शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला सभेत हिंसाचार करायचा होता का?; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 15:18 IST

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर खळबळजनक आरोप केला आहे. 

अंतरवली-  आमच्या सभेवेळी सरकारने इंटरनेट बंद पाडून सभा फ्लॉप करण्याचा प्रयत्न केला होता, आमचे मोबाईलही बंद केले. एवढी मोठी सभा पहिल्यांदाच झाली. सभेवेळी २७ गावातील वीज पुरवठा बंद केला, सरकारने हिंसाचार घडवून आणण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर केला. 

अंतरवली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारी सभा झाली. या सभेसाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होत. यावेळी सभे ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी भाषण करत, येत्या १० दिवसांच्या आत मराठा समाजाला आरक्षण जाहीर करण्याची मागमी केली. दरम्यान, आता या सभेवरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनीही आरोप केले होते. दरम्यान, आता मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

दसरा-दिवाळीत मोठा राजकीय धमाका होणार; शरद पवारांना बसणार पुन्हा एकदा धक्का?

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आमची सभा सुरू होती, तेव्हा २७ गावातील वीज पुरवठा बंद केला होता. सभेला आलेल्या लोकांसाठी पाण्याची व्यवस्था आम्हाला करायची होती, पण २७ गावांतील वीज पुरवठा बंद केल्याने आम्हाला पाणीची व्यवस्था करता आली नाही. याची चौकशी करुन संबंधीत अधिकाऱ्यावर कारवाई करायला हवी, अशी मागणीही पाटील यांनी केली.  सभेवेळी मोबाईलही बंद केले, तरीही आमची सभा मोठी झाली. तुम्ही आमचे नेट, लाईट बंद केली तरी तुमचे नेट बंद करायचे जनतेच्या हातात आहे, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले त्यावंळी सरकारला ४० दिवसांचा वेळ दिला आहे. आता यातील ३० दिवस संपले आहेत. आता पाटील यांनी सरकारला १० दिवसांच्या आत आरक्षणाचा निर्णय घेण्याची मागमी केली आहे. शनिवारी जरांगे पाटील यांची १०० एकर जागेत ही सभा झाली.या सभेसाठी राज्यभरातून मराठा बांधव आले होते. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण