शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
2
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
3
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
4
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
5
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
6
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
7
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
9
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
10
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
11
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
12
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
14
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
15
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
16
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
17
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
18
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
19
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
20
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?

जिल्ह्यातील १९ गावांमध्ये पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:21 IST

अस्वच्छ पाणी पिल्यामुळे ग्रामस्थांना गॅस्ट्रोसह इतर विविध आजार होण्याची भीती असते. या आजारांचा फैलाव होऊ नये, यासाठी ग्रामीण, शहरी ...

अस्वच्छ पाणी पिल्यामुळे ग्रामस्थांना गॅस्ट्रोसह इतर विविध आजार होण्याची भीती असते. या आजारांचा फैलाव होऊ नये, यासाठी ग्रामीण, शहरी भागातील जलस्रोतांमधील पाणी नमुन्यांची जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून नियमित तपासणी केली जाते. पाणी नमुन्यांची तपासणी केल्यानंतर ज्या गावातील जलस्रोतांचे पाणी नमुने दूषित आढळून येतात, त्यांना अहवाल देऊन पाणी स्वच्छतेबाबत सूचना केली जाते. वेळोवेळी सूचना देऊनही ज्या ग्रामपंचायती पाणी स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात, अशांवर जिल्हा परिषद प्रशासन कारवाईचा बडगा उगारू शकते. त्यात सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यात अस्वच्छ पाणी पिल्यानंतर आजार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे.

शहरी भागात एका ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य

ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील पाणी नमुने तपासणीची संख्या कमी आहे. त्यामुळे दूषित पाण्याचा अहवाल कमी येतो.

त्यात गत महिन्यात घनसावंगी, जाफराबाद, मंठा, नेर आदी रुग्णालयांतर्गत पाणी नमुने तपासणीसाठी आले नसल्याचे अहवालात दिसत आहे.

ज्या गावांत तपासणीच झाली नाही, त्यांचे काय?

जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून नियमित शहरी, ग्रामीण भागातील पाणी नमुन्यांची तपासणी केली जाते. पाणी नमुने संकलित करण्याचे काम आरोग्य केंद्रांतर्गत कर्मचारी करीत असतात.

नियमित पाणी नमुने देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींचीही आहे. नियमित पाणी नमुने तपासणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो.

ज्या गावांमध्ये पाणी नमुन्यांची तपासणी केली जात नाही, अशा गावांकडे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने विशेष लक्ष देण्याचीही गरज निर्माण झाली आहे.

आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या!

अस्वच्छ पाणी पिण्यात आल्यानंतर नागरिकांसह बालकांना विविध आजाराची लागण होण्याची शक्यता अधिक असते.

अनेक वेळा पाइपलाइन खराब असल्याने अस्वच्छ पाणी पाइपलाइनमध्ये जाते. तेच पाणी नळाद्वारे येऊ शकते. त्यामुळे पाणी उकळून पिणे गरजेचे आहे.

पाणी उकळण्यासह त्याचे नर्जंतुकीकरण व्हावे, यासाठी औषध दुकानांमध्ये औषधेही उपलब्ध आहेत. याचाही वापर पाण्याच्या स्वच्छतेसाठी केला जातो.

कोरोनामुळे नमुने घटले

कोरोनाच्या प्रादुर्भावापूर्वी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत महिन्याकाठी एक हजारावर पाणी नमुन्यांची तपासणी केली जात होती. तपासणी अहवाल संबंधित ग्रामपंचायत व प्रशासकीय विभागांना देऊन पाणी स्वच्छतेबाबत सूचित केले जात होते; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आणि पाणी नमुने घेणाऱ्या आरोग्य केंद्रांतर्गत कर्मचाऱ्यांवर इतर कामकाज वाढले. त्याशिवाय इतर आजारांचे नमुने घेण्याचीही जबाबदारी याच कर्मचाऱ्यांवर आहे. ही बाब पाहता पाणी नमुने तपासणीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे.