शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

सरकारला सभेत हिंसाचार करायचा होता का?; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 15:18 IST

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर खळबळजनक आरोप केला आहे. 

अंतरवली-  आमच्या सभेवेळी सरकारने इंटरनेट बंद पाडून सभा फ्लॉप करण्याचा प्रयत्न केला होता, आमचे मोबाईलही बंद केले. एवढी मोठी सभा पहिल्यांदाच झाली. सभेवेळी २७ गावातील वीज पुरवठा बंद केला, सरकारने हिंसाचार घडवून आणण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर केला. 

अंतरवली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारी सभा झाली. या सभेसाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होत. यावेळी सभे ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी भाषण करत, येत्या १० दिवसांच्या आत मराठा समाजाला आरक्षण जाहीर करण्याची मागमी केली. दरम्यान, आता या सभेवरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनीही आरोप केले होते. दरम्यान, आता मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

दसरा-दिवाळीत मोठा राजकीय धमाका होणार; शरद पवारांना बसणार पुन्हा एकदा धक्का?

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आमची सभा सुरू होती, तेव्हा २७ गावातील वीज पुरवठा बंद केला होता. सभेला आलेल्या लोकांसाठी पाण्याची व्यवस्था आम्हाला करायची होती, पण २७ गावांतील वीज पुरवठा बंद केल्याने आम्हाला पाणीची व्यवस्था करता आली नाही. याची चौकशी करुन संबंधीत अधिकाऱ्यावर कारवाई करायला हवी, अशी मागणीही पाटील यांनी केली.  सभेवेळी मोबाईलही बंद केले, तरीही आमची सभा मोठी झाली. तुम्ही आमचे नेट, लाईट बंद केली तरी तुमचे नेट बंद करायचे जनतेच्या हातात आहे, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले त्यावंळी सरकारला ४० दिवसांचा वेळ दिला आहे. आता यातील ३० दिवस संपले आहेत. आता पाटील यांनी सरकारला १० दिवसांच्या आत आरक्षणाचा निर्णय घेण्याची मागमी केली आहे. शनिवारी जरांगे पाटील यांची १०० एकर जागेत ही सभा झाली.या सभेसाठी राज्यभरातून मराठा बांधव आले होते. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण