शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

सरकारला सभेत हिंसाचार करायचा होता का?; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 15:18 IST

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर खळबळजनक आरोप केला आहे. 

अंतरवली-  आमच्या सभेवेळी सरकारने इंटरनेट बंद पाडून सभा फ्लॉप करण्याचा प्रयत्न केला होता, आमचे मोबाईलही बंद केले. एवढी मोठी सभा पहिल्यांदाच झाली. सभेवेळी २७ गावातील वीज पुरवठा बंद केला, सरकारने हिंसाचार घडवून आणण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर केला. 

अंतरवली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी शनिवारी सभा झाली. या सभेसाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होत. यावेळी सभे ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी भाषण करत, येत्या १० दिवसांच्या आत मराठा समाजाला आरक्षण जाहीर करण्याची मागमी केली. दरम्यान, आता या सभेवरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनीही आरोप केले होते. दरम्यान, आता मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

दसरा-दिवाळीत मोठा राजकीय धमाका होणार; शरद पवारांना बसणार पुन्हा एकदा धक्का?

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आमची सभा सुरू होती, तेव्हा २७ गावातील वीज पुरवठा बंद केला होता. सभेला आलेल्या लोकांसाठी पाण्याची व्यवस्था आम्हाला करायची होती, पण २७ गावांतील वीज पुरवठा बंद केल्याने आम्हाला पाणीची व्यवस्था करता आली नाही. याची चौकशी करुन संबंधीत अधिकाऱ्यावर कारवाई करायला हवी, अशी मागणीही पाटील यांनी केली.  सभेवेळी मोबाईलही बंद केले, तरीही आमची सभा मोठी झाली. तुम्ही आमचे नेट, लाईट बंद केली तरी तुमचे नेट बंद करायचे जनतेच्या हातात आहे, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले त्यावंळी सरकारला ४० दिवसांचा वेळ दिला आहे. आता यातील ३० दिवस संपले आहेत. आता पाटील यांनी सरकारला १० दिवसांच्या आत आरक्षणाचा निर्णय घेण्याची मागमी केली आहे. शनिवारी जरांगे पाटील यांची १०० एकर जागेत ही सभा झाली.या सभेसाठी राज्यभरातून मराठा बांधव आले होते. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण