शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

चार वर्षे झोपा काढल्या का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 00:30 IST

धरणाच्या भिंतीवर चार ते पाच वर्षांपासून झाडे वाढत असताना तुम्ही काय झोपा काढत होते का, असा सवाल करीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन (जि. जालना) : धरणाच्या भिंतीवर चार ते पाच वर्षांपासून झाडे वाढत असताना तुम्ही काय झोपा काढत होते का, असा सवाल करीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. धामना धरणाच्या सांडव्याची विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गुरुवारी पाहणी केली. यावेळी आ. संतोष दानवे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव, तहसीलदार संतोष गोरड, गटविकास अधिकारी अरूण चौलवार यांच्यासह सरपंच आणि ग्रामस्थ उपस्थित होते.दुष्काळाच्या तडाख्यात सापडलेल्या भोकरदन तालुक्यावर आठवडाभरापासून पावसाची कृपा झाली आहे. मुसळधार पावसामुळे केळना, जुई या नद्या खळाळत्या झाल्या असून, परिसरातील धरणांतील पाणी झपाट्याने वाढले आहे. चार ते पाच वर्षांपासून कोरडे पडलेले शेलूद येथील धामना धरण तुडूंब भरले असून, धरणाच्या आणि सांडव्याच्या भिंतीला तडे गेल्याने पाणी वाहून जात आहे. दरम्यान, यामुळे धरण फुटण्याच्या चर्चा परिसरात सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी गुरूवारी धरणाला भेट दिली.आयुक्त केंद्रेकर यांनी दोन किमी परिसरात असलेल्या धरणाच्या भिंतीची पाहणी केली. यावेळी त्यांना धरणाच्या भिंतीवर चार ते पाच वर्षापासून वाढलेली झाडे दिसली. तसेच भिंतीला अनेक ठिकाणी तडे गेल्याचे दिसून आल्याने आयुक्तांचा पारा चढला. चार वर्ष तुम्ही काय झोपा काढत होता, काय, अशी विचारणा करीत आयुक्तांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे कान उपटले. काही दुर्घटना घडल्यास कोणाचीही हयगय करणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी दिला. केंद्रेकरांचा हा अवतार बघून अधिकार्यांमध्ये शांतता पसरली होती.धरण फुटणार, अशी अफवा पसरल्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. त्यानंतर बुधवारी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनीही धरणाला भेट देऊन पाहणी केली होती.पाहणीनंतर आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी धरण परिसरात २४ तास खडा पहारा ठेवण्यासह विद्युत पुरवठ्याची तातडीने व्यवस्था करण्याचे निर्देश तहसीलदारांना दिले आहेत. दरम्यान, सैन्यदलाची एक तुकडी मेजर गौरव यांच्या मार्गदर्शनाखाली शेलूद येथे दाखल झाली आहे.पाटबंधारे विभागाने धरणाच्या ज्या ठिकाणाहून पाणी गळती होत होती. ती गळती थांबवण्यासाठी ताडपत्री टाकली आहे. त्यामुळे पाणी गळतीचा वेग कमी झाला असून, सांडव्यातून पाणी जात आहे. गुरुवारी पाऊस थांबल्याने धरणात येणारा पाण्याचा ओघ थांबला आहे. त्यामुळे धोका कमी झाल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :commissionerआयुक्तDamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प