शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जालना शहरातील वाहतुकीला शिस्त लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:54 AM

शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी अतिक्रमण हटाव व वाहतूक नियंत्रण पथक स्थापन करण्याची मागणी उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी अतिक्रमण हटाव व वाहतूक नियंत्रण पथक स्थापन करण्याची मागणी उपनगराध्यक्ष राजेश राऊत यांनी केली आहे.नगरपालिकेत सोमवारी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, शहर अभियंता अशोक अग्रवाल, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बी. के. अंभोरे यांच्या उपस्थितीत या संदर्भात बैठक घेण्यात आली. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पाणीवेस ते शिवाजी पुतळा, मुथा बिल्डिंग व्हाया लोखंडी पूल, मंमादेवी मस्तगड, मामा चौक ते वीर सावरकर चौक या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, त्याचे पालन होत नसल्याचे राऊत यांनी सांगितले. तसेच सिंधीबाजार ते शोला चौक, गांधीचमन ते शनीमंदिर, मुक्तेश्वरद्वार, अशी एकेरी वाहतूक सुरू करण्याची सूचना त्यांनी केली. शहरातील घरांसमोर व दुकानांसमोर बांधण्यात आलेल्या अनधिकृत ओट्यांमुळे रस्त्यावर वाहने उभी करण्यास अडचण निर्माण होते. नागरिक रस्त्यावर वाहने लावत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे निष्काशित करणे, तसेच पी -१, पी-२ वाहतूक नियमाची अमलबजावणी करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.या वेळी उपाध्यक्ष राऊत यांनी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांना याबाबत दिलेल्या निवेदनाची प्रत मुख्याधिकाऱ्यांना दिली. बैठकीस विद्युत अभियंता अ. वा. माळवदकर यांच्यासह पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांची उपस्थिती होती.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीnagaradhyakshaनगराध्यक्ष