शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

धनगर आरक्षण मोर्चास हिंसक वळण; आंदोलकांची जालना जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड

By शिवाजी कदम | Updated: November 21, 2023 16:14 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील गाड्यांची तोडफोड, सुरक्षारक्षकांनी मुख्य दरवाजा बंद केल्याने अनर्थ टळला.

जालना : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, प्रशासनाकडून कुणीही निवेदन स्विकारण्यास आंदोलन स्थळी न आल्याने, जमाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घुसला. जमावाने येथील दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची तोडफोड केली, तसेच येथील मातीच्या कुंड्याही फोडून टाकल्या. जमावाने कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, येथील सुरक्षारक्षकांनी वेळीच मुख्य दरवाजा बंद केल्याने अनर्थ टळला.

जालना जिल्हा अनेक आंदोलनामुळे गाजत आहे. मंगळवारी पुन्हा आंदोलनास गालबोट लागल्याची घटना घडली. सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने गांधी चमन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बायपास रस्त्याच्या एका बाजूची वाहतूक पूर्णपणे थांबवून मंडप टाकण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी परिसरात आल्यानंतर रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मंडपामध्ये सभा घेण्यात आली. सभेनंतर प्रशासन निवेदन देण्याचे आयोजकांनी ठरविले होते, परंतु प्रशासनातील अधिकाऱ्यांनी निवेदन देण्यासाठी आंदोलनस्थळी यावे, असा आग्रह आयोजकांनी केला. प्रशासनाचे अधिकारी जोपर्यंत निवेदन स्विकारण्यासाठी येत नाही, तोपर्यंत ठाण मांडणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. मात्र, अर्धा तास उलटूनही प्रशासनातील एकही अधिकारी आयोजन स्थळी न आल्याने मोर्चात सामील झालेले समाज बांधव आक्रमक झाले. त्यांनी प्रशासनाच्या विराेधात घोषणा देण्यास सुरुवात केली. आक्रमक जमावाने कार्यालय परिसरातील बाहेरील लोखंडी गेट ताडून आत प्रवेश केला. यानंतर, वाहनांची तोडफोड केली.

गाड्यांची तोडफोडप्रशासनातील कुणीही अधिकारी निवेदन स्विकारण्यासाठी आले नसल्याने मोर्चात सामील झालेल्या आक्रमक जमावाने जिल्हाधिकारी कार्यालयातील सुमारे दहा दुचाकी आणि एक कारची ताेडफोड केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तैनात असणाऱ्या सुरक्षारक्षकांनी वेळीच कार्यालयाचा मुख्य दरवाजा बंद केल्याने जमाव कार्यालयात घुसू शकला नाही.

टॅग्स :JalanaजालनाJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालनाDhangar Reservationधनगर आरक्षण