शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

जिल्ह्यातील १९ गावांमध्ये पिण्याचे पाणीच ठरू शकते आजाराचे कारण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:21 IST

अस्वच्छ पाणी पिल्यामुळे ग्रामस्थांना गॅस्ट्रोसह इतर विविध आजार होण्याची भीती असते. या आजारांचा फैलाव होऊ नये, यासाठी ग्रामीण, शहरी ...

अस्वच्छ पाणी पिल्यामुळे ग्रामस्थांना गॅस्ट्रोसह इतर विविध आजार होण्याची भीती असते. या आजारांचा फैलाव होऊ नये, यासाठी ग्रामीण, शहरी भागातील जलस्रोतांमधील पाणी नमुन्यांची जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून नियमित तपासणी केली जाते. पाणी नमुन्यांची तपासणी केल्यानंतर ज्या गावातील जलस्रोतांचे पाणी नमुने दूषित आढळून येतात, त्यांना अहवाल देऊन पाणी स्वच्छतेबाबत सूचना केली जाते. वेळोवेळी सूचना देऊनही ज्या ग्रामपंचायती पाणी स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात, अशांवर जिल्हा परिषद प्रशासन कारवाईचा बडगा उगारू शकते. त्यात सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यात अस्वच्छ पाणी पिल्यानंतर आजार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे.

शहरी भागात एका ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य

ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील पाणी नमुने तपासणीची संख्या कमी आहे. त्यामुळे दूषित पाण्याचा अहवाल कमी येतो.

त्यात गत महिन्यात घनसावंगी, जाफराबाद, मंठा, नेर आदी रुग्णालयांतर्गत पाणी नमुने तपासणीसाठी आले नसल्याचे अहवालात दिसत आहे.

ज्या गावांत तपासणीच झाली नाही, त्यांचे काय?

जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडून नियमित शहरी, ग्रामीण भागातील पाणी नमुन्यांची तपासणी केली जाते. पाणी नमुने संकलित करण्याचे काम आरोग्य केंद्रांतर्गत कर्मचारी करीत असतात.

नियमित पाणी नमुने देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींचीही आहे. नियमित पाणी नमुने तपासणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकीय कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो.

ज्या गावांमध्ये पाणी नमुन्यांची तपासणी केली जात नाही, अशा गावांकडे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने विशेष लक्ष देण्याचीही गरज निर्माण झाली आहे.

आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या!

अस्वच्छ पाणी पिण्यात आल्यानंतर नागरिकांसह बालकांना विविध आजाराची लागण होण्याची शक्यता अधिक असते.

अनेक वेळा पाइपलाइन खराब असल्याने अस्वच्छ पाणी पाइपलाइनमध्ये जाते. तेच पाणी नळाद्वारे येऊ शकते. त्यामुळे पाणी उकळून पिणे गरजेचे आहे.

पाणी उकळण्यासह त्याचे नर्जंतुकीकरण व्हावे, यासाठी औषध दुकानांमध्ये औषधेही उपलब्ध आहेत. याचाही वापर पाण्याच्या स्वच्छतेसाठी केला जातो.

कोरोनामुळे नमुने घटले

कोरोनाच्या प्रादुर्भावापूर्वी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत महिन्याकाठी एक हजारावर पाणी नमुन्यांची तपासणी केली जात होती. तपासणी अहवाल संबंधित ग्रामपंचायत व प्रशासकीय विभागांना देऊन पाणी स्वच्छतेबाबत सूचित केले जात होते; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आणि पाणी नमुने घेणाऱ्या आरोग्य केंद्रांतर्गत कर्मचाऱ्यांवर इतर कामकाज वाढले. त्याशिवाय इतर आजारांचे नमुने घेण्याचीही जबाबदारी याच कर्मचाऱ्यांवर आहे. ही बाब पाहता पाणी नमुने तपासणीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे.