शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

धामना धरणात झाला ९० टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:39 IST

भोकरदन तालुक्यातील शेलूद परिसरात पडलेल्या जोरदार पावसामुळे येथील धामना धरणात ९० टक्के पाणीसाठा झाला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव सपकाळ : भोकरदन तालुक्यातील शेलूद परिसरात पडलेल्या जोरदार पावसामुळे येथील धामना धरणात ९० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे परिसरातील पंधरा गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केला.दुष्काळामुळे परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली होती. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरु होती. जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. मात्र, आता आठवड्यापासून जोरदार पाऊस सुरु असल्याने कोरडाठाक असलेल्या धामना धरणात मुबलक पाणी आले आहे. त्यामुळे जळगाव सपकाळ, आन्वा, हिसोडा, लेहा, पिंपळगांव रेणुकाई, पारध, वडोद तांगडा, धावडा, दहिगांव, करजगांव, कल्याणी व सिल्लोड तालुक्यातील मादणी, जळकी बाजार आदी गावांचा पाणी प्रश्न मार्गी लागला आहे. सध्या पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे संपूर्ण धरण भरण्याची आशा ग्रामस्थांना लागली आहे.हसनाबाद येथील टँकरचे पाणी बंदहसनाबाद येथे दुष्काळ काळात पाणीपुरवठा करणारे टँकर पाऊस पडल्याने एकाच ठिकाणी उभे आहे. त्यामुळे गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.हसनाबाद १० हजार लोकसंखेचे गाव आहे. मात्र गेल्या आठवड्यापासून गावातील पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने ग्रामस्थांना पाणी मिळण्यास अडचणी येत आहेत. पाणी पुरवठ्यासाठी गावाला तीन पाणी पुरवठा योजना आहेत. मात्र गिरीजा नदीलाच पाणी नसल्याने सार्वजनीक नळाला पंधरा दिवसानंतर अर्धा तास पाणी मिळत असे. ग्रामपंचायतने मागणी केल्यानंतर दोन टँकरद्वारे सोमठाणा तळ्याजवळून चोवीस हजार लिटर पाणी आणून विहीरीत सोडत व नळाद्वारे गावाला पाणी पुरवठा सुरु होता. एक महिना गावास पाणी पुरवठा सुरळीत सुरू होता. मात्र पंधरा दिवसांपूर्वी बदनापूर तालुक्यात झालेल्या पावसात एक टँकर चार पाच दिवस गाळात रुतला होता. तसेच परवा पडलेल्या पावसामुळे हे दोन्ही टँकर हसनाबाद ग्रा.प. आवारात उभे करण्यात आले आहेत. त्यामुळे आठवड्यापासून टँकरव्दारे पाणी पुरवठा बंद झाल्याने गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रारी करुनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

टॅग्स :RainपाऊसDamधरणMonsoon Specialमानसून स्पेशल