे सांगण्यात आले, तसेच कमी पाऊस झाल्याने या भागातील भूजल पाणीपातळी चक्क दहा फुटाने खाली गेल्याचे सांगण्यात आले. केंद्रीय पथकातील अधिकारी मानस चौधरी यांनी सुवर्णा अंभोरे यांना काही प्रश्न विचारले. कपाशीची लागवड कधी केली? गेल्यावर्षी किती उत्पन्न झाले होते? यंदा किती झाले? हे उत्पन्न कमी होण्याचे प्रमुख कारण काय? १७ आॅगस्टनंतर या भागात पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप हंगामाचे उत्पन्न थेट ७० टक्यांनी घटल्याचे अंभोरे यांनी सांगितले.

यासाठी पीककर्ज काढले होते, या प्रश्नावर त्यांनी होकार देऊन एसबीएच बँकेकडून किसान के्रडिट कार्डच्या माध्यमातून नवीन-जुने करून प्रारंभी ३२ हजार रुपये आणि नंतर ८० हजार रुपये कर्ज घेतल्याचे सांगितले. गेल्या वर्षी याच चार एकर जमिनीतून ९ क्विंटल कपाशीचे आणि तुरीचे चांगले उत्पन्न झाले होते. यंदा या चार एकरांतून केवळ दोन क्विंटल कापसाचे उत्पादन निघाल्याचे अंभोरे यांनी सांगितले. पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून केंद्र सरकारने लागू केलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेतून विमा काढला का? या प्रश्नावर उपस्थित शेतकऱ्यांनी होकार देऊन तो यंदाही काढल्याचे सांगितले. विमा काढण्यासाठी महसूल, तसेच बँक आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गावात भेटी दिल्या का? यावर शेतकऱ्यांनी नकारात्मक मान डोलावली. जवसगाव येथे हे पथक २५ मिनिटे थांबून बेथलमकडे रवाना झाले.

बेथलमकेंद्रीय पथक येणार म्हणून येथील जवळपास ३० ते ४० शेतकरी हे सकाळपासूनच वाट पाहत उभे होते. पथकातील गाड्यांचा ताफा दुपारी १ वाजेच्या सुमारास बेथलममधील प्रकाश जयसिंग निर्मळ यांच्या ज्वारीच्या शेतात जाऊन थांबला. यावेळी निर्मळ यांनी त्यांना आलेला खर्च, तसेच उत्पादनाचे बिघडलेले गणित समजावून सांगितले. यावेळी दीपक सिंघला यांनी पिण्याच्या पाण्याची स्थिती विचारली असता तीदेखील गंभीर असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी पीककर्ज, पीकविमा यासंदर्भातही विचारणा करण्यात आली. बेथलम येथील पाहणी या पथकाने १५ मिनिटांत आटोपली. 

टॅग्स :droughtदुष्काळJalanaजालनाCentral Governmentकेंद्र सरकारagricultureशेती