शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पाऊचची विल्हेवाट लावा, अन्यथा ५० हजारांचा दंड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 12:18 AM

पाणीपाऊचची विल्हेवाट न लावणा-या विक्रेत्यांना ५० हजारांचा दंड आकारून संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे.

जालना : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ नुसार नगरपालिकेच्या वतीने शहर स्वच्छतेसाठी वेगवेगळ्या पातळ्यावंर प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून पालिकेने आता नियमबाह्य प्लास्टिक पिशव्यांचा वापर थांबविण्यासाठी विक्रेत्यांना अल्टीमेटम दिले आहे. पाणीपाऊचची विल्हेवाट न लावणा-या विक्रेत्यांना ५० हजारांचा दंड आकारून संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे.स्वच्छ भारत अभियानांतर्गत मार्च २०१८ पर्यंत ४० शहरांमध्ये स्वच्छता सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी विविध निकष ठरविण्यात आले असून, त्यानुसार गुण दिले जाणार आहेत. निकषानुसार गुण मिळाल्यानंतर शासनाच्या विविध योजनांचे अनुदान स्थानिक स्वराज्य संस्थेला मिळणार आहे. जालना शहरातही अशा पद्धतीच्या सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. पालिकेचे अधिकारी व पदाधिकारी स्वच्छ सर्वेक्षणातील निकषांची पुर्तता करण्यासाठी शहर स्वच्छतेला प्राधान्य देताना दिसत आहेत. नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल व मुख्याधिकारी संतोष खांडेकर प्रत्येक प्रभागात जाऊन स्वच्छतेचा आढावा घेत आहेत. बहुतांश भागात नाल्यांमध्ये पाणीपाऊचचा खच दिसून येत आहे. तसेच शहरात प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास नियमबाह्य वापर सुरू आहे. जुना जालना भागातील सरस्वती भुवन शाळेच्या मागील बाजूस असलेल्या नाल्यामध्ये पाणीपाऊचचा खच पडला आहे. अशीच स्थिती भाग्यनगर परिसरात उड्डाणपुलास लागून असलेल्या नाल्यात पाहावयास मिळत आहे. काही हॉटेलचालक आपल्या हॉटेलमधील अन्न नाल्यांमध्ये टाकून अस्वच्छता निर्माण करत आहेत.तर मंगल कार्यालयांच्या बाहेर पाणीपाऊच व पत्रावळींचा खच पहावयास मिळत आहे. याला आळा घालण्यासाठी नगरपालिकेने महाराष्ट्र प्लास्टिक पिशव्यांचा उत्पादन व वापर अधिनियमांतर्गत नगरपालिका हद्दीत प्लास्टिक पिशव्यांचा वापर थांबविण्याचा सूचना दिल्या आहेत. तसेच पाणीपाऊचच्या माध्यमातून पाणी विक्री करणाºया उत्पादकांना पाणीपाऊच नाल्यांमध्ये पडणार नाहीत याची काळजी घेऊन त्याची अंतिम विल्हेवाट लागेपर्यंत जबाबदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तपासणीत नाल्यांमध्ये पाणीपाऊच आढळून आल्यास विक्रेत्याला पन्नास हजारांचा दंड आकारण्यात येणार असून, संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.